शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
2
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
3
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
4
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
5
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
6
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
7
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
8
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
9
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
10
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
11
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
12
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
13
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
14
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
15
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
16
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
17
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
18
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
19
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
20
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
Daily Top 2Weekly Top 5

...तरी शिवसेना सगळ्यांना पुरून उरली - उद्धव ठाकरे

By admin | Updated: March 9, 2017 07:47 IST

मुंबई महापालिकेवर शिवसेनेचा भगवा पुन्हा एकदा डौलाने फडकला आहे. यानिमित्ताने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामना संपादकीयमधून मुंबईच्या जनतेचे आभार मानले आहेत.

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. 9 -  मुंबई महापालिकेवर शिवसेनेचा भगवा पुन्हा एकदा डौलाने फडकला आहे. यानिमित्ताने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामना संपादकीयमधून मुंबईच्या जनतेचे आभार मानले आहेत. मुंबईच्या जनतेच्या पाठबळावरच सलग पाचव्यांदा शिवसेना विजयी झाली. आम्ही सदैव ते ऋण मानू व मुंबईकरांची उत्तम सेवा करून त्या ऋणातून मुक्त होण्याचा प्रयत्न करू, असं आश्वासनही त्यांनी जनतेला दिले आहे. 
 
दरम्यान, महापौर पदाच्या निवडणुकीत काँग्रेसनेही उमेदवार दिला होता. यावर उद्धव ठाकरे यांनी टीकास्त्र सोडले आहे. 'अपशकुन करण्याचे कितीही प्रयत्न झाले तरी शिवसेना सगळ्यांना पुरून उरली', असा टोला उद्धव यांनी काँग्रेसला हाणला आहे. 
(मनगटातील जोर दाखवला...)
 
नेमके काय आहे सामना संपादकीमध्ये?
मुंबईच्या महापौरपदाची निवडणूक पार पडली. शिवसेनेचे विश्वनाथ महाडेश्वर हे महापौरपदाच्या निवडणुकीत विजयी झाले आहेत. शिवसेनेच्याच हेमांगी वरळीकर उपमहापौरपदाच्या खुर्चीवर विराजमान झाल्या. निवडणुकीची तशी गरज नव्हती. भारतीय जनता पक्षाने निवडणुकीच्या रिंगणातून आधीच माघार घेतली व त्यांच्या ‘८२’ पहारेकऱ्यांनी शिवसेनेच्या उमेदवारास पाठिंबा दिला. त्यामुळे ३१ सदस्य असलेल्या काँग्रेसने निवडणूक लढविण्याचा हट्ट मागे घेऊन निवडणूक टाळायला हवी होती, पण कुणाचे काय व कुणाशी ‘सेटिंग’ असेल ते सांगता येणार नाही आणि तो त्या झालेल्या सेटिंगनुसारच पावले टाकीत असतो. हे आम्ही यासाठीच सांगतोय की, ठाणे महापौरपदाच्या निवडणुकीतून काँग्रेसने माघार घेतली व निवडणूक बिनविरोध होऊ दिलीच ना, पण जे ठाण्यात केले ते मुंबईत करायचे नाही! यामागे नक्कीच कुणाच्या तरी सडक्या खोपडय़ा आहेत. अर्थात अशा सडक्या खोपडय़ांची पर्वा न करता शिवसेनेचे महापौर आणि उपमहापौर विजयी झालेच. अपशकुन करण्याचे कितीही प्रयत्न झाले तरी शिवसेना सगळ्यांना पुरून उरली. महापौरपदाची निवडणूक ९ तारखेस ठरल्याप्रमाणे होणारच होती. कारण मावळत्या सभागृहातील नगरसेवकांची मुदत ८ तारखेपर्यंत होती, पण तरीही निवडणूक ८ तारखेला घेण्याचा अट्टहास झाला. त्या मागेही कुणाची काय आकडेमोड असायची ती असेल. त्या सगळ्यांना मोडून शिवसेना जिंकली हे महत्त्वाचे. मुंबईशी शिवसेनेचे जे नाते आहे ते फक्त सत्ता उबवण्यापुरते नाही. शिवसेना नसती तर मुंबईचे काय झाले असते? मुंबई महाराष्ट्रात राहिली असती काय? या प्रश्नांची उत्तरे नव्याने देण्याची गरज नाही. महाराष्ट्राच्या नकाशावर मुंबई पाय रोवून उभी आहे ती शिवसेनेच्या जागत्या पहाऱ्यामुळेच. मुंबईसाठी शिवसेनेने हल्ले पचवले तसेच हल्ले परतवलेसुद्धा. त्यामुळे मुंबईच्या भविष्याचा विचार करण्याचा अधिकार परंपरेने शिवसेनेला मिळाला आहे. दिल्लीतील व महाराष्ट्रातील राजकारण्यांनी मुंबईची तशी शोकांतिकाच केली आहे. मुंबईच्या लोकसंख्येचा ताण नागरी सुविधांवर पडतो आहे. ज्या सुविधा ५० लाख जनतेसाठी आहेत त्या दीड कोटी लोकसंख्येला पुरवाव्या लागतात. याचा दोष महानगरपालिकेस देणे हा अन्याय आहे. मुंबईत फक्त बेकायदेशीर झोपड्याच उभ्या राहतात असे नव्हे तर पक्की बांधकामेदेखील नियम धाब्यावर बसवून उभी राहतात. सर्वच जण त्यात हात धुऊन घेतात. हे सर्व रोखण्याची जबाबदारी फक्त महानगरपालिकेची नाही. मुंबई शहराचे ‘मनी सेंटर’मध्ये रूपांतर करण्याचा डाव ज्यांनी रचला त्यांनीच मुंबईच्या मराठी संस्कृतीला व अस्मितेला चूड लावली. गिरण्यांच्या संपामुळे चिंचपोकळी, करी रोड, परळ, लालबाग हा भाग रिकामा झाला. बाहेरच्या प्रांतांतून आलेल्या धनिकांनी तो विकत घेतला. दोन मजल्यांच्या चाळीवर ५० माळ्यांचे टॉवर उभे राहिले. या टॉवरवाल्यांनीच मुंबईचे रक्त व प्राणवायू शोषून घेतले. त्यांनाही शेवटी पाण्यापासून सांडपाण्यापर्यंत सर्व सुविधा मुंबईची महानगरपालिकाच पुरवते. मात्र हेच लोक शिवसेना काय करते? असे प्रश्न विचारतात. केंद्राची मदत नाही, राज्य सरकारचे पाठबळ नाही अशा परिस्थितीतही शिवसेनेने गेली २० वर्षे मुंबई महानगरपालिकेचा उत्तम कारभार केला. या कारभाराची खरी पहारेकरी कोणी असेल तर ती मुंबईची जनता. त्या जनतेच्या पाठबळावरच सलग पाचव्यांदा शिवसेना विजयी झाली. आम्ही सदैव ते ऋण मानू व मुंबईकरांची उत्तम सेवा करून त्या ऋणातून मुक्त होण्याचा प्रयत्न करू!