शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
2
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले
3
आधार कार्ड काढायला घराबाहेर पडले ते परतलेच नाहीत; पेट्रोल पंप मालकाचा २ मुलींसह संशयास्पद मृत्यू
4
Hero: ड्युअल डिस्क ब्रेक्स, मल्टीपल राइडिंग मोड्स आणि बरेच काही; हिरो एक्सट्रीम १२५ आर लॉन्च!
5
अरे देवा! मेट्रो स्टेशन तयार झालं पण नंतर कळालं उंचीच कमी, पुढं जे केलं ते पाहून थक्क व्हाल
6
स्टाँग रूमचे CCTV बंद, मध्यरात्री एका पिकअप व्हॅनची एन्ट्री; RJD च्या आरोपानंतर तपासाचे आदेश
7
चीनने वाढवली लष्करी ताकद! तिसरी विमानवाहू युद्धनौका 'फुजियान' तयार, अमेरिकेची चिंता वाढली
8
आधी ४५ कोटींचे मेट्रो स्टेशन बनवले, नंतर लक्षात आलं की उंची कमी झाली; मग...; हा जुगाड जाणून डोक्यावर हात माराल
9
कोण आहेत गजाला हाशमी? ज्यांनी अमेरिकेत रचला नवा इतिहास; भारताशी थेट कनेक्शन, जाणून घ्या
10
वीज चमकली की सुरू होतं काउंटडाउन!… काय आहे क्रिकेटच्या मैदानात क्वचित लागू होणारा '30:30 नियम'?
11
चॉकलेट की बिस्किट... आरोग्यासाठी जास्त धोकादायक काय? खाण्याआधी एकदा विचार कराच
12
बिहारमध्ये वाढलेल्या मतदानाचा अर्थ काय, कोणता फॅक्टरमुळे वाढलं मतदान? प्रशांत किशोरांनी मांडलं गणित
13
ब्रिस्बेनच्या मैदानात पावसाची बॅटिंग! टीम इंडियानं ऑस्ट्रेलियाविरुद्धची टी-२० मालिका २-१ अशी जिंकली
14
'...तर आम्ही शिंदेंच्या शिवसेनेसोबतची दोन जिल्ह्यात युती तोडू'; नारायण राणेंचा इशारा, तेलींबद्दल काय बोलले?
15
डॉक्टरच्या लॉकरमध्ये मिळाली AK-47 रायफल, जम्मू-काश्मीर पोलीसही चकित; नेमकं प्रकरण काय?
16
"भैया मत करो...", बाईकवर मागे बसलेल्या तरुणीसोबत रॅपिडो चालकाचं धक्कादायक कृत्य
17
Mumbai: कूपर रुग्णालयात मृत रुग्णाच्या नातेवाईकाकडून डॉक्टरांना मारहाण
18
"आधी कर्जबाजारी व्हायचं आणि मग पुन्हा कर्जमाफी मागायची"; राधाकृष्ण विखे पाटलांची शेतकऱ्यांवर आगपाखड
19
"पंतप्रधान मोदींनीही घातली होती टोपी, मी फोटो पाठवेन", मुस्लीम तुष्टीकरणाच्या आरोपांवर काय म्हणाले रेवंत रेड्डी?
20
Rishabh Pant: टीम इंडियाचं टेन्शन वाढलं, ऋषभ पंत पुन्हा जखमी, अर्ध्यातच मैदान सोडलं!

निवडणुकीनंतर शिवसेना-भाजप एकत्र येतील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2017 02:14 IST

निवडणुकीत आरोप-प्रत्यारोप हे होतच राहणार, पण भाजप-शिवसेना हे नैसर्गिक मित्रपक्ष असून निवडणुकीनंतरही हे पक्ष एकत्र येतील, असा विश्वास महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला.

कोल्हापूर : निवडणुकीत आरोप-प्रत्यारोप हे होतच राहणार, पण भाजप-शिवसेना हे नैसर्गिक मित्रपक्ष असून निवडणुकीनंतरही हे पक्ष एकत्र येतील, असा विश्वास महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला.कोल्हापुरात भाजप कार्यकर्त्यांच्या प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. मंत्री पाटील म्हणाले, शिवसेना-भाजप हे एकाच विचाराचे व संस्कृतीचे आहेत. एकमेकांची वैचारिक दोस्ती असून वैचारिक अजेंडाही एकच आहे. त्यामुळे आता युती तुटली असली तरी दोन्ही पक्षांनी एकमेकांवर असे आरोप करू नयेत की पुन्हा एकत्र यायला संकोच होईल. पुन्हा एकत्र यायचे असल्यास दोन्ही पक्षांनी एकमेकांवर आसूड ओढू नयेत. शिवसेना-भाजपचं सरकार पाच वर्षे राहणार असून शिवसेना सत्तेतून बाहेर पडणार नाही आणि राष्ट्रवादीची भाजपला गरजही भासणार नाही. स्वाभिमानी शेतकरी संघटना भाजपसोबत नसल्याचे आपल्याला दु:ख होतं आहे, असे असले तरी अजूनही खासदार राजू शेट्टी यांच्याशी आपली चर्चा सुरू आहे. मनसे आणि शिवसेना एकत्र आले तरी मुंबईत भाजप किमान ११५ जागा जिंकेल आणि महापौर भाजपचाच असणार आहे. लोकसभा, विधानसभा व नगरपालिका निवडणुकीतील यशानंतर जिल्हा परिषद व महानगरपालिका निवडणुकीत यश मिळाल्यावर हे यशाचे वर्तुळ पूर्ण होईल. निवडणुकांसाठी जुने-नवे कार्यकर्ते त्याचबरोबर पक्ष व अन्य पक्ष यांचा समतोल चांगल्या पद्धतीने साधण्यात यश मिळाले आहे. (प्रतिनिधी) लोकशाहीत कोणालाही बोलायला अधिकारजिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ‘शिवसेनेला जागा देणारे ‘दादा’ कोण ?’ अशी टीका चंद्रकांतदादा पाटील यांच्यावर काही दिवसांपूर्वी शिवसेना नेत्यांकडून झाली होती. याबाबत विचारल्यावर चंद्रकांतदादांनी ‘लोकशाहीत कोणालाही बोलायला अधिकार असून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जर लोक बोलत असतील तर मी सर्वसामान्य माणूस आहे,’ असे उत्तर दिले.