शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
2
रेल्वे प्रवाशांना झटका! उद्यापासून ट्रेन प्रवास महागणार; तिकिटांचे दर किती वाढणार? एका क्लिकवर जाणून घ्या
3
कोल्हापुरातील वराच्या फिर्यादीवरून जळगावची वधू व मध्यस्थांविरुद्ध गुन्हा दाखल
4
प्रेयसी मुलासोबत लाॅजमधून बाहेर येताना दिसली, प्रियकराने संपवले जीवन
5
आनंदाची बातमी! सुकन्या, PPF सह अल्प बचत योजनांसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय; पटा-पट चेक करा लेटेस्ट व्याज दर!
6
कुटुंबियांना फोन करून आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांच्या तत्परतेमुळे वाचला व्यावसायिकाचा जीव
7
तीन पिढ्या काँग्रेसमध्ये, ७० वर्षांनी सोडणार पक्षाची साथ; कुणाल पाटील करणार भाजपात प्रवेश
8
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
9
इराणच्या मनात धडकी; इंटरनेट वापरावरही आणली बंदी, न ऐकणाऱ्याला चाबकाचे फटके अन्... 
10
ENG vs IND : टीम इंडियाविरुद्ध खेळलेला डाव फसला! इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनमधून हा गोलंदाज 'गायब'
11
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
12
सोनम रघुवंशीचं दुसरं लग्नही झालेलं?  तपासादरम्यान सापडलेल्या दुसऱ्या मंगळसूत्रानं गूढ वाढवलं!
13
ENG vs IND : कॅप्टन आयुष म्हात्रेवर 'गोल्डन डक'ची नामुष्की; वैभव सूर्यंवशी टिकला, पण...
14
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
15
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच उद्धवसेना-मनसेला खिंडार; अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील
16
५० वर्षांची महिला मुलाच्या वर्गमित्राच्याच प्रेमात पडली, संसार थाटला अन् आता...! अशी सुरू झाली "Love story"
17
“हिंदीचा निर्णय RSSचा अजेंडा राबवायची जनमतचाचणी, भारताची विविधतेतील एकता संपवायचा प्रयत्न”
18
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी
19
कोलकाता बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी निघाला ‘हिस्ट्रीशीटर’; मोनोजितवर आधीच दाखल आहेत मोठे गुन्हे!
20
रनवेवरून हवेत झेपावेपर्यंत सर्वकाही ठीक होते; हवेत गेले तरी... एअर इंडिया विमान अपघातावर मोठी अपडेट

शिवसेनेचे एकला चलो रे...

By admin | Updated: March 10, 2016 04:01 IST

जिथे राष्ट्रीय पक्षांना चाळीशीचा आकडा पार करता आला नाही, तिथं आमच्या प्रादेशिक पक्षाने ६३ आमदार निवडून आणले. विधानसभेच्या निवडणुकीत आम्हाला अजून थोडा वेळ मिळाला असता

पुणे/सातारा : जिथे राष्ट्रीय पक्षांना चाळीशीचा आकडा पार करता आला नाही, तिथं आमच्या प्रादेशिक पक्षाने ६३ आमदार निवडून आणले. विधानसभेच्या निवडणुकीत आम्हाला अजून थोडा वेळ मिळाला असता तर तुमच्या बरोबरच नाही तर तुमच्याही पुढे गेलो असतो. युती होणार की नाही, यात वेळ वाया गेला. पण हरकत नाही. पुढच्या वेळी विधासभेवर शिवसेनेचाच भगवा फडकेल, असे सांगून इथूनपुढे ‘एकला चलो रे’ अशीच शिवसेनेची भूमिका असेल, असे स्पष्ट संकेत उद्धव ठाकरे यांनी दिले.सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील सोळशी येथे पुणे शहर शिवसेनेच्या कार्यकर्त्यांचे तीन दिवसीय निवासी प्रशिक्षण शिबिराचे आयोजित करण्यात आले आहे. त्याचे उद्घाटन ठाकरे यांच्या हस्ते झाले. जलसंपदामंत्री विजय शिवतारे, आमदार डॉ़ नीलम गोऱ्हे, शशीकांत सुतार, संपर्क प्रमुख डॉ़ अमोल कोल्हे, शिवसेना शहर प्रमुख विनायक निम्हण, माजी आमदार चंद्रकांत मोकाटे, महादेव बाबर व्यासपीठावर उपस्थित होते़ ठाकरे म्हणाले, की संसदेत पठाणकोट हल्ल्यावर चर्चा अपेक्षित होती़ ‘‘छाती किती आहे, हे महत्त्वाचे नाही तर ती निधडी हवी़ पठाणकोट हल्ल्यातील शहिदांचे रक्त सुकायच्या आत सरकारला क्रिकेट महत्त्वाचे वाटत आहे़ हिमाचल प्रदेश असमर्थता दाखवत असताना क्रिकेट कंट्रोल बोर्ड आम्ही सुरक्षा पुरवू, असे सांगत आहे़ हा देश केंद्र सरकार चालवतेय की क्रिकेट कंट्रोल बोर्ड?’’ अशा शब्दांत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली़ धर्माचा द्वेष करायला मला शिकविले नाही़ देश हाच माझा धर्म आहे़ कोणी त्याच्या धर्माचा अभिमान घेऊन उभा राहणार असेल तर हिंदुत्व हा गुन्हा नाही़ मुस्लिम मताचे राजकारण होणार असेल तर मी हिंदुंचे राजकारण का करु नये, असा प्रश्नही ठाकरे यांनी केला. स्मार्ट सिटीवर टीका करताना ते म्हणाले, की मुंबई, पुणे हे स्वत:हून स्मार्ट असताना पुन्हा त्यांना पावडर वगैरे लावायची गरज नाही़ पुण्याचे पुणेपण टिकवायचे आहे़ (प्रतिनिधी)