शहरं
Join us  
Trending Stories
1
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
2
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
3
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
4
इलेक्ट्रिक व्हेईकल घेणाऱ्यांसाठी CM फडणवीसांची मोठी घोषणा; टोलमाफी देण्याचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
5
...म्हणून मुलाचं नाव बॉबी ठेवलं! किशोरी शहाणेंनी सांगितलं कारण, म्हणाल्या- "मी मराठी, नवरा पंजाबी आणि सासू..."
6
ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न अंगलट; दुचाकीवर पाठी बसलेल्या तरुणीचा ट्रकखाली चिरडून मृत्यू
7
पाकिस्तानने कुठे लपवलाय अण्वस्त्रांचा साठा? 'या' अहवालाने केली पाकची पोलखोल...
8
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?
9
डॉलरच्या तुलनेत रुपयाची जोरदार कामगिरी; आशियातील सर्वात मजबूत चलन, ही आहेत ५ कारणे
10
टक्केवारीच्या आरोपानंतर परभणीचे जिल्हा नियोजन अधिकारी कार्यमुक्त; अधिकाऱ्यांमध्ये खळबळ
11
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  
12
'बुके नको बुकं द्या'! बिरदेव डोणेचं आवाहन, बॉलिवूड अभिनेत्रीच्या बॉयफ्रेंडने पाठवली हजार पुस्तकं
13
'जबाबदारीच्या वेळीच बेपत्ता'; काँग्रेसचा PM मोदींवर वार, भाजपचे नेतेही भडकले
14
इन्फोसिसमध्ये वर्षात तिसरी नोकरकपात! १९५ कर्मचाऱ्यांना दाखवला बाहेरचा रस्ता; काय आहे कारण?
15
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
16
माजी पाकिस्तानी खासदार भारतात हलाखीच्या परिस्थितीत; कुल्फी विकून उदरनिर्वाह, कोण आहेत ?
17
माणुसकी म्हणून तरी आमच्या भावनांशी खेळू नका; पहलगामच्या राजकारणावर असावरीच्या आईची प्रतिक्रिया
18
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
19
देशाच्या सुरक्षेचा विषय असेल तर हेरगिरी करण्यात काय अडचण?; पेगाससवरुन सुप्रीम कोर्टाचा सवाल
20
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद

शिवसेनेचा मुख्यमंत्री दिल्लीसमोर शेपूट हलवणार नाही-उद्धव ठाकरे

By admin | Updated: October 13, 2014 04:44 IST

महाराष्ट्रात शिवसेनेचाच मुख्यमंत्री होणार आणि तो दिल्लीची भांडी घासणार नाही, दिल्लीसमोर शेपूट हलवणार नाही,

मुंबई : महाराष्ट्रात शिवसेनेचाच मुख्यमंत्री होणार आणि तो दिल्लीची भांडी घासणार नाही, दिल्लीसमोर शेपूट हलवणार नाही, अशी ग्वाही शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी रविवारी वांद्रे-कुर्ला संकुलात झालेल्या सभेत दिली. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या शैलीत शिवसैनिकांना साष्टांग दंडवत घालून या संकटाच्या काळात मला व आदित्यला सांभाळून घेण्याचा बाळासाहेबांच्या आवाहनाचा विसर पडू देऊ नका, असे भावनिक आवाहनही त्यांनी केले.येती विधानसभा निवडणूक कोणत्याही परिस्थितीत शिवसेना जिंकणार आहे. शिवसेनेचा सुवर्णमहोत्सव २०१६ साली होणार आहे. तोपर्यंत शिवसेनेच्या मुख्यमंत्र्याने ५० योजना पूर्ण केलेल्या असतील. भाजपाने टाकलेल्या अटी स्वीकारल्या असत्या तर शिवसेना संपली असती त्यामुळे आपण जे केले ते योग्य केले ना, असा सवाल उद्धव यांनी केला. अटलबिहारी वाजपेयी यांच्या ‘कदम मिलाके चलना होगा' या काव्यपंक्ती उद्धृत करून उद्धव म्हणाले की, संकटे होती तेव्हा शिवसेनेने भाजपाला साथ दिली. मात्र अच्छे दिन आले तेव्हा त्यांनी साथ सोडली. उद्धव यांच्या अतिमहत्वाकांक्षेमुळे युती तुटल्याचा दावा भाजपाचे नेते करतात; परंतु हरियाणात कुलदीप बिष्णोईसोबतची युती भाजपाने का तोडली, असा सवाल त्यांनी केला. स्वतंत्र विदर्भाची भूमिका तुम्हाला मान्य आहे का, असा सवाल करून शिवसेनेचे सरकार आल्यास कर्नाटकव्याप्त सीमाभाग महाराष्ट्रात आणण्याची घोषणा त्यांनी केली. (प्रतिनिधी)