शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
3
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
4
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
5
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
6
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
7
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
8
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
9
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
10
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
11
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
12
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
13
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
14
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
15
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
16
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
17
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
18
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
19
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
20
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
Daily Top 2Weekly Top 5

नागपूरमध्ये सरकार विरोधात शिवसेनेचे धरणे

By admin | Updated: July 5, 2016 15:15 IST

सरकारने घेतलेले निर्णय कादावरच असल्याने शेतकरी लाभापासून वंचित आहे. याकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी शिवसेनेचेमाजी खासदार प्रकाश जाधव यांच्या नेतृत्वात धरणे देण्यात आले.

 शासन निर्णय  कागदावरच : शेतकरी लाभापासून वंचित 
ऑनलाइन लोकमत
नागपूर, दि. ५ -  राज्य सरकारने ५० टक्केपेक्षा कमी पैसेवारी असलेल्या क्षेत्राला दृष्काळ सदृश जाहीर केले आहे. यात नागपूर जिल्ह्यातील ११७२ गावांचा समावेश आहे. त्यानुसार या गावातील शेतकºयांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळणे अपेक्षित होते. परंतु सरकारने घेतलेले निर्णय  कादावरच असल्याने शेतकरी लाभापासून वंचित आहे. याकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी शिवसेनेचे माजी खासदार प्रकाश जाधव यांच्या नेतृत्वात मंगळवारी संविधान चौकात धरणे दिली. सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. 
कमी पैसेवारी असलेल्या गावातील कर्ज वसुलीला स्थगिती, पीक कर्जाचे पुनर्रगठन, जमीन महसुलात सूट, कृषी पंपाच्या वीज देयकात ३३.५ टक्के सवलत, थकीत वीज बिल असलेल्या कृषी पंपाचा वीज पुरवठा खंडीत न करणे,  विद्यार्थ्यांना शुल्क माफी व टंचाईग्रस्त गावांना टँकरव्दारे पाणीपुरवठा  आदी  निर्णय घेण्यात आले होते. 
राज्यात शिवसेना -भाजप युतीचे सरकार आहे. परंतु शासनाच्या निर्णयाची अंमलबजावणी होत नसल्याने शिवसेनेला आंदोलनाची भूमिका घ्यावी लागत आहे. विशेष म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी, पालकमंत्री चंद्रशेखव बावनकुळे यासारखे वजनदार नेते येथील असूनही शेतक-यांना शासन निर्णयाचा लाभ मिळत नसल्याचे खंत जाधव यांनी व्यक्त केली. 
गेल्या तीन वर्षापासून सतत शेतकºयांना नैसर्गिक आपत्तीचा सामना करावा लागत आहे. संकटग्रस्त शेतकºयांना मदत देण्याचा निर्णय जाहीर केला परंतु शेतकºयांना याचा अद्यापही लाभ मिळालेला नाही. थकबाकी असल्याचे कारण पुढे करून बँक शेतकºयांना पीक कर्ज देत नसल्याचे चित्र आहे. प्रशासन व बँका यांच्यात सममन्वय नाही. थकबाकीमुळे शेतकºयांचा वीज पुरवठा खंडीत केला जात आहे. कर्जाची सक्तीने वसुली सुरू आहे. पीक विम्याच्या रकमेतून बँका परस्पर कपात करीत आहे. त्यामुळे शासनाच्या निर्णयाचा शेतक-यांना कोणताही लाभ मिळाला नसल्याची माहिती जाधव यांनी दिली.