शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
2
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
3
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
4
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
5
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
6
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
7
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
8
काश्मीरच्या बडगाममध्ये CRPF च्या वाहनाचा अपघात; अनेक जवान जखमी
9
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
10
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
11
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
12
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
13
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
14
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
15
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
16
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
17
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
18
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
19
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
20
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण

युतीसाठी शिवसेनेने भाजपाला झुलवीत ठेवले !

By admin | Updated: October 31, 2016 23:15 IST

कृषी मंत्री फुंडकर यांचा आरोप, सरकारच्या यशोगाथेमध्ये भाजपाचा उदोउदो, सेनेचा उल्लेखही नाही.

अकोला, दि. ३१- नगरपालिका निवडणुकांसाठी भाजपा-शिवसेनेने राज्य स्तरावर युती जाहीर केली; मात्र ही युती ऐनवेळी जाहीर झाल्याने जिल्हा व तालुका स्तरावर युती होऊ शकली नाही. परिणामी, सत्तेतील हे दोन्ही पक्ष एकमेकांच्या विरोधात रिंगणात उभे ठाकणार आहेत, हा प्रकार केवळ शिवसेनेने लवकर निर्णय न घेतल्यामुळे झाला. युती करण्यासाठी सेनेने भाजपाला अखेरच्या क्षणापर्यंत झुलवत ठेवले, असा आरोप कृषी मंत्री भाऊसाहेब उपाख्य पांडुरंग फुंडकर यांनी केला. देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या दोन वर्षांच्या कार्यकाळाचा लेखाजोखा जनतेसमोर मांडण्यासाठी कृषी मंत्री फुंडकर यांनी अकोल्यात पत्रकार परिषद घेतली, त्यावेळी ते बोलत होते. कृषी मंत्री फुंडकर म्हणाले की, नगरपालिका निवडणुकांसाठी स्थानिक स्तरावर निर्णय घेण्याचा अधिकार भाजपा पक्ष संघटनेने एक महिन्यापूर्वीच दिला होता; मात्र शिवसेनेने युतीचा निर्णय हा राज्यस्तरावरच होईल, असे जाहीर केले. खुद्द पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे तसे विधान होते, त्यामुळे राज्य स्तरावर युती जाहीर करण्यास शिवसेनेने वेळ घेतला व अखेरच्या क्षणापर्यंत भाजपाला झुलवत ठेवले. तोपर्यंत भाजपाने स्वबळावर तयारी पूर्ण केली होती, त्यामुळे अनेक ठिकाणी जिल्हास्तरावर युती होऊ शकली नाही, हे वास्तव आहे व त्याला केवळ शिवसेना जबाबदार असल्याचा आरोप त्यांनी केला. शिवसेना यशोगाथेपासून दूरच ! युती सरकारच्या यशाची गाथा मांडतांना कृषी मंत्री फुंडकर यांनी पत्रकार परिषदेत देवेंद्र सरकार, भाजपा सरकार असा शब्दप्रयोग सातत्याने केला. त्यांच्या संपूर्ण निवेदनामध्ये कुठेही शिवसेनेचा उल्लेख आला नाही, त्यामुळे सरकार जरी महायुतीचे असले, तरी उदोउदो केवळ भाजपाचाच झाला. विशेष म्हणजे सोमवारच्या पत्रकार परिषदेला भाजपाच्या सर्व आमदारांसह, जिल्हाध्यक्ष, महानगराध्यक्षांसह, महापौर व इतर पदाधिकारी प्रामख्याने उपस्थित होते; मात्र शिवसेनेच्या एका पदाधिकार्‍याला पत्रकार परिषदेचे आमंत्रणही नव्हते. गेल्याच महिन्यात मुख्यमंत्री अकोल्यामध्ये सुपर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या उद्घाटनाला आले होते, तेव्हाही शिवसेनेचा एकही पदाधिकारी कार्यक्रम स्थळी नव्हता, त्यामुळे कौतुक सरकारचे असले, तरी शिवसेनेला त्यामध्ये कुठेही स्थान नव्हते.आणखी 'वाघ' कमी होतील!भाजपाच्या कार्यकाळात विविध विभागांचा आढावा सादर करताना कृषी मंत्री फुंडकर यांनी विकासात कशी वाढ झाली, हे चित्र आकडेवारीसह मांडले. वन विभागाचा लेखाजोखा मांडताना व्याघ्र संवर्धनासाठी भरीव उपाय केल्यामुळे वाघांची संख्या १0३ वरून १९0 वर गेल्याचे ते म्हणाले. यावर, तुमचा मित्रपक्ष असलेल्या वाघाच्या संख्येचे काय, असा प्रतिप्रश्न उपस्थित केल्यावर 'ते वाघ' आणखी कमी होतील, असा टोला त्यांनी लगावला.