शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

शिवसेना, भाजपने वाद मिटवावे

By admin | Updated: August 7, 2014 23:42 IST

भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेने त्यांच्यातील आपसांतील जागांबाबतचा वाद लवकरात लवकर मिटवावा़ महायुतीत वाद निर्माण व्हावा, अशी आमची इच्छा नाही;

पुणो : भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेने त्यांच्यातील आपसांतील जागांबाबतचा वाद लवकरात लवकर मिटवावा़ महायुतीत वाद निर्माण व्हावा, अशी आमची इच्छा नाही; पण आमचे पक्ष छोटे आहेत, लोकांर्पयत पोहोचण्यासाठी आम्हाला वेळ लागणार आह़े त्यामुळे महायुतीमधीलच घटक पक्ष असलेल्या आम्ही तिघांनी एकत्र येऊन चर्चा करण्याचा निर्णय घेतला होता, असे शिवसंग्राम पक्षाचे अध्यक्ष विनायक मेटे यांनी सांगितल़े 
स्वाभिमानी शेतकरी पक्ष, राष्ट्रीय समाज पक्ष आणि शिवसंग्राम या महायुतीतील घटक पक्षांची पुण्यात बैठक झाली़ तिन्ही पक्षांनी अनेक जागांवर दावा केला होता़ त्यांपैकी जवळपास 35 जागांवर तिन्ही अथवा दोन पक्षांनी दावा केल्याचे या बैठकीत दिसून आल़े याशिवाय प्रचार, प्रसार कशा पद्धतीने करायचा याची चर्चा या बैठकीत झाली़ महायुतीतील घटक पक्षांनी अवास्तव जागांची मागणी केली असल्याचा प्रचार होत असल्याबद्दल या नेत्यांनी नाराजी व्यक्त केली़ 
घटक पक्षांची बैठकीची दखल घेऊन शिवसेना-भाजपमधील काही नेत्यांनी या नेत्यांना काल फोन केल़े तुमची बैठक होऊ द्या; त्यानंतर आपण बोलू़ अनेक फोन येऊ लागल्यावर  बैठकीसाठी त्यांनी आपले फोनच बंद ठेवले होत़े 
याबाबत विनायक मेटे म्हणाले, ‘‘महायुतीतील शिवसेना आणि भाजपबरोबर आमची 28 जुलै रोजी चर्चा झाली होती़ त्या वेळी 5 ऑगस्टर्पयत जागावाटपाबाबत चर्चा सुरू करू, असे सांगण्यात आले होत़े पण, अजूनही या मुख्य दोन पक्षांतील जागावाटप पूर्ण झाले नाही़ त्यामुळे महायुतीतील घटक पक्षांना कोणताही निरोप नाही़ आमच्या दृष्टीने हा वेळ खूप महत्त्वाचा आह़े त्यामुळे शिवसेना, भाजप या मोठय़ा पक्षांबरोबर चर्चा करण्याअगोदर आपल्यातील जागांविषयीची चर्चा करू, काही मुद्दे निश्चित करण्यासाठी ही बैठक घेण्यात आली़’’
आम्हा तीन पक्षांना जवळपास 
5क् जागा मिळाव्यात, अशी 
अपेक्षा व्यक्त करून मेटे म्हणाले, ‘‘आमच्या तिघांमधील एकमेकांना क्रॉस होणा:या जागांमध्ये कोणाची किती ताकद आहे, याची चाचपणी केली़ आम्ही कधीही अवास्तव जागांची मागणी केलेली नाही़ शिवसेना, भाजप यांना ज्या जागांवर मागील 2 निवडणुकांमध्ये विजय मिळविता आला नाही आणि जेथे आमची ताकद आहे, काम आहे, अशाच जागांची मागणी केली आह़े  (प्रतिनिधी)
 
जाहीरनामा समिती अजूनही नाही
महायुतीची जाहीरनामा समिती तयार करण्याची चर्चा झाली होती़ पण अजूनही अशी समिती तयार करण्यात आली नाही़ महाराष्ट्रापुढे जाऊन आपण काय शब्द देणार, जनतेला काय सांगणार, याची चर्चा होण्याची आवश्यकता आह़े त्यादृष्टीने आम्ही चर्चा केली़ 
शिवसेना, भाजपच्या नेत्यांशी येत्या 9 किंवा 11 ऑगस्टला चर्चा होण्याची शक्यता आह़े राष्ट्रीय समाज पक्षाचा मुंबईत वर्धापन दिनानिमित्त मेळावा आह़े त्या ठिकाणी सर्व जण एकत्र येणार असल्याने तेव्हा चर्चा होण्याची शक्यता असल्याचे त्यांनी सांगितल़े