शहरं
Join us  
Trending Stories
1
जिंकलो रे राजेहो ! उपोषण सोडताना मनोज जरांगे यांचे आनंदोद्गार; आंदोलकांनी उधळला गुलाल
2
टीम इंडियाच्या मुख्य प्रायोजकत्वासाठी अर्ज करा! BCCIने मागविल्या बोली; अंतिम तारीखही दिली
3
कळा वाढल्याने भररस्त्यात रुग्णवाहिकेतच केली प्रसूती; डॉक्टरांच्या निर्णयामुळे मायलेक सुखरूप
4
माझ्या आईबद्दल अपशब्द वापरणाऱ्यांना बिहारची जनता माफ करणार नाही : पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
एलिफंटा, न्हावा बेटावर पर्यटनासाठी मास्टर प्लॅनिंग; सिडको करणार विकास; ग्रामस्थ संभ्रमात
6
दहशतवादाविरोधात दुतोंडी भूमिका नको; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे SCO मध्ये पाकिस्तानला खडेबोल
7
जम्मू काश्मीर: पूंछ जिल्ह्यामध्ये दहशतवाद्यांचा घुसखोरीचा प्रयत्न भारतीय लष्कराने हाणून पाडला !
8
अफगाणिस्तानच्या पूर्व भागात रात्री ६ रिक्टर स्केल क्षमतेचा तीव्र भूकंप; ८०० लोकांचा मृत्यू
9
मराठा आरक्षण: सरकारचा मसुदा तयार; लवकरच निर्णय; मुख्यमंत्री अन् उपसमितीची संयुक्त बैठक
10
अफगाणिस्तान पुन्हा भूकंपाने हादरला, २४ तासांत दुसरा मोठा धक्का; मदतकार्यात अडथळे
11
रिलायन्स-सुझलॉनसह 'हे' ५ शेअर करणार कमाल! ब्रोकरेज फर्मने दिली टार्गेट प्राइज; ३८ टक्केंपर्यंत होणार वाढ?
12
जगभरातील प्रेमी युगुलांना एकत्र आणणाऱ्या नेस्ले कंपनीच्या सीईओची नोकरी गेली; कर्मचाऱ्यासोबत प्रेमसंबंध भोवले
13
कन्नड अभिनेत्री रान्या राव हिला DRI ने ठोठावला 102 कोटी रुपयांचा दंड
14
Manoj Jarange Patil Maratha Morcha Live: सर्व मागण्या मान्य; मनोज जरांगे पाटील यांनी अखेर आपले उपोषण सोडले
15
'मराठा-कुणबी एक' जीआर काढण्यासंदर्भात काय म्हणालं सरकारचं शिष्टमंडळ? जरांगेंनी स्वतःच सांगितलं
16
तुमच्या ताकदीवर आपण जिंकलो, मनोज जरांगेंची घोषणा; वाचा, ८ मागण्या अन् ८ सरकारी आश्वासने कोणती?
17
टीम इंडियाला लवकरच मिळणार नवा Sponsor! या मंडळींसाठी BCCI नं लावली नो एन्ट्रीची पाटी
18
मुकेश अंबानींच्या कंपनीचा शेअर १०% नं वाढला, खरेदीसाठी गुंतवणूकदारांची झुंबड; आता ₹१९ वर आला
19
लग्नाच्या १७ वर्षांनंतर राहुल देशपांडेच्या संसाराचे सूर बिघडले, पत्नीपासून झाला विभक्त
20
चेन स्मोकर आहे किम जोंग उन! उत्तर कोरियाचा हुकूमशहा एका दिवसात किती सिगारेट ओढतो?

युतीमध्ये शिवसेनेची २५ वर्षे सडली!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2017 01:05 IST

युतीमध्ये राहून आमची २५ वर्षे सडली. यापुढे जे काही असेल, ते माझ्या शिवसेनेचे, शिवसैनिकांचे असेल. महापालिका, जिल्हा परिषदांमध्ये मी कुठेही युती करणार नाही.

मुंबई : युतीमध्ये राहून आमची २५ वर्षे सडली. यापुढे जे काही असेल, ते माझ्या शिवसेनेचे, शिवसैनिकांचे असेल. महापालिका, जिल्हा परिषदांमध्ये मी कुठेही युती करणार नाही. आता लढाई सुरू झाली आहे. आम्ही मुंबई, ठाणे, नाशिक सगळे जिंकणार. यापुढे राज्यात स्वबळावरच भगवा फडकविणार, असे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी पक्षाच्या मेळाव्यात जाहीर केले.देशासाठी, हिंदुत्वासाठी आम्ही तुमचा ‘उदोउदो’ करत बसलो. आम्ही सत्तेचे लोभी नाही, शिवसेना सत्तेसाठी जन्माला आलेली नाही, शिवसेनेला कोणी कमी लेखत असेल, तर मी त्याला जागेवर शिल्लक ठेवणार नाही, माझी तयारी निखाऱ्यावर चालण्याची आहे, तुमची आहे का? मला अस्तनीतील निखारे नकोत. तुम्ही मला वज्रमूठ द्या, दात पाडायचे काम मी करून दाखवतो.भाजपाने ११४ जागा मागणे, हा शिवसेनेचा अपमान नाही का? असा सवाल करून ठाकरे म्हणाले की, आमची युती झाली, तेव्हा कोणाची हवा होती ते आठवा. २०१२ मध्ये महापालिकेत आपण कामांच्या जोरावर लोकांसमोर गेलो होतो. त्या वेळी तुम्ही विवंचनेत होता, तेव्हा शिवसेनेच्या कामगिरीने तुम्हाला वाचवलं, हे तुम्ही विसरलात? शिवसैनिक मरमर राबतो आणि मुंबई जिंकतो. त्यानंतर, नगरसेवक वचननामा अंमलात आणतात. मग कशासाठी तुम्हाला जास्त जागा देऊ? आम्ही कधी उपमुख्यमंत्रिपद, चांगली खाती मिळावी असे मागितले का? हे सरकार चालावे, म्हणून आम्ही तुमच्यासोबत आहोत. माझ्या घरामध्ये घुसून माझ्यावर येणार असाल, तर मी तुमची पंचारती करू?, असा हल्लाबोल उद्धव यांनी केला. सुनील प्रभू आणि स्नेहल आंबेकर या दोन आजी-माजी महापौरांचा उद्धव यांनी सत्कार केला. (प्रतिनिधी)