शहरं
Join us  
Trending Stories
1
"युद्ध थांबवलं नाही तर…’’, भारत-पाकिस्तानमधील संघर्षाचा उल्लेख करत डोनाल्ड ट्रम्प यांचा थायलंड कंबोडियाला इशारा
2
"...मग आम्हाला जगभर कशाला पाठवलं?"; IND vs PAK क्रिकेट शेड्युलवर संतापल्या प्रियंका चतुर्वेदी
3
मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात! कंटेनरचे ब्रेक फेल, अनेक वाहने एकमेकांवर धडकली...
4
IND vs ENG 4th Test Day 4 Stumps : साडे चार तासांत ३७३ चेंडूंचा सामना; KL राहुल-गिल जोडी जमली; पण लढाई अजून नाही संपली!
5
"जर 6 महिन्यांत मर्सिडीज अथवा बीएमडब्ल्यू हवी असेल तर..." सरन्यायाधीश गवई यांचा नव्या वकीलांना सल्ला
6
Asia Cup 2025: 'असं' झालं तर तब्बल तीन वेळा रंगणार IND vs PAK क्रिकेट सामना, जाणून घ्या
7
Shubman Gill Record : गिलनं साधला मोठा डाव! इंग्लंडच्या मैदानात पाक दिग्गजाला 'धोबीपछाड'
8
तेव्हा लोक म्हणाले होते जणू दुसरी ऐश्वर्याच, सलमान खानची ही हिरोईन आता दिसते अशी 
9
एलियन्सचं रहस्यमय अंतराळ यान नोव्हेंबरमध्ये करणार पृथ्वीवर हल्ला, शास्त्रज्ञांना धक्कादायक दावा
10
नवरा बायकोमध्ये तुफान भांडण, पतीच्या डोक्यात घातला हातोडा, हत्येनंतर दार लावलं अन्...
11
Video: बंगळुरूच्या महिला प्रोफेसरचा मराठमोळ्या 'वाजले की बारा' लावणीवर भन्नाट डान्स
12
"आम्ही खूप दुःखी..."; दिराने वहिनीला कुंकू लावलं अन् धबधब्यात घेतली उडी, प्रेमाचा भयंकर शेवट
13
IND vs ENG : जसप्रीत बुमराहचं 'शतक'; मँचेस्टर कसोटीतील न पटण्याजोगी गोष्ट
14
Asia Cup 2025 चे वेळापत्रक जाहीर! भारत पाकिस्तान पुन्हा एकाच गटात, 'या' दिवशी सामना
15
१४,२९८ पुरुषांना 'लाडकी बहीण'चा लाभ; अजित पवार म्हणाले, 'वसूल करणार, नाही दिले तर...'
16
"सरकार ही निरुपयोगी यंत्रणा, चालत्या गाडीला पंक्चर करण्याचं काम..."; नितीन गडकरींनी सुनावलं
17
बिहार निवडणुकीसाठी काँग्रेसची मोर्चेबांधणी, महाराष्ट्रातील या महिला खासदाराकडे सोपवली मोठी जबाबदारी
18
"बंदुकीच्या धाकाने बांगलादेशात ढकलले जातेय...!" बांगली भाषिक मुस्लिमांवरील कारवाईवरून ओवेसी भडकले
19
IND vs ENG : यशस्वीच्या पदरी लाजिरवाणा 'भोपळा'! साई आला अन् तोही फक्त 'दर्शन' देऊन गेला
20
"राहुल गांधींच्या नशिबात कायम माफी मागणे लिहीले आहे"; केंद्रीय कृषीमंत्र्यांनी काँग्रेसला घेरलं, "१० वर्षांनी पुन्हा..."

शिवसेना, भाजपने वाद मिटवावे

By admin | Updated: August 7, 2014 23:42 IST

भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेने त्यांच्यातील आपसांतील जागांबाबतचा वाद लवकरात लवकर मिटवावा़ महायुतीत वाद निर्माण व्हावा, अशी आमची इच्छा नाही;

पुणो : भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेने त्यांच्यातील आपसांतील जागांबाबतचा वाद लवकरात लवकर मिटवावा़ महायुतीत वाद निर्माण व्हावा, अशी आमची इच्छा नाही; पण आमचे पक्ष छोटे आहेत, लोकांर्पयत पोहोचण्यासाठी आम्हाला वेळ लागणार आह़े त्यामुळे महायुतीमधीलच घटक पक्ष असलेल्या आम्ही तिघांनी एकत्र येऊन चर्चा करण्याचा निर्णय घेतला होता, असे शिवसंग्राम पक्षाचे अध्यक्ष विनायक मेटे यांनी सांगितल़े 
स्वाभिमानी शेतकरी पक्ष, राष्ट्रीय समाज पक्ष आणि शिवसंग्राम या महायुतीतील घटक पक्षांची पुण्यात बैठक झाली़ तिन्ही पक्षांनी अनेक जागांवर दावा केला होता़ त्यांपैकी जवळपास 35 जागांवर तिन्ही अथवा दोन पक्षांनी दावा केल्याचे या बैठकीत दिसून आल़े याशिवाय प्रचार, प्रसार कशा पद्धतीने करायचा याची चर्चा या बैठकीत झाली़ महायुतीतील घटक पक्षांनी अवास्तव जागांची मागणी केली असल्याचा प्रचार होत असल्याबद्दल या नेत्यांनी नाराजी व्यक्त केली़ 
घटक पक्षांची बैठकीची दखल घेऊन शिवसेना-भाजपमधील काही नेत्यांनी या नेत्यांना काल फोन केल़े तुमची बैठक होऊ द्या; त्यानंतर आपण बोलू़ अनेक फोन येऊ लागल्यावर  बैठकीसाठी त्यांनी आपले फोनच बंद ठेवले होत़े 
याबाबत विनायक मेटे म्हणाले, ‘‘महायुतीतील शिवसेना आणि भाजपबरोबर आमची 28 जुलै रोजी चर्चा झाली होती़ त्या वेळी 5 ऑगस्टर्पयत जागावाटपाबाबत चर्चा सुरू करू, असे सांगण्यात आले होत़े पण, अजूनही या मुख्य दोन पक्षांतील जागावाटप पूर्ण झाले नाही़ त्यामुळे महायुतीतील घटक पक्षांना कोणताही निरोप नाही़ आमच्या दृष्टीने हा वेळ खूप महत्त्वाचा आह़े त्यामुळे शिवसेना, भाजप या मोठय़ा पक्षांबरोबर चर्चा करण्याअगोदर आपल्यातील जागांविषयीची चर्चा करू, काही मुद्दे निश्चित करण्यासाठी ही बैठक घेण्यात आली़’’
आम्हा तीन पक्षांना जवळपास 
5क् जागा मिळाव्यात, अशी 
अपेक्षा व्यक्त करून मेटे म्हणाले, ‘‘आमच्या तिघांमधील एकमेकांना क्रॉस होणा:या जागांमध्ये कोणाची किती ताकद आहे, याची चाचपणी केली़ आम्ही कधीही अवास्तव जागांची मागणी केलेली नाही़ शिवसेना, भाजप यांना ज्या जागांवर मागील 2 निवडणुकांमध्ये विजय मिळविता आला नाही आणि जेथे आमची ताकद आहे, काम आहे, अशाच जागांची मागणी केली आह़े  (प्रतिनिधी)
 
जाहीरनामा समिती अजूनही नाही
महायुतीची जाहीरनामा समिती तयार करण्याची चर्चा झाली होती़ पण अजूनही अशी समिती तयार करण्यात आली नाही़ महाराष्ट्रापुढे जाऊन आपण काय शब्द देणार, जनतेला काय सांगणार, याची चर्चा होण्याची आवश्यकता आह़े त्यादृष्टीने आम्ही चर्चा केली़ 
शिवसेना, भाजपच्या नेत्यांशी येत्या 9 किंवा 11 ऑगस्टला चर्चा होण्याची शक्यता आह़े राष्ट्रीय समाज पक्षाचा मुंबईत वर्धापन दिनानिमित्त मेळावा आह़े त्या ठिकाणी सर्व जण एकत्र येणार असल्याने तेव्हा चर्चा होण्याची शक्यता असल्याचे त्यांनी सांगितल़े