शहरं
Join us  
Trending Stories
1
उत्तर प्रदेशमध्ये मतदार यादीतून तब्बल २.८९ कोटी लोकांची नावं वगळणार, SIRबाबत धक्कादायक माहिती समोर 
2
‘सर्व भारतीयांना अमेरिकेतून बाहेर काढा, अन्यथा…’, अमेरिकन पत्रकाराचं वादग्रस्त विधान   
3
पळवा पळवी! पंतप्रधान मोदींच्या कार्यक्रमानंतर लोकांनी कुंड्या, होर्डिंग आणि पुतळे पळवले   
4
स्वबळावर लढणाऱ्या काँग्रेसला ठाकरेंकडून मोठा धक्का, माजी नगरसेवक चंगेज मुलतानी उद्धवसेनेत
5
IND W vs SL W T20I : शफालीची वादळी खेळी! विजयी हॅटट्रिकसह टीम इंडियाचा मालिकेवर कब्जा; हरमनप्रीतनंही रचला इतिहास
6
"भाजपचे लोक हुशार, विरोधकांना सतत होमवर्क देतात", 'धुरंधर'चं नाव घेत कुमार विश्वास यांचा टोला
7
सीरियामध्ये मोठा हल्ला! नमाज पठणादरम्यान मशिदीत स्फोट, ८ जणांचा मृत्यू, १८ जण जखमी
8
IND W vs SL W : पहिल्या ओव्हरमध्ये धुलाई; मग रेणुकानं असा काढला राग! शेवटी 'चार चौघीं'वर पडली भारी
9
‘निष्ठावंतांना उमेदवारी न दिल्यास ते ज्या पक्षात जातील त्याचा प्रचार करणार’, भाजपाच्या ज्येष्ठ आमदाराचा इशारा
10
छत्रपती संभाजीनगरात एमआयएममध्ये 'राडा'; अधिकृत उमेदवारावर पक्ष कार्यकर्त्यांचाच हल्ला!
11
"भाजपाच्या पाठिंब्याशिवाय शिंदेसेना जिंकू शकत नाही"; मीरा-भाईंदरमध्ये महायुतीसाठी अटीशर्ती
12
लेडी DSP दीप्ती शर्मानं रचला इतिहास! असा पराक्रम करणारी ठरली पहिली भारतीय गोलंदाज
13
Ishan Kishan ने ठोकली सलग दोन शतकं, तरीही संघातून बाहेर; BCCIच्या आदेशानंतर घरी का परतला?
14
दिल्लीकडून खेळताना किंग कोहलीची ‘विराट’ कामगिरी! नव्या विश्वविक्रमासह ऑस्ट्रेलियन दिग्गजाला धोबीपछाड
15
"धर्म आणि विज्ञान यांच्यात कुठलाही संघर्ष नाही; दोघांचेही ध्येय एकच...!" नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
16
पित्याला मृत्युच्या दाढेतून ओढलं, थेट मगरीशी भिडला, चिमुकल्या अजयराजच्या शौर्याची कहाणी!
17
पुतण्यानेच रचला चुलत्याच्या हत्येचा कट; पराभवाचा बदला घेण्यासाठी मंगेश काळोखेंची हत्या, तटकरेंच्या निकटवर्तीयावरही गुन्हा दाखल
18
"कितीही अडथळे आले तरी परत आणणारच"; मोदी-माल्यांच्या लंडनमधील ‘त्या’ मस्करीला भारताचं चोख प्रत्युत्तर
19
"लोकं अडकून पडलेत, मुलांचं शिक्षण रखडलंय"; H1B व्हिसा मुद्द्यावर भारताची अमेरिकेशी चर्चा
20
जावळ काढण्याच्या प्रथेत आईचेही बळजबरीने मुंडन; दौंडमधील महिलांची राज्य महिला आयोगाकडे तक्रार
Daily Top 2Weekly Top 5

प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवरच दहशतवाद्यांना जेरबंद केल्याच्या बातम्या येतात : शिवसेना

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2020 12:37 IST

स्वातंत्र्यदिन, प्रजासत्ताक दिनाचे सोहळे आले की, अतिरेकी बॉम्ब-बंदुका घेऊन बिळातून बाहेर पडतात.

मुंबई : प्रजासत्ताक दिनी हल्ले करण्याचा कट तूर्त तरी कश्मीर पोलिसांनी उधळला आहे. आता लवकरच आणखी एक बातमी दिल्लीच्या दिशेने सरकेल ती म्हणजे, दिल्लीतील प्रजासत्ताक दिनावर हल्ला करण्यासाठी घुसलेल्या चार-पाच सशस्त्र अतिरेक्यांना अटक केली. पंतप्रधान मोदी यांच्यावरही हल्ला करण्याचा त्यांचा कट होता. तो उधळला गेला, अशा बातम्यांचे नवल आता कुणाला राहिलेले नसल्याचे म्हणत सामनामधून शिवसनेने सरकावर निशाणा साधण्यात आला आहे.

स्वातंत्र्यदिन, प्रजासत्ताक दिनाचे सोहळे आले की, अतिरेकी बॉम्ब-बंदुका घेऊन बिळातून बाहेर पडतात. कॅलेंडर घेऊनच ते बिळात पडलेले असतात व राष्ट्रीय सोहळय़ांच्या तारखा पाहून बाहेर पडतात. मग ते बाहेर पडले की, त्यांचे कट कसे उधळून लावले अशा बातम्या प्रसिद्ध होतात. हे गेली कित्येक वर्षे सुरू असल्याचा टोला सामनामधून सरकारला लगावला आहे.

प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर दहशतवाद्यांना जेरबंद करणे ही प्रत्येक वर्षी होणारी कारवाई आहे. आताही ते पुन्हा पकडले गेले आहेत आणि कश्मीर तसेच राजधानी दिल्लीत दहशतवादी हल्ला करण्याचा कट उधळला गेला आहे. दिल्लीचाच नव्हे तर कश्मीर खोऱ्यात फडकणारा प्रत्येक तिरंगा सुरक्षित राहिला पाहिजे, असेही सामनातून शिवसेनेकडून सांगण्यात आले आहे.

तर कश्मीरात सीमेपलीकडून घुसखोरी होत आहे, पण कश्मीरातील दहशतवाद्यांना सुखरूप सीमेपलीकडे नेण्यासाठी पोलीस यंत्रणेचा वापर होत आहे व त्याकामी राष्ट्रपती पदक विजेते पोलीस उपअधीक्षकच आता पकडले गेले आहेत. पोलिसांचा वापर करून कश्मीरात सरकार काही वेगळे उद्योग करीत होते. त्यामुळे ‘पुलवामा’ हल्ल्याबाबत कोणी संशय व्यक्त केला तर देशाचे गृहमंत्रालय काय उत्तर देणार ? असा प्रश्न सुद्धा सामनामधून उपस्थित करण्यात आला आहे.