शहरं
Join us  
Trending Stories
1
'युद्धविरामासाठी भारताला विनंती केली', ऑपरेशन सिंदुरबाबत पाकिस्तानच्या उप-पंतप्रधानांची कबुली
2
वाहनधारकांसाठी खुशखबर! ‘एचएसआरपी’ नंबरप्लेटसाठी तिसऱ्यांदा मुदतवाढ
3
'परिवार का साथ, परिवार का विकास...', बिहारमधून पीएम मोदींची काँग्रेस-राजदवर खोचक टीका
4
हल्ल्यात २ एअरबेस उद्धवस्त, पाकची कबुली; युद्धविरामसाठी भारताला कुणी केला होता फोन?
5
Mumbai Local Fight : मुंबई लोकलमध्ये चढताना धक्का लागला अन् तरुणीचा पारा चढला; महिलेला रक्तबंबाळ होईपर्यंत मारलं
6
ENG vs IND, 1st Test: गिलनं IPL जोडीदार साई सुदर्शनला दिली पदार्पणाची संधी; करुण नायरसह शार्दुल ठाकूरवरही भरवसा
7
पुण्यावरून कोकणात जाताय, थांबा! वरंध घाट मार्ग तीन महिने राहणार बंद; आता कोणत्या मार्गाने प्रवास कराल?
8
Video - धक्कादायक वास्तव! छतावरुन टपकतंय पाणी, वर्गात छत्री घेऊन शिकताहेत ६८ मुलं
9
इस्रायलसोबत युद्ध सुरू असताना अचानक ३ इराणी विमाने ओमानमध्ये पोहोचली, नेमकं कारण काय?
10
पैसे कुठे खर्च होतात कळत नाही? 'या' ५ ॲप्समुळे खर्च ट्रॅक करणे होईल सोपे, आता तुम्हीही व्हा बजेट एक्सपर्ट!
11
सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; ३ दिवसांत ४ हजारांनी घसरली चांदीची किंमत; पाहा लेटेस्ट रेट
12
Two-Wheeler New Rules : नवीन सर्व दुचाकींना 'एबीएस आणि दोन हेल्मेट' सक्तीचे; केंद्रीय परिवहन मंत्रालयाचा मोठा निर्णय
13
कुणी फुकट खाऊ घालत नाही...! आसिम मुनीर-डोनाल्ड ट्रम्प 'लन्च पॉलिटिक्स'नं पाकिस्तानचंच टेन्शन वाढवलं
14
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेवेळी एका टिफिनवाल्याने वाचवला ८० डॉक्टरांचा जीव
15
पोरी हुश्शार! एकत्र बालपण अन् आता एकत्र झाल्या IAS; शिक्षकाच्या लेकींनी रचला इतिहास
16
Pandharpur Wari 2025: आता स्वस्तात करा विठ्ठलाचे दर्शन; एसटी महामंडळाची खास ऑफर!
17
१ जुलैपासून बदलणार बँकिंगचे नियम, क्रेडिट कार्ड बिल पेमेंटमध्येही होणार बदल; जाणून घ्या माहिती
18
क्रुझर प्रेमींची पहिली पसंत; नवीन अवतारात येणार Bajaj ची Avenger, किंमत फक्त...
19
Debt on US: ट्रम्प अडकले... संकटात अमेरिका; कर्ज ३७ ट्रिलियन डॉलर्सच्या पार, भारताचं किती देणं लागतो US
20
आधी स्वत:च पत्नीचं कुंकू पुसलं, नंतर बॉयफ्रेंडसोबत लग्न लावलं; पती म्हणतो, “मला विष देऊन...”

नागपूरमध्ये सरकार विरोधात शिवसेनेचे धरणे

By admin | Updated: July 5, 2016 15:15 IST

सरकारने घेतलेले निर्णय कादावरच असल्याने शेतकरी लाभापासून वंचित आहे. याकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी शिवसेनेचेमाजी खासदार प्रकाश जाधव यांच्या नेतृत्वात धरणे देण्यात आले.

 शासन निर्णय  कागदावरच : शेतकरी लाभापासून वंचित 
ऑनलाइन लोकमत
नागपूर, दि. ५ -  राज्य सरकारने ५० टक्केपेक्षा कमी पैसेवारी असलेल्या क्षेत्राला दृष्काळ सदृश जाहीर केले आहे. यात नागपूर जिल्ह्यातील ११७२ गावांचा समावेश आहे. त्यानुसार या गावातील शेतकºयांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळणे अपेक्षित होते. परंतु सरकारने घेतलेले निर्णय  कादावरच असल्याने शेतकरी लाभापासून वंचित आहे. याकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी शिवसेनेचे माजी खासदार प्रकाश जाधव यांच्या नेतृत्वात मंगळवारी संविधान चौकात धरणे दिली. सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. 
कमी पैसेवारी असलेल्या गावातील कर्ज वसुलीला स्थगिती, पीक कर्जाचे पुनर्रगठन, जमीन महसुलात सूट, कृषी पंपाच्या वीज देयकात ३३.५ टक्के सवलत, थकीत वीज बिल असलेल्या कृषी पंपाचा वीज पुरवठा खंडीत न करणे,  विद्यार्थ्यांना शुल्क माफी व टंचाईग्रस्त गावांना टँकरव्दारे पाणीपुरवठा  आदी  निर्णय घेण्यात आले होते. 
राज्यात शिवसेना -भाजप युतीचे सरकार आहे. परंतु शासनाच्या निर्णयाची अंमलबजावणी होत नसल्याने शिवसेनेला आंदोलनाची भूमिका घ्यावी लागत आहे. विशेष म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी, पालकमंत्री चंद्रशेखव बावनकुळे यासारखे वजनदार नेते येथील असूनही शेतक-यांना शासन निर्णयाचा लाभ मिळत नसल्याचे खंत जाधव यांनी व्यक्त केली. 
गेल्या तीन वर्षापासून सतत शेतकºयांना नैसर्गिक आपत्तीचा सामना करावा लागत आहे. संकटग्रस्त शेतकºयांना मदत देण्याचा निर्णय जाहीर केला परंतु शेतकºयांना याचा अद्यापही लाभ मिळालेला नाही. थकबाकी असल्याचे कारण पुढे करून बँक शेतकºयांना पीक कर्ज देत नसल्याचे चित्र आहे. प्रशासन व बँका यांच्यात सममन्वय नाही. थकबाकीमुळे शेतकºयांचा वीज पुरवठा खंडीत केला जात आहे. कर्जाची सक्तीने वसुली सुरू आहे. पीक विम्याच्या रकमेतून बँका परस्पर कपात करीत आहे. त्यामुळे शासनाच्या निर्णयाचा शेतक-यांना कोणताही लाभ मिळाला नसल्याची माहिती जाधव यांनी दिली.