शहरं
Join us  
Trending Stories
1
"अनेकांची झोप उडवेल आजचा कार्यक्रम, जेथे मेसेज जायला हवा होता, तेथे पोहोचला"; नेमकं काय म्हणाले पीएम मोदी
2
“भावाला न्याय मिळत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही”; संतोष देशमुख यांच्या बहिणीचा निर्धार
3
वादग्रस्त आयएएस प्रशिक्षणार्थी पूजा खेडकर पुणे पोलिसांत हजर; मनाने आलेली नाही, सामाजिक कार्यकर्त्यांचा आरोप 
4
Waves Summit 2025: "भारतात पुरेसे सिनेसमागृहच नाहीत..." आमिर खानने व्यक्त केली खंत
5
केवळ १००० रुपयांनी गुंतवणूक करून तुमच्या मुलांना बनवू शकता कोट्यधीश; कोणती आहे ही स्कीम?
6
पाकिस्तानने भारताची भीती घेतली! पीओकेमधील हॉटेल्स अन् गेस्ट हाऊसमध्ये सैन्य; मदरसे बंद
7
पाकिस्तानने अटारी, वाघा बॉर्डरचे गेट उघडले; धास्ती एवढी की पाकिस्तानींनाही घेत नव्हते...
8
प्रेक्षकांचा सूरज चव्हाणला 'गोलीगत धोका', 'झापुक झुपूक'ने पहिल्या आठवड्यात केली फक्त इतकी कमाई
9
श्रीराम दर्शनाची ओढ लागली, ३०० वर्षे जुनी परंपरा मोडली; हनुमानगढीचे महंत मंदिराबाहेर पडले!
10
हवाई दलाचं जबरदस्त शक्तिप्रदर्शन, हायवेवर उतरवली मिराज, राफेलसह ही लढाऊ विमानं
11
सिद्धार्थ-मितालीच्या घरी आला छोटा पाहुणा, फोटो शेअर करत दिली गुड न्यूज
12
WhatsApp वेबवर व्हॉइस आणि व्हिडीओ कॉलिंग फीचर लाँच; आता तुम्ही थेट करू शकता कॉल
13
बजाज चेतकला एप्रिल फूल बनविले; टीव्हीएस पहिल्यांदाच नंबर १, विक्रीत ओला कुठे...
14
पाकिस्तानी हवाई क्षेत्र बंद; एअर इंडियाला 5000 कोटी रुपयांचा फटका बसण्याचा अंदाज...
15
दारूच्या व्यसनाने आई आणि चुलतीचा खून; बीड जिल्हा दोन हत्येच्या घटनांनी हादरला
16
पंकजा मुंडेंना कॉल अन् पाठवला अश्लील मेसेज, पुण्यातील तरुणाला पोलिसांनी केली अटक
17
CEOs चा १ तासाचा पगार सामान्य कर्मचाऱ्याच्या वर्षाच्या पगाराइतका, एका रिपोर्टमध्ये झाले अनेक आश्चर्यकारक खुलासे
18
अन्न पुन्हा गरम करणं आरोग्यासाठी ठरतंय घातक; 'या' ५ गोष्टी टाळाल तरच ठणठणीत राहाल
19
 संतापजनक! मासिक पाळीत स्वयंपाक करणं महिलेच्या जीवावर बेतलं,नणंद आणि सासूने खून केल्याचा आरोप, दोन मुलं अनाथ
20
नवी मुंबईत ठाकरे गटाला खिंडार! माजी नगरसेवकांचे उद्धवसेनेला जय महाराष्ट्र, शिंदेसेनेत प्रवेश

मुंबईत शिवसेना, भाजपा तुल्यबळ!

By admin | Updated: February 24, 2017 06:20 IST

मुंबई महापालिकेत ८४ जागांसह शिवसेना नंबर एकचा पक्ष ठरला असला तरी त्याच्यापेक्षा केवळ दोनच

यदु जोशी / मुंबईमुंबई महापालिकेत ८४ जागांसह शिवसेना नंबर एकचा पक्ष ठरला असला तरी त्याच्यापेक्षा केवळ दोनच कमी म्हणजे ८२ जागांवर यश मिळवित भाजपाने जोरदार यश संपादन केले. ठाण्याचा गड शिवसेनेने राखला असला तरी नागपूर, पुणे, नाशिक, पिंपरी-चिंचवड, अमरावती, अकोला या सहा महापालिकांमध्ये भाजपाने बहुमत मिळविले. सोलापूर आणि उल्हासनगरमध्ये भाजपा सर्वात मोठा पक्ष असून इतर पक्ष/अपक्षांच्या सहकार्याने सत्तेत येईल, अशी स्थिती आहे. संपूर्ण महाराष्ट्रासह देशाचे लक्ष लागून असलेल्या मुंबई महापालिकेत भाजपा आणि शिवसेनेची लढाई जवळपास बरोबरीत सुटली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडलेल्या विकास आणि पारदर्शकतेच्या अजेंड्याला मुंबईकरांनी मोठा प्रतिसाद दिला तर शिवसेनेने आपल्या परंपरागत मतदारांच्या आधारे यश मिळविले. सकाळी शिवसेनेने निकालात आघाडी घेतल्यानंतर शिवसैनिकांनी एकच जल्लोष केला मात्र, दुपारनंतर भाजपाच्या एकेक जागा वाढत गेल्या आणि कमळ फुलू लागले. अंतिम निकालात दोघांमध्ये केवळ दोनचे अंतर राहिले. मिळाल्याने सत्तेचे समीकरण कसे असेल, भाजपा आणि शिवसेना एकत्र येतील या बाबत उत्सुकता आहे. अपक्षांना जवळ करण्याची रणनीती दोघांनीही आखली आहे. गेल्यावेळी केवळ नागपूर महापालिकेत भाजपाकडे सत्ता होती. यावेळी सहा महापालिकांमध्ये एकहाती सत्ता, इतर दोन ठिकाणी सत्तेकडे वाटचाल आणि मुंबईत शिवसेनेच्या बरोबरीने यश मिळवित भाजपाने जोरदार मुसंडी मारली. राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेसला जबर धक्के बसले. एकाही महापालिकेत त्यांना बहुमत मिळाले नाही वा सत्तेच्या जवळदेखील जाता आलेले नाही. मुंबईत केवळ ३१ जागांवर समाधान मानावे लागल्यानंतर माजी खासदार संजय निरुपम यांनी मुंबई विभागीय काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला.ठाण्याचा गड राखत शिवसेनेने बहुमत मिळविले. तेथे राष्ट्रवादी दुसऱ्या तर भाजपा तिसऱ्या क्रमांकावर राहिली. नाशिक कोणाचे भाजपा, शिवसेना की मनसेचे याचे उत्तर भाजपाला बहुमत देत नाशिककरांनी दिले. निवडणुकीच्या काळात वादात अडकलेल्या भाजपावर नाशिककरांनी संपूर्ण विश्वास व्यक्त करीत सत्तेच्या चाव्या सोपविल्या. विदर्भातील अमरावती आणि अकोला महापालिकेत भाजपाने पहिल्यांदाच बहुमताने सत्ता संपादन केली आहे. सोलापूरमध्ये भाजपा बहुमताच्या नजीक आहे. ज्येष्ठ काँग्रेस नेते सुशीलकुमार शिंदे यांच्या शहरात कमळ फुलले. तेथे शिवसेना दुसऱ्या क्रमांकावर आहे. उल्हासनगरमध्ये भाजपाला सर्वाधिक जागा मिळाल्या. साई आघाडी आणि अपक्षांच्या मदतीने सत्ता स्थापण्याची तयारी भाजपाने सुरू केली आहे.मनसेची दाणादाणगेल्यावेळी नाशिकमध्ये सत्तेत असलेल्या राज ठाकरे यांच्या मनसेला यावेळी केवळ पाच जागांवर समाधान मानावे लागले. मुंबईत गेल्यावेळी २७ जागा जिंकलेल्या मनसेला सात जागांवर थांबावे लागले. पुण्यात गेल्यावेळी लक्षणीय यश मिळविलेल्या मनसेने दोनच जागा जिंकल्या.नागपूर, पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपा जोरातमुख्यमंत्री फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा गड असलेल्या नागपुरात भाजपा १४५ पैकी शंभरावर जागा जिंकत काँग्रेसला जोरदार तडाखा दिला. नेत्यांच्या आपसातील भांडणांमुळे त्रस्त असलेल्या काँग्रेसची नागपुरात दैना झाली.पुण्यात गर्दी नसल्याने मुख्यमंत्र्यांची सभा रद्द करावी लागली म्हणून खिल्ली उडविली गेली त्याच पुण्याने बहुमताचे दान भाजपाच्या पदारात पहिल्यांदाच टाकले आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये सत्तेची चावी ही माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्याकडे होती पण तिथे भाजपाने राष्ट्रवादीला चारीमुंड्या चित करीत बहुमत मिळविले. यांना धक्काअजित पवार, राज ठाकरेसुशीलकुमार शिंदेयांचे यश फडणवीस, उद्धव ठाकरे, नितीन गडकरी