शहरं
Join us  
Trending Stories
1
Eknath Shinde : ज्यांनी स्वाभिमान गुंडाळून ठेवला, त्यांचं....; उद्धव ठाकरेंना मागची जागा दिल्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
2
राहुल गांधींच्या आरोपानंतर काँग्रेस आक्रमक; दादरमध्ये रास्ता रोको, भाजपाविरोधात घोषणाबाजी
3
NASA : नासाचा मोठा निर्णय!इंटरनॅशनल स्पेस स्टेशन समुद्रात पाडणार! कारण ऐकून धक्का बसेल
4
Donald Trump Tariff News : अमेरिकाच टॅरिफबाबत गंडली! ट्रम्प यांची भारताबद्दल कडक भूमिका, पण परराष्ट्र मंत्रालय करतंय कौतुक
5
२ तासांचा हायव्हॉल्टेज ड्रामा, गर्लफ्रेंडच्या मिठीत सापडला नेता; पत्नीला पाहून पती पळाला, पण...
6
आकाश 'वाणी'! वैभव सूर्यवंशीमुळे स्टार विकेट किपर बॅटर संजूवर आलीये संघ सोडण्याची वेळ!
7
भारतीयांसाठी कॅनडा ठरतोय मृत्युचं घर; गेल्या ५ वर्षातील आकडे चिंताजनक!
8
प्राजक्ता माळीने वाढदिवशी घेतलं भीमाशंकरचं दर्शन; म्हणाली, "१२ ज्योतिर्लिंग यात्रा पूर्ण..."
9
चालत्या बसवर झाड कोसळलं, ५ जणांचा मृत्यू; महिला म्हणते, "आयुष्याचा प्रश्न, तुम्ही Video बनवताय"
10
BCCI: बीसीसीआय नव्या प्रशिक्षकाच्या शोधात, अर्जही मागवले! जाणून घ्या पात्रता
11
धनंजय मुंडेंनी मंत्रिपद स्वप्नातही पाहू नये, पुन्हा घेतले तर अजितदादांचा पक्ष संपेल: जरांगे
12
Video: हृदयस्पर्शी! हत्तीच्या पिंजऱ्यात पडला चिमुकला; गजराजाने जे केले त्यानं सर्वांचीच मने जिंकली
13
काय आहे युनिव्हर्सल बँकिंग? ११ वर्षांत पहिल्यांदाच RBI नं कोणत्या बँकेला दिला असा लायसन्स
14
Donald Trump Tariff News : ज्याची भीती होती तेच घडले! वॉलमार्ट अन् अमेझॉनसह अनेक कंपन्यांनी भारतातील ऑर्डर्स रोखून ठेवल्या
15
'निवडणूक आयोग मला शपथपत्र मागतो; मी संसदेत शपथ घेतलीये', राहुल गांधींचा पुन्हा हल्लाबोल
16
Raksha Bandhan 2025 Gift Ideas: केवळ चॉकलेट मिठाई नको! रक्षाबंधनाच्या निमित्तानं बहिणीला द्या 'हे' आर्थिक गिफ्ट
17
354 डब्बे, 7 इंजिन अन् 4.5 किमी लांबी; या राज्यात धावली देशातील सर्वात लांब मालगाडी ‘रुद्रास्त्र’
18
'मंजिल आने वाली है...' कोडवर्ड देत पतीला कायमचं संपवलं; प्रियकरासोबत पत्नीनं रचलं क्रूर षडयंत्र
19
हृदयद्रावक! ढगफुटीमुळे भाऊ बेपत्ता, आता मी कोणाला राखी बांधू?; बहिणीने फोडला टाहो
20
पत्रिका पाहून लग्न करावं का? तेजश्री प्रधानचं लग्नसंस्थेवर भाष्य; म्हणाली, "पूर्वजांनी लिहून ठेवलंय..."

मुंबईच्या प्रश्नावर शिवसेना लक्ष्य

By admin | Updated: December 24, 2014 00:40 IST

विधान परिषदेत मुंबईविषयक प्रश्नांवरील अंतिम आठवडा प्रस्तावावर बोलताना विरोधी पक्षाच्या सदस्यांनी मुंबई महापालिकेतील गैरव्यवहारावर बोट ठेवत महापालिकेतील सत्ताधारी शिवसेनेला लक्ष्य केले.

अंतिम आठवडा प्रस्ताव : मुंबईसाठी समितीचा मुद्दा गाजलानागपूर : विधान परिषदेत मुंबईविषयक प्रश्नांवरील अंतिम आठवडा प्रस्तावावर बोलताना विरोधी पक्षाच्या सदस्यांनी मुंबई महापालिकेतील गैरव्यवहारावर बोट ठेवत महापालिकेतील सत्ताधारी शिवसेनेला लक्ष्य केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईच्या विकासासाठी समिती स्थापन करण्याचा मुद्दाही यावेळी गाजला. ही समिती नियुक्त करणे म्हणजे मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी करण्याचा डाव असल्याची टीका विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली.केंद्रात भाजपची सत्ता आल्यापासून मुंबईतील रिझर्व्ह बँकेचे मुख्यालय, जेएनटीपी बंदरातून होणारी मालवाहतूक, सागरी सुरक्षा प्रशिक्षण केंद्र गुजरातमध्ये हलविण्यासाठी प्रयत्न सुरू झाले असून यासाठी मुख्यमंत्री जबाबदार आहेत, असा आरोप धनंजय मुंडे यांनी केला. मुंबईविषयी प्रेम व्यक्त करणारी शिवसेना आता गप्प का, असा सवालही त्यांनी केला. डेंग्यू प्रतिबंधक लस खरेदीत झालेला गैरव्यवहार, मुंबई महापालिकेतील ई-निविदा घोटाळा, मुंबईच्या सुरक्षेचा मुद्दा, महापालिकेवर कं त्राटदारांचा ताबा यासह विविध मुद्यांवर त्यांनी शिवसेनेला लक्ष्य केले.काँग्रेसचे भाई जगताप यांनी मुंबईतील चाळीचा प्रश्न, पोलिसांच्या वसाहतीचा प्रश्न मांडला. विरोधी पक्षात असताना भाजप आणि शिवसेनेचे सदस्य वारंवार मुंबईच्या विकासासाठी केंद्रातून निधी आणण्याची मागणी करीत होते. आता ते किती निधी आणणार हे जाहीर करावे, अशी मागणी केली.राष्ट्रवादीचे किरण पावस्कर यांनी मुंबईच्या दुरवस्थेला महापालिका आणि तेथील सत्ताधारीच दोषी असल्याचा आरोप केला. विविध सामाजिक उपक्रमासाठी अर्थसंकल्पात केलेली तरतूद जाते कुठे, असा सवाल करीत त्यांनी खड्डे बुजविण्यावर होणाऱ्या कोट्यवधी रुपयांच्या खर्चाकडे लक्ष वेधले. मुंबईतील ३०० आरक्षित भूखंडांवर लोकप्रतिनिधींचे क्लब असल्याचा आरोपही पावस्कर यांनी केला.काँग्रेसचे जनार्दन चांदूरकर यांनी मुख्यमंत्र्यांनी मुंबईसाठी समिती नेमण्याच्या निर्णयावरच प्रश्नचिन्ह निर्माण केले. हा घटनेवरच घाला असल्याचा आरोप त्यांनी केला. राष्ट्रवादीच्या विद्या चव्हाण यांनी मुंबईतून मराठी माणसाला हुसकावून लावण्याचे काम मुंबई महापालिकेने व पर्यायाने तेथील सत्ताधाऱ्यांनी केल्याचा आरोप करीत अप्रत्यक्षरीत्या शिवसेनेला धारेवर धरले. काँग्रेसचे चंद्रकांत रघुवंशी यांनी नगरपालिकांच्या अनुदानाचा मुद्दा मांडला, तर राष्ट्रवादीचे नरेंद्र पाटील यांनीही चर्चेत भाग घेतला. बुधवारी या चर्चेला सरकारकडून उत्तर देण्यात येणार आहे.(प्रतिनिधी)