शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेत महागाई वाढली, डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफवर घेतला यू-टर्न; भारताला मोठा फायदा होणार
2
लालू प्रसाद यादवांच्या मुलीचा खळबळजनक आरोप! रोहिणी म्हणाल्या "तेजस्वीने मला घरातून बाहेर..."
3
Rohini Aacharya: लालू प्रसाद यादवांच्या घरात ज्यांच्यामुळे सुरू झालं 'महाभारत', ते संजय यादव कोण?
4
एका वर्षात तिसरी वेळ! भारताच्या शेजारी देशात सापडली तब्बल १००० टन सोन्याची खाण, कोणता आहे देश?
5
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आज कराडात! सातारा जिल्ह्यामधील महाविकास आघाडी बाबत होणार निर्णय?
6
मुंबईत मोठी दुर्घटना! भायखळ्यातील बांधकाम सुरू असलेल्या इमारतीजवळ मातीचा ढिगारा कोसळला; २ मजुरांचा मृत्यू, ३ जखमी
7
दिल्ली ब्लास्ट प्रकरण : आता पठानकोटमधून आणखी एका डॉक्टरला अटक, अल-फलाह विद्यापीठात केली होती नोकरी
8
IPL 2026 : अय्यरसह मसल पॉवर रसेल OUT! मिनी लिलावासाठी शाहरुखच्या KKR च्या पर्समध्ये सर्वाधिक पैसा
9
इराण देशभरातील लोकांच्या मोबाईल फोनवर 'इमरजन्सी अलर्ट' का पाठवत आहे?
10
IPL 2026: प्रितीच्या पंजाबनं ग्लेन मॅक्सवेलला दाखवला ठेंगा! कोच रिकी पाँटिंगनं सांगितली आतली गोष्ट
11
जी मोटारसायकल चोरली, तिच्यावरच गेला जीव; मिरज रोडवर चोर ठार, कसा घडला अपघात?
12
Amravati Crime: छायाचा घरी येणाऱ्या विश्वंभरवर जडला जीव, पती प्रमोदची देवी दर्शनानंतर केली हत्या; लंघुशंकेसाठी थांबली अन्...
13
चुकूनही करू नका 'हे' काम, क्षणार्धात तुमचा मोबाईल फोन होऊ शकतो हॅक! गुगलने काय इशारा दिला?
14
नोकरी सोडून आयपीएस अधिकारी उतरले बिहार निवडणुकीच्या मैदानात; मराठमोळ्या लांडेंना किती मिळाली मते?
15
"रडायचं नाही लढायचं! बिहार निकालानं खचून जाऊ नका; मुंबई महापालिकेवर काँग्रेसचा झेंडा फडकवा"
16
मशिदीचा पत्ता, मोबाइल SIM, थायलंड टूर अन्...! डॉ. शाहीन संदर्भात मोठा खुलासा; डॉ परवेझला कशासाठी नेलं होतं कानपूरला?
17
दिल्ली स्फोटापूर्वी उमर घाबरला होता, नवीन सीसीटीव्हीमध्ये खुलासा, दोन्ही फोन कुठे लपवले?
18
Ravindra Jadeja : जड्डूनं केली विक्रमांची 'बरसात'! WTC मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला
19
Travel : नवीन वर्ष परदेशात सेलिब्रेट करायचा विचार करताय? 'या' देशांमध्ये होऊ शकते खिशाला परवडणारी ट्रीप!
20
'भाजपाला फायदा करून देण्याची सुपारी घेतलीय का?'; काँग्रेसच्या स्वबळाच्या निर्णयावर शरद पवार गट नाराज
Daily Top 2Weekly Top 5

शिवसेनेला अजूनही काँग्रेसची आस

By admin | Updated: April 20, 2017 04:10 IST

एकहाती सत्ता संपादित केल्यानंतर स्थायी समितीच्या चाव्या आपल्या हाती घेण्यासाठी काँग्रेसचे गटनेते यासीन कुरेशी यांनी मुंबई उच्च न्यायालयात,

ठाणे : एकहाती सत्ता संपादित केल्यानंतर स्थायी समितीच्या चाव्या आपल्या हाती घेण्यासाठी काँग्रेसचे गटनेते यासीन कुरेशी यांनी मुंबई उच्च न्यायालयात, तर शिवसेनेने ठाणे न्यायालयात याचिका दाखल केली होती. परंतु, ठाणे न्यायालयाने याचिका फेटाळल्याने शिवसेनेने पुन्हा जिल्हा सत्र न्यायालयात अपील केले असून त्यावर २० एप्रिलला निर्णय येणे अपेक्षित आहे. ते करताना शिवसेनेने काही महत्त्वाच्या बाबी त्यात समाविष्ट केल्या आहेत. त्यामुळे स्थायी समितीच्या प्रक्रियेला स्थगिती मिळण्याची दाट शक्यता आहे. ठाण्यात शिवसेनेला तब्बल ६७ जागांवर यश मिळाले असून स्थायी समितीची गणिते जुळवण्यासाठी ७० नगरसेवकांचे बल त्यांना अपेक्षित होते. त्यानुसार, त्यांनी काँग्रेसला गळ घातली. त्यानुसार, काँग्रेसचे गटनेते यासीन कुरेशी यांनी शिवसेनेला पाठिंबा देण्याचे कोकण विभागीय आयुक्तांना पत्रदेखील दिले. परंतु, आता त्यांच्याच पक्षातील दोन नगरसेवकांनी गटनेत्यांनी विश्वासात न घेता निर्णय घेतल्याचे सांगून कोकण विभागीय आयुक्तांना पत्र देऊन आमचा राष्ट्रवादीला पाठिंबा असल्याचे जाहीर केले. त्यानुसार, कोकण विभागीय आयुक्तांनी या दोन नगरसेवकांच्या म्हणण्यानुसार गटनेत्यांचे पत्र अयोग्य ठरवून काँग्रेस राष्ट्रवादीबरोबर असल्याचे सांगून तसे तौलनिक पक्षीय संख्याबल जाहीर केले. कायदेशीर आणि तांत्रिक मुद्यांच्या आधारावर काँग्रेसच्या तीनपैकी चव्हाण आणि भगत या दोन नगरसेवकांची नोंदणी राष्ट्रवादीच्या गटात झाली. परंतु, कुरेशी यांचीही नोंदणी शिवसेनेच्या गटात होऊ शकली नाही. त्यामुळे शिवसेनेला धक्का बसला आहे. एकूणच, बदललेल्या या परिस्थितीमुळे शिवसेनेने ठाणे न्यायालयात, तर कुरेशी यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. कोकण विभागीय आयुक्तांचा निर्णय चुकीचा असून काँग्रेसचे विभाजन करण्याचा अधिकार त्यांना नाही. तसेच, कुरेशी यांना स्वतंत्र ठेवण्याचा निर्णयही अनाकलनीय असल्याचे शिवसेनेचे म्हणणे होते. त्यामुळे या निर्णयाला स्थगिती द्यावी, अशी याचिका बारटक्के यांनी केली होती. ती फेटाळण्यात आल्याने शिवसेना बॅकफुटवर गेली होती. बुधवारी नव्याने शिवसेनेने जिल्हा सत्र न्यायालयात अपील केले. तसेच मुंबई उच्च न्यायालयातील अपीलही कायम ठेवले आहे. २० एप्रिलला यावर आता सुनावणी होणार आहे. (प्रतिनिधी)