शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

शिवसेना नेते मुंबईत परतले, भाजपासोबतच्या चर्चेविषयी संभ्रम कायम

By admin | Updated: October 22, 2014 10:39 IST

महाराष्ट्रातील सत्तास्थापनेविषयी भाजपा नेत्यांसोबत चर्चा करण्यासाठी दिल्ली दरबारी गेलेले शिवसेना नेते सुभाष देसाई व अनिल देसाई मुंबतईत परतले आहेत.

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. २२ - महाराष्ट्रातील सत्तास्थापनेविषयी भाजपा नेत्यांसोबत चर्चा करण्यासाठी दिल्ली दरबारी गेलेले शिवसेना नेते सुभाष देसाई व अनिल देसाई बुधवारी सकाळी मुंबईत परतले आहेत. शिवसेना नेत्यांची भाजपा नेत्यांसोबत पडद्याआड चर्चा झाली असली तरी याविषयी कमालीची गुप्तता पाळण्यात येत असल्याने संभ्रम कायम आहे.
 
भाजपासमोर नमते घेत शिवसेना नेते सुभाष देसाई व अनिल देसाई हे दोन नेते मंगळवारी संध्याकाळी दिल्लीसाठी रवाना झाले होते. दिल्लीत महाराष्ट्रातील भाजपाचे निरीक्षक राजनाथ सिंह व जे.पी. नड्डा यांची हे दोन्ही नेते भेटही घेणार होते. त्यानंतर महाराष्ट्रातील सत्तास्थापनेसाठी भाजपाचा प्रस्ताव प्राप्त झाल्यावर हे दोन्ही नेते मुंबईत येऊन उद्धव ठाकरेंशी चर्चा करणार होते.  मंगळवारी रात्री उशीरा भाजपा नेत्यांशी शिवसेना नेत्यांची पडद्याआड चर्चा झाल्याचे सांगितले जात आहे. नेमकी काय चर्चा झाली, शिवसेना भाजपाला पाठिंबा देणार का याविषयी काहीही समजू शकलेले नाही. 
दरम्यान, मुंबईत परतल्यावर सुभाष देसाई व अनिल देसाई हे दुपारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची भेट घेऊन दिल्लीवारीची माहिती त्यांना देतील. याविषयीची माहिती उद्धव ठाकरेच सर्वांना देतील असे सांगत शिवसेना नेत्यांनी अधिक बोलण्यास नकार दिला आहे.