शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
3
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
4
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
5
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
6
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
7
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
8
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
9
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
10
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
11
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
12
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
13
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
14
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
15
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
16
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
17
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
18
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
19
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
20
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
Daily Top 2Weekly Top 5

शिवसेनेच्या वाघाची झाली शेळी

By admin | Updated: July 6, 2017 03:47 IST

मध्यावधी निवडणुकीचे फक्त नाटकच सुरू आहे. बहुमत असतानाही त्यांना असे बोलावे लागत असेल तर सरकार दुर्बळ आहे, असाच त्याचा अर्थ

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : मध्यावधी निवडणुकीचे फक्त नाटकच सुरू आहे. बहुमत असतानाही त्यांना असे बोलावे लागत असेल तर सरकार दुर्बळ आहे, असाच त्याचा अर्थ आहे. शिवसेनेच्या वाघाची आता शेळी झाली आहे, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी केली. मुख्यमंत्री सांगतात तेवढी, म्हणजे ९० लाख शेतकऱ्यांना ३४ हजार कोटी रूपयांची कर्जमाफी झाल्याशिवाय राष्ट्रवादी शांत बसणार नाही, असे ते म्हणाले.यांच्या कर्जदार शेतकऱ्यांच्या यादीत मुंबईतील शेतकरी निघतात हे आश्चर्यजनक आहे. कुठे हवेत शेती करतात की काय त्यांनाच माहिती असेल. सरकारने आतापर्यंत जेवढे काही सांगितले आहे तेवढे फसवेच निघाले आहे. शेतकऱ्यांना त्यांना कर्जमाफी द्यायचीच नव्हती. मात्र राष्ट्रवादी काँग्रेससह अन्य राजकीय पक्षांनी संघर्षयात्रा काढली. त्यानंतर आत्मक्लेश यात्रा निघाली, आसूड यात्रा काढण्यात आली. मग संपच झाला. त्यामुळे त्यांना कर्जमाफी करावीच लागली. मात्र ती फसवी निघू नये यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस डोळ्यांत तेल घालून लक्ष ठेवणार आहे, असे पवार म्हणाले. सत्तेत नसल्यामुळे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचे मनोबल कमी झाले होते. ते वाढवण्यासाठी म्हणून प्रदेशाध्यक्षांनी राज्यस्तरीय संपर्क मोहीम सुरू केली. काही रचना नव्याने करण्यात येत आहे. पक्षाचे एकूण २४ सेल म्हणजे आघाड्या आहेत. त्या सक्रिय करण्यात येत आहेत. विद्यार्थी, युवक, युवती, यासाठी सेलसाठी वयोमर्यादा निश्चित करण्यात येत आहे. संपर्क मोहिमेमुळे राज्यभर फिरता येत आहे. त्या वेळी सरकारच्या विरोधात जनमत तयार होत असल्याचे जाणवते आहे, असे पवार यांनी सांगितले. आम्ही पुणे, पिंपरी-चिंचवड येथे काम केले. कोणाला वाटले नव्हते त्यांना सत्ता मिळेल, पण मिळाली. त्यांच्याकडे गेलेले अनेक जण आमचेच आहेत. ते गेले म्हणून राष्ट्रवादी थांबलेली नाही. आमचे काम सुरूच आहे. राज्यातील सत्तेत बहुमत असूनही सरकार दुर्बल आहे. त्यामुळेच त्यांच्याकडून सातत्याने मध्यावधी निवडणुकीची भाषा केली जाते. मात्र त्यांचे आमदारच त्यांना तसे करू देणार नाही असे पवार म्हणाले.गल्ली ते दिल्ली सत्ता असूनही भाजपाला पुण्यातील कचरा, सार्वजनिक वाहतूक, आरोग्य, मेट्रो, भामा-आसखेड पाणी योजना यांपैकी एकही समस्या सोडवता आलेली नाही. कर्ज काढून दिवाळी साजरी केली जात आहे. प्रशासनावर पदाधिकाऱ्यांचा वचक राहिलेला नाही, अशी टीका पवार यांनी पुण्यातील भाजपाच्या सत्तेवर बोलताना केली.