शहरं
Join us  
Trending Stories
1
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
2
Palghar Video : कामगारांनी कार अडवली, संतापलेल्या मालकिणीने थेट अंगावरच घातली; प्रकरण का चिघळलं? 
3
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
4
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
5
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
6
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
7
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
8
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
9
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
10
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
11
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
12
Dharali floods: ताशी 43 किमी वेग... 1230 फूट उंचावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
13
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
14
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
15
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
16
एअरटेलने जिओला मागे टाकले! पहिल्या तिमाहीत ५९४८ कोटींचा नफा; महसुलातही मोठी वाढ
17
अभिनेत्री मुक्ता बर्वे व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्काराने सन्मानित, भावना व्यक्त करत म्हणाली...
18
VIDEO: साडी नेसून.. डोक्यावर पदर घेऊन... 'देसी भाभी'चा शकिराच्या 'हिप्स डोन्ट लाय' वर भन्नाट डान्स
19
जायचं होतं जपानला, पोहोचल्या जयपूरला! युक्रेनच्या अध्यक्षांची बायको भारतात कशा पोहोचल्या?
20
₹500 नोट एटीएममधून मिळणे बंद होणार? मोदी सरकारने संसदेत दिले उत्तर

युतीसाठी शिवसेनेने भाजपाला झुलवीत ठेवले !

By admin | Updated: October 31, 2016 23:15 IST

कृषी मंत्री फुंडकर यांचा आरोप, सरकारच्या यशोगाथेमध्ये भाजपाचा उदोउदो, सेनेचा उल्लेखही नाही.

अकोला, दि. ३१- नगरपालिका निवडणुकांसाठी भाजपा-शिवसेनेने राज्य स्तरावर युती जाहीर केली; मात्र ही युती ऐनवेळी जाहीर झाल्याने जिल्हा व तालुका स्तरावर युती होऊ शकली नाही. परिणामी, सत्तेतील हे दोन्ही पक्ष एकमेकांच्या विरोधात रिंगणात उभे ठाकणार आहेत, हा प्रकार केवळ शिवसेनेने लवकर निर्णय न घेतल्यामुळे झाला. युती करण्यासाठी सेनेने भाजपाला अखेरच्या क्षणापर्यंत झुलवत ठेवले, असा आरोप कृषी मंत्री भाऊसाहेब उपाख्य पांडुरंग फुंडकर यांनी केला. देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या दोन वर्षांच्या कार्यकाळाचा लेखाजोखा जनतेसमोर मांडण्यासाठी कृषी मंत्री फुंडकर यांनी अकोल्यात पत्रकार परिषद घेतली, त्यावेळी ते बोलत होते. कृषी मंत्री फुंडकर म्हणाले की, नगरपालिका निवडणुकांसाठी स्थानिक स्तरावर निर्णय घेण्याचा अधिकार भाजपा पक्ष संघटनेने एक महिन्यापूर्वीच दिला होता; मात्र शिवसेनेने युतीचा निर्णय हा राज्यस्तरावरच होईल, असे जाहीर केले. खुद्द पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे तसे विधान होते, त्यामुळे राज्य स्तरावर युती जाहीर करण्यास शिवसेनेने वेळ घेतला व अखेरच्या क्षणापर्यंत भाजपाला झुलवत ठेवले. तोपर्यंत भाजपाने स्वबळावर तयारी पूर्ण केली होती, त्यामुळे अनेक ठिकाणी जिल्हास्तरावर युती होऊ शकली नाही, हे वास्तव आहे व त्याला केवळ शिवसेना जबाबदार असल्याचा आरोप त्यांनी केला. शिवसेना यशोगाथेपासून दूरच ! युती सरकारच्या यशाची गाथा मांडतांना कृषी मंत्री फुंडकर यांनी पत्रकार परिषदेत देवेंद्र सरकार, भाजपा सरकार असा शब्दप्रयोग सातत्याने केला. त्यांच्या संपूर्ण निवेदनामध्ये कुठेही शिवसेनेचा उल्लेख आला नाही, त्यामुळे सरकार जरी महायुतीचे असले, तरी उदोउदो केवळ भाजपाचाच झाला. विशेष म्हणजे सोमवारच्या पत्रकार परिषदेला भाजपाच्या सर्व आमदारांसह, जिल्हाध्यक्ष, महानगराध्यक्षांसह, महापौर व इतर पदाधिकारी प्रामख्याने उपस्थित होते; मात्र शिवसेनेच्या एका पदाधिकार्‍याला पत्रकार परिषदेचे आमंत्रणही नव्हते. गेल्याच महिन्यात मुख्यमंत्री अकोल्यामध्ये सुपर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या उद्घाटनाला आले होते, तेव्हाही शिवसेनेचा एकही पदाधिकारी कार्यक्रम स्थळी नव्हता, त्यामुळे कौतुक सरकारचे असले, तरी शिवसेनेला त्यामध्ये कुठेही स्थान नव्हते.आणखी 'वाघ' कमी होतील!भाजपाच्या कार्यकाळात विविध विभागांचा आढावा सादर करताना कृषी मंत्री फुंडकर यांनी विकासात कशी वाढ झाली, हे चित्र आकडेवारीसह मांडले. वन विभागाचा लेखाजोखा मांडताना व्याघ्र संवर्धनासाठी भरीव उपाय केल्यामुळे वाघांची संख्या १0३ वरून १९0 वर गेल्याचे ते म्हणाले. यावर, तुमचा मित्रपक्ष असलेल्या वाघाच्या संख्येचे काय, असा प्रतिप्रश्न उपस्थित केल्यावर 'ते वाघ' आणखी कमी होतील, असा टोला त्यांनी लगावला.