शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुमचं वक्तव्य लाजिरवाणं, आम्ही हमासचे दहशतवादी मारले", प्रियंका गांधींच्या 'त्या' दाव्यामुळे इस्राइल संतप्त   
2
Maharashtra Police Bharti 2025: १५ हजार पोलीस भरतीस मंजुरी; मंत्रिमंडळाच्या बैठकीत ४ महत्त्वाचे निर्णय, वाचा
3
"तिसरं मूल झाल्यास गाय अन् ५०००० रुपयांचं बक्षीस"; घोषणा करणाऱ्या खासदाराचं पंतप्रधान मोदींनी केलं कौतुक!
4
प्रेमविवाहानंतर अवघ्या १० दिवसांत पत्नीचा काटा काढला; पोलीस शिपाई का बनला गुन्हेगार?
5
पैशांचा पाऊस! अदानींच्या संपत्तीत एका दिवसात ५० हजार कोटींची वाढ, टॉप-२० श्रीमंतांच्या यादीत पुन्हा स्थान!
6
Video: एकाच महिलेचं ६ वेळा मतदार यादीत नाव, EPIC क्रमांक वेगळे...; महाराष्ट्रातील प्रकार व्हायरल
7
ना करुण नायर, ना श्रेयस अय्यर, ना साई सुदर्शन... ३ नंबर बॅटिंगसाठी गांगुलीची कुणाला पसंती?
8
एका झटक्यात ₹४००० नं घसरला शेअरचा भाव; शेअर विकण्यासाठी गुंतवणुकदारांच्या रांगा, पाहा कोणता आहे स्टॉक?
9
कोण आहेत १२४ वर्षीय मिंता देवी? ज्यांच्या नावाचं टी-शर्ट घालून विरोधकांचा संसदेत राडा!
10
पंजाब पोलिसांची मोठी कारवाई; बब्बर खालसा संघटनेशी संबंधित ५ दहशतवाद्यांना अटक
11
आसिम मुनीर यांना सारखं अमेरिकेत बोलावून भारतच नव्हे, तर 'या' तीन देशांनाही इशारा देतायत डोनाल्ड ट्रम्प!
12
'परम सुंदरी'च्या रोमँटिक केमिस्ट्रीवर भाळले प्रेक्षक, सिनेमात कॉमेडीचाही तडका; ट्रेलर रिलीज
13
१४, १५ की १६ ऑगस्ट? नेमकी कधी आहे श्रीकृष्ण जन्माष्टमी? पाहा, शुभ मुहूर्त, महत्त्व, मान्यता
14
पोरी हुश्शार! भारतीय महिला फुटबॉल टीमने रचला इतिहास, २० वर्षांनी आशियाई कपसाठी क्वालिफाय
15
या ऑटो कंपनीने सर्वांवर कडी केली...! १० वर्षांची एक्स्टेंडेड वॉरंटी स्कीम आणली, आधीच तीन वर्षे...
16
“काँग्रेसने जनहिताची भरपूर कामे केली, सोशल मीडियावर सक्रीय व्हा”; कार्यकर्त्यांना कानमंत्र
17
ना भीती, ना ढोंग, ना पश्चाताप.., Gen Z आणि मिलेनियल्सबाबत काय म्हणाले अमन गुप्ता?
18
तेजश्री प्रधानचं वय माहितीये का? सुंदर दिसण्यासाठी करते फक्त 'ही' एकच गोष्ट
19
"चल हट, येथून निघून जा...", भाजपा नेत्याच्या मुलाची गुंडगिरी, पोलीस कॉन्स्टेबलशी गैरवर्तन
20
'छावा', 'द काश्मीर फाईल्स' सारखे सिनेमे बनवणार नाही, जॉन अब्राहम असं का म्हणाला?

लोणावळ्यातील बंगल्यासाठीच शिवसेना नेत्यांचा ‘तो’ स्टंट

By admin | Updated: September 10, 2016 03:18 IST

वृक्षतोडीसंदर्भात कोणत्याही विकासकाचा प्रस्ताव आल्यास स्वत:च्या वैयक्तिक लाभासाठी शिवसेनेचे नेते आरडाओरड करतात.

ठाणे : गेल्या काही वर्षातील घटनांचा आढावा घेतल्यास वृक्षतोडीसंदर्भात कोणत्याही विकासकाचा प्रस्ताव आल्यास स्वत:च्या वैयक्तिक लाभासाठी शिवसेनेचे नेते आरडाओरड करतात. त्यानंतर ‘अर्थपूर्ण’ वाटाघाटी झाल्यास विरोधासाठी उठविलेला आवाज बंद होतो. सध्या जो विरोध केला जात आहे. त्याचा विचार केल्यास संबंधीत विकासकाचे लोणावळा येथे बंगले बांधण्याचे काम सुरु आहे. या प्रकल्पात स्वत:ला बंगला मिळवण्यासाठीच एका नेत्याने हा प्रकार घडवून आणल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे ठाणे शहराध्यक्ष आनंद परांजपे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केला आहे. परांजपे यांच्या या पत्रकानुसार संपूर्ण ठाणे शहरात उघड्या जागेवरील वृक्ष राजरोसपणे तोडले जात होते. तेव्हा पर्यावरणप्रेमी आपल्या परिने आवाज उठवत होते. त्यावेळी शिवसेना गप्प होती. नौपाडा येथील १०० वर्षांपूर्वीचे अनेक वृक्ष मूळासकट उपटून काढण्यात आले. त्यावेळीही शिवसेना गप्प होती. आता ती पुन्हा आक्र मक झाली आहे. मध्यंतरी कोलशेत येथे एका विकासकाने मोठ्याप्रमाणात वृक्षतोड केली होती. त्यावेळी शिवसेनेच्या एका आमदाराने रान उठविले होते. मात्र, अर्थपूर्ण घडामोडींनंतर हा विरोधाचा आवाज शांत झाला. आता पुन्हा एकदा ठामपामध्ये वृक्षतोडीचा प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर शिवसेना मैदानात उतरली आहे. आजवर जवळजवळ हजारांच्या वर वृक्ष तोड झाली असताना गप्प राहिलेली शिवसेना वृक्षतोडीचा प्रस्ताव आला की वैयक्तिक लाभासाठी आवाज उठवित आहे. संबंधित विकासकाचे लोणावळा येथे बंगलो प्रोजेक्ट सुरु असून त्याठिकाणी बंगला मिळविण्यासाठी एका नेत्याने हा प्रकार घडवून आणला आहे. दिशाहीन झालेल्या शिवसेनेचा हा आरोप म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा आहेत. सत्ताधारी जेव्हा भ्रष्टाचाराच्या गर्तेत अडकतात. तेव्हा नोकरशहा मजबूत होतो. एका प्रकरणासाठी आठ आठ तास मुक्काम ठोकून बसलेल्या शिवसेना नेत्यांना ठाणेकरांच्या समस्या दिसत नाहीत, असा टोलाही परांजपे यांनी लगावला आहे. (प्रतिनिधी)>ठाणे महापालिका प्रशासन भ्रष्टाचाराने बरबटले आहे, असा आरोप करणारी सत्ताधारी शिवसेना पालिका बरखास्तीची मागणी का करीत नाही, असा सवाल करून परांजपे म्हणाले, त्यांनी अशी मागणी केली, तर आम्ही त्या मागणीला समर्थन देऊ. अन्यथा, आम्हीच आता तशी मागणी करु ; त्याला तुम्ही समर्थन द्या, असे तिरकस आवाहनही त्यांनी केले.