शहरं
Join us  
Trending Stories
1
"आपल्याजवळ शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषाही ऐकतं’’, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान 
2
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
3
बीसीसीआयकडून सचिन तेंडुलकरला मोठा सन्मान, मुंबई मुख्यालयात दिसणार 'एसआरटी १००' नावाचा बोर्ड रूम
4
Video - एक, दोन नव्हे तर चोरांची अख्खी गँगच; काही सेकंदात खिशातून लंपास केला फोन अन्...
5
पाच बायका, शाहबाज शरीफ यांची लव्ह स्टोरी ऐका, चुलत बहिणीशी केलं पहिलं लग्न, त्यानंतर...
6
नातेवाईकावर अंत्यसंस्कार करून आंघोळीसाठी नदीत उरतले, बाप-लेकासह तिघांचा बुडून मृत्यू
7
अलिशान स्पोर्ट्स कारवरील स्क्रॅच बघून संतापला रोहित शर्मा; भावावर असा काढला राग (VIDEO)
8
INDvENG: श्रेयस अय्यरला टीम इंडियात न घेण्याचं BCCIने दिलं 'टुकार' कारण, ऐकून तुम्हालाही येईल राग
9
अनाथ मुलीला दत्तक घेऊन वाढवलं, तिनेच आईला संपवलं; इन्स्टाग्रामने उलगडलं हत्येचं गूढ
10
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा
11
Astro Tips: जे पुरुष घरात झाडूने साफसफाई करतात, ते झटपट श्रीमंत होतात; कसे ते पहा!
12
नालासोपाऱ्यात मेफेड्रोन ड्रग्सचा कारखाना उद्ध्वस्त, तुळींज पोलिसांची प्रगतीनगर परिसरात कारवाई
13
Virat Kohli: विराट कोहलीची जर्सी खरेदी करण्यासाठी चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर चाहत्यांची झुंबड, व्हिडीओ होतोय व्हायरल!
14
पाकिस्तानविरुद्धच्या संघर्षादरम्यान या पिल्लांना सरकारने दिली झेड प्लस सुरक्षा, ७०० किमी दूर केली रवानगी
15
कॅन्सरसोबत झुंज ठरली अपयशी! ४४ वर्षीय प्रसिद्ध गायिकेचं निधन, चाहत्यांनी व्यक्त केली हळहळ
16
अरे बापरे! एका छोट्याशा चुकीमुळे होऊ शकतो प्रेशर कुकरचा भीषण स्फोट; सेफ्टीसाठी 'हे' करा
17
भारतीय सैन्याची मोठी तयारी!६ जण ठार, ११ जणांच्या खात्म्यासाठी ऑपरेशन; लष्कर -जैश'च्या दहशतवाद्यांचा शोध सुरू
18
Astro Tips: मुलांची दहावी, बारावी झाली की पालकांनी ग्रहदशा जाणून घेत मुलांचे करिअर ठरवणे उत्तम!
19
आयकर अधिकारी सांगून छगन भुजबळ यांच्याकडे मागितली एक कोटीची खंडणी; युवक अटकेत
20
पंख्याच्या हवेवरून वरातीत पेटला वाद, लाठ्या-काठ्या, दगड धोंडे घेऊन तुंबळ हाणामारी, एकाचा मृत्यू  

शिवसेनेची केंद्रावर, तर एकनाथ खडसेंची सेनेवर टीका!

By admin | Updated: May 13, 2015 01:54 IST

भूसंपादन विधेयकावरून शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी लोकसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारवर सडकून टीका केली

मुंबई : भूसंपादन विधेयकावरून शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी लोकसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारवर सडकून टीका केली. प्रस्तावित भूसंपादन विधेयकामुळे शेतकरी देशोधडीला लागतील, असे सांगत सरकार उद्योगपतींकडील जमिनी परत घेणार का, असा सवालही खा. सावंत यांनी उपस्थित केला.महाराष्ट्रात गारपीट आणि अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीबाबत केंद्र आणि राज्य सरकारमध्ये एकवाक्यता नाही. राज्याचे कृषिमंत्री एकनाथ खडसे म्हणतात, केंद्राकडे मदतीचा प्रस्ताव पाठवला आहे; तर केंद्रीय कृषिमंत्री राधामोहन सिंह म्हणतात, प्रस्ताव आलाच नाही. तेव्हा नेमके खरे काय, असा सवाल शिवसेनेच्या मुखपत्रातूनही विचारण्यात आला आहे. शिवसेनेच्या या टीकेला प्रत्युत्तर देताना शिवसेना अजूनही सत्ताधारी पक्षाच्या मानसिकतेत नाही, असा टोला कृषिमंत्री खडसे यांनी लगावला. ते म्हणाले, केंद्रीय कृषिमंत्री सिंह यांनी लेखी उत्तरात मदतीचा प्रस्ताव आलेला नसल्याचे सांगितले. हा प्रश्न ४० दिवसांपूर्वी त्यांच्याकडे गेला तेव्हा वादळ, गारपीट झालेली नव्हती. परंतु गारपीट झाल्यावर आपण स्वत: तसेच प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी भेटून मदतीचा प्रस्ताव दिला होता. अर्थमंत्री अरुण जेटली यांना भेटून मागणी केली होती. त्यामुळे लेखी उत्तर व वास्तव यामध्ये तफावत आली. शिवसेनेने माझ्याशी चर्चा केली असती तर त्यांना हे सांगितले असते. आता तरी शिवसेनेने माझा खुलासा छापला तर मला आनंद होईल, असेही खडसे म्हणाले. (विशेष प्रतिनिधी)