शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेनं ओसामा संपवला, पण त्याच्या बायकांचं काय झालं? पाकिस्तानच्या माजी राष्ट्रपतीच्या सहकाऱ्यानं सागितलं
2
IND vs PAK: गंभीरनं टीम इंडियातील खेळाडूंना स्पष्ट सांगितलंय की...; सहाय्यक कोच नेमकं काय म्हणाले?
3
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
4
Asia Cup 2025 Points Table : भारत-पाक लढतीआधी लंकेची विजयी सलामी! तरीही अफगाणिस्तान ठरले भारी!
5
नेपाळ हिंसाचारासंदर्भात CM योगी आदित्यनाथ यांचं मोठं विधान; म्हणाले - "छोट्या-छोट्या गोष्टींकडे..."
6
BAN vs SL : श्रीलंकेचा डंका! एका पराभवासह बांगलादेश संघ स्पर्धेतून OUT होण्याच्या उंबरठ्यावर
7
चार दिवसांत थंड व्हाल, हिंम्मत असेल तर कारागृहात पाठवून दाखवा; प्रशांत किशोर यांचं संजय जायसवाल यांना आव्हान
8
२०७ खुनाचा आरोप, तिला पकडण्यासाठी होते २ कोटींचे इनाम ! पण तिच्या 'या' निर्णयाने तिलाच मिळतील २५ लाख
9
कमाल झाली! हसरंगाचा बॉल स्टंपला लागला, पण नशिबाच्या जोरावर बॅटर Not Out राहून चमकला (VIDEO)
10
शेअर असावा तर असा...! 5 वर्षांत लखपतींना केलं करोडपती; TV-AC अन् वॉशिंग मशीन तयार करते कंपनी
11
"होय, मतचोरी झाली !" मत चोरीतूनच भाजप सत्तेत; काँग्रेसच्या आरोपाला नक्षल्यांचे समर्थन
12
Women's Asia Cup 2025 Final : भारताची फायनलमध्ये धडक! चीनचा हिशोब चुकता करुन इतिहास रचण्याची संधी
13
IND vs PAK Head To Head Record : पाकचा नवा डाव; पण टीम इंडियाविरुद्ध फिकी ठरेल त्यांची ही चाल, कारण...
14
लाईफबॉय साबण ८, डव शाम्पू ५५, टूथपेस्ट १६ रुपयांनी स्वस्त झाली; हिंदुस्तान युनिलिव्हरची यादी आली...   
15
आता पश्चाताप करून काय उपयोग? रोखण्याचा प्रयत्न करूनही तरुणीनं खोल पाण्यात उडी घेतली; थरकाप उडवणारा VIDEO
16
सासऱ्यावर गोळी झाडली, स्वतःला वाचवण्यासाठी पळत सुटला अन् पुराच्या पाण्यात पडला जावई! पुढे जे झालं...
17
असुरक्षित! पहाटे पुणे स्टेशनला उतरलेल्या तरुणाने पैसे न दिल्याने पोटात चाकूने वार
18
उल्हासनगरातील हॅन्ड्रेड बारमध्ये महिला वेटर्सचे अश्लील चाळे, महिला वेटर्ससह ९ जणांवर गुन्हा 
19
घरात ‘टॉप टू बॉटम’ डॉक्टर ; पण आयएएस झाले आणि लोकसेवेत आले...
20
योगेश आळेकरी यांना मिळाली नवीकोरी दुचाकी; पुढच्या प्रवासाला सुरुवात करणार पण...

शिवसेनेच्या वाघाची झाली शेळी

By admin | Updated: July 6, 2017 03:47 IST

मध्यावधी निवडणुकीचे फक्त नाटकच सुरू आहे. बहुमत असतानाही त्यांना असे बोलावे लागत असेल तर सरकार दुर्बळ आहे, असाच त्याचा अर्थ

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : मध्यावधी निवडणुकीचे फक्त नाटकच सुरू आहे. बहुमत असतानाही त्यांना असे बोलावे लागत असेल तर सरकार दुर्बळ आहे, असाच त्याचा अर्थ आहे. शिवसेनेच्या वाघाची आता शेळी झाली आहे, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी केली. मुख्यमंत्री सांगतात तेवढी, म्हणजे ९० लाख शेतकऱ्यांना ३४ हजार कोटी रूपयांची कर्जमाफी झाल्याशिवाय राष्ट्रवादी शांत बसणार नाही, असे ते म्हणाले.यांच्या कर्जदार शेतकऱ्यांच्या यादीत मुंबईतील शेतकरी निघतात हे आश्चर्यजनक आहे. कुठे हवेत शेती करतात की काय त्यांनाच माहिती असेल. सरकारने आतापर्यंत जेवढे काही सांगितले आहे तेवढे फसवेच निघाले आहे. शेतकऱ्यांना त्यांना कर्जमाफी द्यायचीच नव्हती. मात्र राष्ट्रवादी काँग्रेससह अन्य राजकीय पक्षांनी संघर्षयात्रा काढली. त्यानंतर आत्मक्लेश यात्रा निघाली, आसूड यात्रा काढण्यात आली. मग संपच झाला. त्यामुळे त्यांना कर्जमाफी करावीच लागली. मात्र ती फसवी निघू नये यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस डोळ्यांत तेल घालून लक्ष ठेवणार आहे, असे पवार म्हणाले. सत्तेत नसल्यामुळे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचे मनोबल कमी झाले होते. ते वाढवण्यासाठी म्हणून प्रदेशाध्यक्षांनी राज्यस्तरीय संपर्क मोहीम सुरू केली. काही रचना नव्याने करण्यात येत आहे. पक्षाचे एकूण २४ सेल म्हणजे आघाड्या आहेत. त्या सक्रिय करण्यात येत आहेत. विद्यार्थी, युवक, युवती, यासाठी सेलसाठी वयोमर्यादा निश्चित करण्यात येत आहे. संपर्क मोहिमेमुळे राज्यभर फिरता येत आहे. त्या वेळी सरकारच्या विरोधात जनमत तयार होत असल्याचे जाणवते आहे, असे पवार यांनी सांगितले. आम्ही पुणे, पिंपरी-चिंचवड येथे काम केले. कोणाला वाटले नव्हते त्यांना सत्ता मिळेल, पण मिळाली. त्यांच्याकडे गेलेले अनेक जण आमचेच आहेत. ते गेले म्हणून राष्ट्रवादी थांबलेली नाही. आमचे काम सुरूच आहे. राज्यातील सत्तेत बहुमत असूनही सरकार दुर्बल आहे. त्यामुळेच त्यांच्याकडून सातत्याने मध्यावधी निवडणुकीची भाषा केली जाते. मात्र त्यांचे आमदारच त्यांना तसे करू देणार नाही असे पवार म्हणाले.गल्ली ते दिल्ली सत्ता असूनही भाजपाला पुण्यातील कचरा, सार्वजनिक वाहतूक, आरोग्य, मेट्रो, भामा-आसखेड पाणी योजना यांपैकी एकही समस्या सोडवता आलेली नाही. कर्ज काढून दिवाळी साजरी केली जात आहे. प्रशासनावर पदाधिकाऱ्यांचा वचक राहिलेला नाही, अशी टीका पवार यांनी पुण्यातील भाजपाच्या सत्तेवर बोलताना केली.