शहरं
Join us  
Trending Stories
1
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
2
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
3
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
4
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
5
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
6
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
7
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
8
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
9
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
10
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
11
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
12
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
13
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
14
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
15
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
16
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला
17
अणुबॉम्बसारखा स्फोट! भर समुद्रात ज्वालामुखी उद्रेक; जीव वाचवण्यासाठी पर्यटकांची धावाधाव...
18
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
हैदराबाद गॅजेट टिकवणे सरकारची जबाबदारी, अन्यथा सरकारला सुट्टी नाही; मनोज जरांगेंचा इशारा
20
बिंग फुटले, आता चौकशी करतायत...! युक्रेनने भारताकडून आयात करत असलेले डिझेल रोखले 

शिवसेना, भाजपने वाद मिटवावे

By admin | Updated: August 7, 2014 23:42 IST

भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेने त्यांच्यातील आपसांतील जागांबाबतचा वाद लवकरात लवकर मिटवावा़ महायुतीत वाद निर्माण व्हावा, अशी आमची इच्छा नाही;

पुणो : भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेने त्यांच्यातील आपसांतील जागांबाबतचा वाद लवकरात लवकर मिटवावा़ महायुतीत वाद निर्माण व्हावा, अशी आमची इच्छा नाही; पण आमचे पक्ष छोटे आहेत, लोकांर्पयत पोहोचण्यासाठी आम्हाला वेळ लागणार आह़े त्यामुळे महायुतीमधीलच घटक पक्ष असलेल्या आम्ही तिघांनी एकत्र येऊन चर्चा करण्याचा निर्णय घेतला होता, असे शिवसंग्राम पक्षाचे अध्यक्ष विनायक मेटे यांनी सांगितल़े 
स्वाभिमानी शेतकरी पक्ष, राष्ट्रीय समाज पक्ष आणि शिवसंग्राम या महायुतीतील घटक पक्षांची पुण्यात बैठक झाली़ तिन्ही पक्षांनी अनेक जागांवर दावा केला होता़ त्यांपैकी जवळपास 35 जागांवर तिन्ही अथवा दोन पक्षांनी दावा केल्याचे या बैठकीत दिसून आल़े याशिवाय प्रचार, प्रसार कशा पद्धतीने करायचा याची चर्चा या बैठकीत झाली़ महायुतीतील घटक पक्षांनी अवास्तव जागांची मागणी केली असल्याचा प्रचार होत असल्याबद्दल या नेत्यांनी नाराजी व्यक्त केली़ 
घटक पक्षांची बैठकीची दखल घेऊन शिवसेना-भाजपमधील काही नेत्यांनी या नेत्यांना काल फोन केल़े तुमची बैठक होऊ द्या; त्यानंतर आपण बोलू़ अनेक फोन येऊ लागल्यावर  बैठकीसाठी त्यांनी आपले फोनच बंद ठेवले होत़े 
याबाबत विनायक मेटे म्हणाले, ‘‘महायुतीतील शिवसेना आणि भाजपबरोबर आमची 28 जुलै रोजी चर्चा झाली होती़ त्या वेळी 5 ऑगस्टर्पयत जागावाटपाबाबत चर्चा सुरू करू, असे सांगण्यात आले होत़े पण, अजूनही या मुख्य दोन पक्षांतील जागावाटप पूर्ण झाले नाही़ त्यामुळे महायुतीतील घटक पक्षांना कोणताही निरोप नाही़ आमच्या दृष्टीने हा वेळ खूप महत्त्वाचा आह़े त्यामुळे शिवसेना, भाजप या मोठय़ा पक्षांबरोबर चर्चा करण्याअगोदर आपल्यातील जागांविषयीची चर्चा करू, काही मुद्दे निश्चित करण्यासाठी ही बैठक घेण्यात आली़’’
आम्हा तीन पक्षांना जवळपास 
5क् जागा मिळाव्यात, अशी 
अपेक्षा व्यक्त करून मेटे म्हणाले, ‘‘आमच्या तिघांमधील एकमेकांना क्रॉस होणा:या जागांमध्ये कोणाची किती ताकद आहे, याची चाचपणी केली़ आम्ही कधीही अवास्तव जागांची मागणी केलेली नाही़ शिवसेना, भाजप यांना ज्या जागांवर मागील 2 निवडणुकांमध्ये विजय मिळविता आला नाही आणि जेथे आमची ताकद आहे, काम आहे, अशाच जागांची मागणी केली आह़े  (प्रतिनिधी)
 
जाहीरनामा समिती अजूनही नाही
महायुतीची जाहीरनामा समिती तयार करण्याची चर्चा झाली होती़ पण अजूनही अशी समिती तयार करण्यात आली नाही़ महाराष्ट्रापुढे जाऊन आपण काय शब्द देणार, जनतेला काय सांगणार, याची चर्चा होण्याची आवश्यकता आह़े त्यादृष्टीने आम्ही चर्चा केली़ 
शिवसेना, भाजपच्या नेत्यांशी येत्या 9 किंवा 11 ऑगस्टला चर्चा होण्याची शक्यता आह़े राष्ट्रीय समाज पक्षाचा मुंबईत वर्धापन दिनानिमित्त मेळावा आह़े त्या ठिकाणी सर्व जण एकत्र येणार असल्याने तेव्हा चर्चा होण्याची शक्यता असल्याचे त्यांनी सांगितल़े