शहरं
Join us  
Trending Stories
1
जगातील सर्वात आनंदी देश धोक्यात! रशियन सैन्याने तळ उभारले; युरोपमध्ये खळबळ, युक्रेननंतर..
2
पाकिस्तानच्या किराना हिल्समध्ये रेडिएशन गळती? अणुऊर्जा संस्थेने सत्य सांगितले, अमेरिकेचे मौन
3
अचानक बसला आग लागली, ५ जणांचा मृत्यू, काच फोडून चालक पळून गेला
4
४ दिवसांच्या संघर्षात भारत ठरला वरचढ, पाकिस्तानला मोठं नुकसान; न्यूयॉर्क टाईम्सचा रिपोर्ट
5
भाजप-संघातील घटक नाराज; म्हणे, ‘ऑपरेशन सिंदूर’नंतरचा युद्धविराम ही तर चूक, शत्रुत्व थांबले
6
पाकिस्ताननंतर बांगलादेशनं IMF कडे पसरले हात, बुडत्या अर्थव्यवस्थेचं कारण देत 'इतक्या' पैशांची मागणी
7
आजचे राशीभविष्य १५ मे २०२५: आर्थिक लाभ संभवतात, दुपारनंंतर मात्र अनेकांचे नशीब बदलेल...
8
शूरवीरांचा देश आहे, असा संदेश पाकला देणे आवश्यक होते; RSSचे सुनील अंबेकर यांचे प्रतिपादन
9
कर्नल सोफियांवर टीका भोवली, मंत्री विजय शाहवर FIR; हायकोर्टाने फटकारले, रात्री गुन्हा दाखल
10
न्या. भूषण गवई देशाचे ५२वे सरन्यायाधीश; अनेक महत्त्वपूर्ण निर्णय देणाऱ्या पीठांमध्ये सहभाग
11
अनामिक भीती वाटते, अस्थिर मन शांत होत नाही? कळकळीने स्वामींना हाक मारा, ‘ही’ प्रार्थना कराच
12
ब्रह्मोस अण्वस्त्रांच्या डेपोवर आदळले असते तर काय झाले असते? किती मोठा स्फोट झाला असता?
13
महिला राफेल उडवू शकतात, तर लष्करात त्यांची संख्या मर्यादित का? सुप्रीम कोर्टाचा सरकारला सवाल
14
गरिबांच्या सेवेमुळे माझ्या मुलाला हे पद मिळाले; सरन्यायाधीश गवई यांच्या मातोश्री भावुक
15
२१ दिवसांत ३१ माओवादी यमसदनी; छत्तीसगड-तेलंगणा सीमेवर कारवाईला मोठे यश
16
पाकने २१ दिवसांनी BSF जवानाला भारताच्या ताब्यात दिले; वडील म्हणाले, मुलाची गळाभेट घ्यायची आहे
17
डोनाल्ड ट्रम्प यांचा पाचव्यांदा दावा; म्हणाले, “होय, भारत-पाकमधील युद्ध अमेरिकेनेच संपविले”
18
२०२७ पासून मेट्रोचा मार्ग वेगाने विस्तारेल: मुख्यमंत्री; काशीगाव-दहिसरदरम्यान तांत्रिक चाचणी
19
शरद पवार गटाच्या बैठकीत स्थानिक निवडणुकांवर चर्चा; नेमके काय घडले, कोणता निर्णय झाला?
20
‘लाडक्या बहिणी’च्या नावे खाती उघडून सायबर भामट्यांना ३० हजारांत विक्री; तिघे अटकेत

शिवसेनेने पुढे केला मदतीचा हात

By admin | Updated: September 21, 2016 03:32 IST

अन्नातून जीवनदान या संकल्पनेतून शिवसेनेच्या अंबरनाथ शाखेच्यावतीने मोखाड्यातील हजारो आदिवासी बांधवांना मंगळवारी सकाळी अन्न धान्य वाटप करून सामाजिक बांधिलकीचा वसा जपला.

मोखाडा : अन्नातून जीवनदान या संकल्पनेतून शिवसेनेच्या अंबरनाथ शाखेच्यावतीने मोखाड्यातील हजारो आदिवासी बांधवांना मंगळवारी सकाळी अन्न धान्य वाटप करून सामाजिक बांधिलकीचा वसा जपला.खोच, विकासवाडी, कळमवाडी या गावपाड्यातील दोन हजार आदिवासी गरजू कुटुंबाना धान्याचे वाटप करण्यात आले आहे. मोखाड्यातील खोच येथील ईश्वर सवरा आणि कळमवाडी येथील सागर वाघ या बालकांचा भूकबळी झाल्याने कुपोषणाचे भीषण वास्तव समोर आले आहे. यामुळे अन्नवाचून पुन्हा भूकबळी होऊ नये यासाठी शिवसेनेच्या अंबरनाथ शाखेने पुढाकार घेत टप्याटप्याने गरज विचारात घेऊन ३१ हजार किलो धान्यवाटप केले जाणार आहे.दानशूरांना केले होते आवाहन अंबरनाथ येथील शिवसैनिकांनी सगळ्या व्यापारी व दानशूरांना या गंभीर बाबीची कल्पना देऊन त्यांच्या प्रयत्नातून आदिवासी बांधवाना धान्य वाटप करून मदतीचा हात दिला याचे सर्वचस्तरातून कौतुक होत आहे. यावेळी अरविंद वाळेकर (शहर प्रमुख अंबरनाथ) बालाजी किणीकर (आमदार) उत्तम पिंपळे (जिल्हा अध्यक्ष पालघर) सुनील चौधरी (अंबरनाथ नगर अध्यक्ष) प्रकाश निकम (जिल्हा परिषद सदस्य) सारिका निकम (सभापती मोखाडा पंचायत समिती) अमोल पाटील उपस्थित होते. (वार्ताहर)