शहरं
Join us  
Trending Stories
1
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
2
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
3
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
4
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
5
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
6
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
7
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
8
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर
9
प्रभागरचना, आरक्षणावरील निकालांच्या अधीन असेल स्थानिक संस्था निवडणूक- उच्च न्यायालय
10
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
11
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
12
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
13
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
14
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
15
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
16
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
17
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
18
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
19
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
20
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक

शिवसेना निवडणुकीसाठी कधीही तयार - रामदास कदम

By admin | Updated: June 9, 2017 18:12 IST

शिवसेना हा नेहमी शेतकऱ्यांच्या पाठीशी राहणारा पक्ष असून निवडणुकीसाठी आम्ही कधीही तयारच असतो़ योग्यवेळी योग्य निर्णय

ऑनलाइन लोकमतनांदेड, दि. 9 : शिवसेना हा नेहमी शेतकऱ्यांच्या पाठीशी राहणारा पक्ष असून निवडणुकीसाठी आम्ही कधीही तयारच असतो़ योग्यवेळी योग्य निर्णय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे घेतील, असे सुचक वक्तव्य राज्याचे पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी शुक्रवारी नांदेडात केले़ नांदेड जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघनिहाय आढावा बैठकीसाठी मंत्री कदम हे सकाळी रेल्वेने दाखल झाले़ शुक्रवारी दिवसभरात दोन टप्प्यात त्यांनी शिवसेना जिल्हाप्रमुखांकडून मतदारसंघनिहाय आढावा घेतला़़ त्यानंतर आयोजित पत्रपरिषदेत मंत्री कदम म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेस एकीकडे शेतकऱ्यांसोबत असल्याचे सांगत आहे अन् दुसरीकडे पंतप्रधानांना भेटून सत्तेत घुसण्याची तयारी सुरु आहे़ शेतकरी आत्महत्येचे पाप हे राष्ट्रवादी काँग्रेसचे असून त्यांनी महाराष्ट्र कर्जबाजारी केला़ सिंचनात ७० हजार कोटींचा भ्रष्टाचार केला़, त्यांनी आम्हाला सल्ले देवू नयेत़काँग्रेस - राष्ट्रवादीला शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आंदोलन करण्याचा अधिकार नाही़ एवढे वर्षे सत्तेत राहून त्यांनी शेतकऱ्यांसाठी काय केले? हा महत्वाचा प्रश्न आहे़ सेनेच्या लोकांच्या राजीनाम्याबाबत राष्ट्रवादीकडून खिल्ली उडविण्यात येत आहे़ कारण सेनेने सत्तेतून बाहेर पडावे आणि राष्ट्रवादीने भाजपला साथ द्यावी अशी त्यांची खेळी आहे़ आपल्या कर्माच्या सर्व फायली बंद करण्यासाठीच राष्ट्रवादीला सत्तेत सामील व्हायचे आहे, असेही ते म्हणाले. शिवसेना ही नेहमी शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे़ त्यांच्या खांद्याला खांदा लावून लढा देण्याची आमची तयारी आहे़ जर या राज्यात शेतकऱ्यांवर अन्याय होत असेल, शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत असतील तर शिवसेना पक्षप्रमुख सत्तेला कधीही लाथ मारतील असेही मंत्री कदम यांनी सांगितले.