शहरं
Join us  
Trending Stories
1
'परिवार का साथ, परिवार का विकास...', बिहारमधून पीएम मोदींची काँग्रेस-रादजवर खोचक टीका
2
इस्रायलसोबत युद्ध सुरू असताना अचानक ३ इराणी विमाने ओमानमध्ये पोहोचली, नेमकं कारण काय?
3
Two-Wheeler New Rules : नवीन सर्व दुचाकींना 'एबीएस आणि दोन हेल्मेट' सक्तीचे; केंद्रीय परिवहन मंत्रालयाचा मोठा निर्णय
4
कुणी फुकट खाऊ घालत नाही...! आसिम मुनीर-डोनाल्ड ट्रम्प 'लन्च पॉलिटिक्स'नं पाकिस्तानचंच टेन्शन वाढवलं
5
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेवेळी एका टिफिनवाल्याने वाचवला ८० डॉक्टरांचा जीव
6
एअर इंडियानं रद्द केली ८ उड्डाणं, आता काय घडलं? पुणे, मुंबई, दिल्लीसह अनेक मोठ्या शहरांतील प्रवाशांची अडचण
7
Pandharpur Wari 2025: आता स्वस्तात करा विठ्ठलाचे दर्शन; एसटी महामंडळाची खास ऑफर!
8
१ जुलैपासून बदलणार बँकिंगचे नियम, क्रेडिट कार्ड बिल पेमेंटमध्येही होणार बदल; जाणून घ्या माहिती
9
क्रुझर प्रेमींची पहिली पसंत; नवीन अवतारात येणार Bajaj ची Avenger, किंमत फक्त...
10
Debt on US: ट्रम्प अडकले... संकटात अमेरिका; कर्ज ३७ ट्रिलियन डॉलर्सच्या पार, भारताचं किती देणं लागतो US
11
आधी स्वत:च पत्नीचं कुंकू पुसलं, नंतर बॉयफ्रेंडसोबत लग्न लावलं; पती म्हणतो, “मला विष देऊन...”
12
इराण-इस्त्रायल युद्ध आता ट्रम्प विरुद्ध पुतिन; चीन, नॉर्थ कोरियाचा हुकुमशाह उघडपणे पुढे आले
13
पंढरपुरात मोठी घटना! मित्रासोबत विठू माऊलीच्या दर्शनाला आलेल्या तरुणाचा चंद्रभागा नदीत बुडून मृत्यू
14
'वर्षभरापूर्वीच एअर इंडियाच्या बोईंगमधील खराबीची माहिती दिलेली'; अहमदाबाद विमान अपघातावर खळबळजनक दावा
15
“पप्पा, आम्हाला भारतात बोलवा अन् फोन कट”; इराणमध्ये अडकली लेक, वडिलांना सतावतेय भीती
16
अभिषेक-करिश्मा कपूरचा झालेला साखरपुडा, पण लग्न का मोडलं? बिग बींनी केलेला खुलासा
17
बँकेत जाताय? थांबा! जुलैमध्ये १३ दिवस बँका बंद राहणार; पहा तुमच्या शहरातील सुट्ट्यांची यादी
18
मुंबई महापालिकेची निवडणूक मविआ एकत्र लढणार की नाही? शरद पवार म्हणाले, "उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची..."
19
Ashadhi Wari 2025: वारी म्हणजे केवळ पंढरपूरला चालत जाणं नव्हे, तर वारी म्हणजे सदेह वैकुंठाची वाट चालणं!
20
प्रियकरासोबत मिळून पतीची केली हत्या, लग्नाआधीपासून सुरू होते अफेअर; हत्येनंतर रचला बनाव

शिवसेना विरोधकांसोबत

By admin | Updated: March 21, 2017 04:12 IST

: राज्यातील २५ जिल्हा परिषदांच्या अध्यक्ष, उपाध्यक्षपदाची निवडणूक उद्या, मंगळवारी होत असून भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी

मुंबई : राज्यातील २५ जिल्हा परिषदांच्या अध्यक्ष, उपाध्यक्षपदाची निवडणूक उद्या, मंगळवारी होत असून भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत जाण्याची भूमिका शिवसेनेने घेतली आहे. तर कसेही करून जास्तीतजास्त ठिकाणी सत्ता आणण्याच्या प्रयत्नात प्रसंगी राष्ट्रवादीला सोबत घेण्याची भूमिका भाजपाकडून घेतली जाऊ शकते. स्थानिक आघाड्या, अपक्षांचीही भूमिका महत्त्वाची ठरेल. काहीही करुन आपली सत्ता आणा, असे आदेश भाजपाच्या मंत्र्यांना पक्षाकडून देण्यात आले आहेत. लातूर, वर्धा, चंद्रपूरमध्ये भाजपाचे बहुमत असल्याने तेथे जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद त्यांच्याकडेच जाणार हे स्पष्ट आहे. तर पुणे आणि सातारामध्ये राष्ट्रवादीचे बहुमत असल्याने अध्यक्षपद त्यांच्याकडे जाईल. रत्नागिरीमध्ये शिवसेनेचे बहुमत असल्याने तेथे भगवा फडकणार हे नक्की आहे. सिंधुदुर्गमध्ये काँग्रेसची स्वबळावर सत्ता निश्चित आहे. नांदेडमध्ये काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी झाली असून, अध्यक्षपद काँग्रेसला तर उपाध्यक्षपद राष्ट्रवादीला असे सूत्र ठरले आहे. तर ६२ सदस्यीय औरंगाबाद जिल्हा परिषदेत काँग्रेस (१६) - शिवसेना (१९) एकत्र आल्याने त्यांची सत्ता येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. २३ सदस्य असलेल्या भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी शिवसेनेने काँग्रेसशी जवळीक केली आहे. प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे यांची प्रतिष्ठा पणाला लागलेल्या जालन्यातील चित्र अस्पष्ट आहे. ५६ सदस्यसंख्या असून, त्यात भाजपाचे सर्वाधिक २२ सदस्य आहेत. शिवसेनेचे १४ आणि २ अपक्ष असे १६ संख्याबळ असून, राष्ट्रवादीचे १३ आणि काँग्रेसचे ५ सदस्य आहेत. भाजपा-राष्ट्रवादी की राष्ट्रवादी-शिवसेना असे समीकरण होईल याबाबत अनिश्चितता आहे. परभणीमध्ये राष्ट्रवादी (२४) आणि काँग्रेस (६) अशी सत्ता स्थापन होण्याची स्पष्ट चिन्हे आहेत. हिंगोलीमध्ये शिवसेना (१५) - काँग्रेस (१२) - राष्ट्रवादी(१२) अशी आघाडी निश्चित दिसते. तेथे अध्यक्षपद शिवसेनेकडे जाईल. उस्मानाबादमध्ये राष्ट्रवादी (२६) बहुमतापासून केवळ दोनने दूर आहे. मात्र, तेथे गेल्या वेळी जिल्हा परिषदेत असलेली काँग्रेस-भाजपा-शिवसेना अशी आघाडी झाली तरच राष्ट्रवादीचे सत्तेचे स्वप्न तुटू शकते. सांगलीमध्ये ६० सदस्य संख्या असून, त्यात सर्वाधिक २५ भाजपाचे आहेत. राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या रयत आघाडीचे चौघे भाजपासोबत जातील. शिवसेनेचे तिघे भाजपासोबत येतील, असे मानले जाते. तसे झाले तर अध्यक्षपद भाजपाकडे जाईल. सोलापूरमध्ये भाजपा, विविध आघाड्या आणि राष्ट्रवादीचे फुटीर सदस्य यांच्या आधारे सत्तेची मोट बांधली जाईल, असे चित्र आहे. तर गडचिरोलीमध्ये भाजपा-आदिवासी विद्यार्थी संघ-राष्ट्रवादी अशी युती होऊन सत्ता स्थापन होऊ शकते. भाजपा-आदिवासी विद्यार्थी संघ यांची युती झाल्यास संख्याबळ २७ होऊन बहुमताने सत्ता मिळू शकते. (प्रतिनिधी)सदस्य अज्ञातस्थळीअटीतटीच्या लढती असलेल्या बहुतेक जिल्हा परिषदांमध्ये प्रत्येक पक्ष/आघाड्यांनीआपल्या सदस्यांना अज्ञातस्थळी हलविले आहे. बंडखोरी होऊ नये, याची काळजी घेतली जात आहे. त्यांना उद्या थेट मतदानालाच आणले जाईल. स्थानिक पातळीवर निर्णय होतीलजिल्हा परिषदांच्या अध्यक्ष निवडीत भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी जिथे शिवसेनेला मदत करण्याचा विषय असेल, तिथे तो निर्णय स्थानिक पातळीवर घेतला जाईल, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा़ अशोक चव्हाण यांनी स्पष्ट केले़ राज्यात भाजपाला रोखण्यासाठी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, अजित पवार यांच्याशी चर्चा झाली असून, आघाडीवर शिक्कामोर्तब झाले आहे़ - अशोक चव्हाण, प्रदेशाध्यक्ष, काँग्रेस