शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर: शरद पवारांनी केला पंतप्रधान नरेंद्र मोदींना फोन; म्हणाले, “या कठीण काळात...”
2
भारताच्या कारवाईने पाकिस्तानचा तीळपापड, शाहबाज शरीफ बैठका घेत सुटले; म्हणाले, 'आम्हीही उत्तर..."
3
हाफिज सईद, मसूद अझहर, सय्यद सलाउद्दीन..., भारताच्या एअर स्ट्राईकमध्ये दहशतवाद्यांच्या म्होरक्यांचं झालं एवढं नुकसान
4
'सैन्याच्या शौर्याला सलाम, आम्ही सरकारसोबत उभे आहोत'; 'ऑपरेशन सिंदूर'वर काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया
5
लादेन पुरवायचा निधी, कसाब-हेडलीने घेतलेले प्रशिक्षण..; भारताने 'ते' मरकज केले जमीनदोस्त
6
Operation Sindoor : "मुलाच्या मृत्यूचा बदला घेतला"; पर्यटकांसाठी जीव धोक्यात घातलेल्या आदिलच्या वडिलांची प्रतिक्रिया
7
'ऑपरेशन सिंदूर'मुळे IPL 2025 स्पर्धेच्या नियोजनात काय बदल होणार? BCCI ने दिलं उत्तर
8
operation sindoor video: जिथे रचले गेले, भारतात रक्ताचा सडा पाडणारे कट; ती ठिकाणं अशी उडवली, बघा व्हिडीओ
9
Naxal news: दहशतवाद्यांपाठोपाठ नक्षल्यांवरही 'वार'; तेलंगणाच्या सीमेवर २२ नक्षलवादी ठार
10
Operation Sindoor Live Updates: ऑपरेशन सिंदूरचं जे लक्ष्य होतं ते साध्य केलं - राजनाथ सिंह
11
भारत आणि पाकिस्तानमध्ये कोणत्या वस्तूंचा व्यापार होतो? किती आहे टॅरिफ?
12
तणाव वाढवायचा नाही, पण...; अजित डोवाल यांची अमेरिका,ब्रिटन आणि सौदीसह अनेक देशांशी चर्चा!
13
"भारतीय सैन्याने पाकिस्तानच्या दहशतवादी तळांवर केलेला हल्ला अभिमानास्पद, आता...", उद्धव ठाकरे यांची प्रतिक्रिया
14
Operation Sindoor : "आता पाकिस्तानला वेदनांची जाणीव झाली असेल, ऑपरेशन सिंदूरचा संपूर्ण देशाला अभिमान"
15
Operation Sindoor:'आम्ही झोपलेलो होतो अन् मोठा स्फोट झाला, असं वाटलं सूर्य उगवला'; मध्यरात्री पाकिस्तानात काय घडलं?
16
भारताच्या 'ऑपरेशन सिंदूर'मुळे पाकिस्तानमध्ये भीतीचे वातावरण! पंजाबच्या CM मरियम नवाज यांनी आणीबाणी जाहीर केली
17
'ऑपरेशन सिंदूर'वर सिनेमा बनवा! नेटकऱ्यांची बॉलिवूडकडे मागणी, सुचवलं 'या' अभिनेत्याचं नाव
18
पोलिसाच्या वर्दीत पाहून लेकाची काय होती प्रतिक्रिया? अंकुश चौधरी म्हणाला, "त्याने भलतीच मागणी..."
19
Operation Sindoor: 'ऑपरेशन सिंदूर'नंतर बांगलादेशच्या मनात भिती; खेळाडूंच्या सुरक्षेबाबत उपस्थित केले प्रश्न
20
वर्धा: विवाहित महिला आणि पुरुषाचे प्रेमसंबंध, शेतातील विहिरीत सापडले दोघांचे मृतदेह

निवडणुकीनंतर शिवसेना-भाजप एकत्र येतील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2017 02:14 IST

निवडणुकीत आरोप-प्रत्यारोप हे होतच राहणार, पण भाजप-शिवसेना हे नैसर्गिक मित्रपक्ष असून निवडणुकीनंतरही हे पक्ष एकत्र येतील, असा विश्वास महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला.

कोल्हापूर : निवडणुकीत आरोप-प्रत्यारोप हे होतच राहणार, पण भाजप-शिवसेना हे नैसर्गिक मित्रपक्ष असून निवडणुकीनंतरही हे पक्ष एकत्र येतील, असा विश्वास महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला.कोल्हापुरात भाजप कार्यकर्त्यांच्या प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. मंत्री पाटील म्हणाले, शिवसेना-भाजप हे एकाच विचाराचे व संस्कृतीचे आहेत. एकमेकांची वैचारिक दोस्ती असून वैचारिक अजेंडाही एकच आहे. त्यामुळे आता युती तुटली असली तरी दोन्ही पक्षांनी एकमेकांवर असे आरोप करू नयेत की पुन्हा एकत्र यायला संकोच होईल. पुन्हा एकत्र यायचे असल्यास दोन्ही पक्षांनी एकमेकांवर आसूड ओढू नयेत. शिवसेना-भाजपचं सरकार पाच वर्षे राहणार असून शिवसेना सत्तेतून बाहेर पडणार नाही आणि राष्ट्रवादीची भाजपला गरजही भासणार नाही. स्वाभिमानी शेतकरी संघटना भाजपसोबत नसल्याचे आपल्याला दु:ख होतं आहे, असे असले तरी अजूनही खासदार राजू शेट्टी यांच्याशी आपली चर्चा सुरू आहे. मनसे आणि शिवसेना एकत्र आले तरी मुंबईत भाजप किमान ११५ जागा जिंकेल आणि महापौर भाजपचाच असणार आहे. लोकसभा, विधानसभा व नगरपालिका निवडणुकीतील यशानंतर जिल्हा परिषद व महानगरपालिका निवडणुकीत यश मिळाल्यावर हे यशाचे वर्तुळ पूर्ण होईल. निवडणुकांसाठी जुने-नवे कार्यकर्ते त्याचबरोबर पक्ष व अन्य पक्ष यांचा समतोल चांगल्या पद्धतीने साधण्यात यश मिळाले आहे. (प्रतिनिधी) लोकशाहीत कोणालाही बोलायला अधिकारजिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ‘शिवसेनेला जागा देणारे ‘दादा’ कोण ?’ अशी टीका चंद्रकांतदादा पाटील यांच्यावर काही दिवसांपूर्वी शिवसेना नेत्यांकडून झाली होती. याबाबत विचारल्यावर चंद्रकांतदादांनी ‘लोकशाहीत कोणालाही बोलायला अधिकार असून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जर लोक बोलत असतील तर मी सर्वसामान्य माणूस आहे,’ असे उत्तर दिले.