शहरं
Join us  
Trending Stories
1
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
2
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
3
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
4
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
5
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
6
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
7
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
8
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
9
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
10
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
11
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
12
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
13
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
14
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
15
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
16
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
17
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले
18
Crime: विधवा भावजयीच्या प्रेमात पडला जेठ, लग्नासाठी सतत दबाव; नकार देताच अ‍ॅसिड फेकलं!
19
IND vs SA : सलग दोन सेंच्युरीसह 'या' पठ्ठ्यानं वाढवलं गिल-गंभीर जोडीचं टेन्शन; कारण...
20
आधार कार्ड काढायला घराबाहेर पडले ते परतलेच नाहीत; पेट्रोल पंप मालकाचा २ मुलींसह संशयास्पद मृत्यू

शिर्डी संस्थानचं बाहुबली "प्रभास"ला साकडं

By admin | Updated: July 6, 2017 16:57 IST

शिर्डी संस्थान सध्या ब्रॅण्ड अॅम्बेसेडरच्या शोधात असून यासाठी बाहुबली चित्रपटामुळे प्रसिद्धीच्या शिखरावर असलेल्या प्रभासला साकडं घालण्यात आलं आहे

ऑनलाइन लोकमत
अहमदनगर, दि. 6 - शिर्डी संस्थान सध्या ब्रॅण्ड अॅम्बेसेडरच्या शोधात असून यासाठी बाहुबली चित्रपटामुळे प्रसिद्धीच्या शिखरावर असलेल्या प्रभासला साकडं घालण्यात आलं आहे. साईबाबा समाधी शताब्दी सोहळ्यासाठी शिर्डी संस्थानाने जोरदार तयारी केली आहे. याचाच भाग म्हणून ब्रॅण्ड अॅम्बेसेडरची निवड केली जात आहे. शिर्डी संस्थान अध्यक्ष सुरेश हावरे यांनी ही माहिती दिली आहे.
 
आणखी वाचा - 
शिर्डीत मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखविणार
शिर्डीत लाडू कर्मचाऱ्यांचे आंदोलन
 
शिर्डी संस्थानचा ब्रँड अॅम्बेसेडर करण्यासाठी प्रभासोबत अजून दोन मोठी नावं चर्चेत आहेत. यामध्ये क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर, अभिनयाचा बादशाह अमिताभ बच्चन यांचाही समावेश आहे. नावं चर्चेत असली तरी अद्याप यापैकी कोणाशीही संपर्क झालेला नाही. शिर्डी संस्थानकडून या सर्वांना संपर्क करण्याचा प्रयत्न सुरु आहे, अशी माहिती सुरेश हावरे यांनी दिली आहे.
शिर्डी भारतातील प्रमुख देवस्थानांपैकी एक असून फक्त देशभरातूनच नाही, तर परदेशातूनही भाविक दर्शनासाठी येत असतात. 
शिर्डीत मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखविणार
 
साईसमाधी शताब्दी सोहळा अवघ्या काही दिवसांवर आला असताना सरकार व संस्थान पुरेशी विकासकामे करण्यात अपयशी ठरले आहे़ शताब्दीसाठी निधी देण्याऐवजी केवळ प्रस्तावाला मान्यता दिली़ त्याचा निषेध करण्यासाठी ८ जुलैला शिर्डी दौऱ्यात मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखवून शिर्डी बंद ठेवण्याचा निर्णय ग्रामसभेत घेण्यात आला आहे. 
 
साई संस्थानला वेळोवळी निवेदने देऊन, प्रत्यक्ष भेटून तसेच भावनांची तीव्रता निदर्शनास आणून देण्यासाठी आंदोलन करूनही संस्थान सुस्त आहे़ त्यामुळे संतप्त ग्रामस्थांनी शनिवारी ग्रामसभा घेतली. शताब्दी व शहरविकासाची कामे तातडीने सुरू करावी व आठ दिवसांत संस्थान अध्यक्षांनी ग्रामस्थांशी चर्चा करावी. अन्यथा विश्वस्त मंडळास शिर्डीत पाय ठेवू देणार देणार नाही, असा इशारा माजी नगराध्यक्ष कैलास कोते यांनी दिला होता.
 
डॉ. एकनाथ गोंदकर यांनी संस्थान व ग्रामस्थांत संवाद राहिला नसल्याचे सांगत कोणतेही काम सुरू नसल्याचा आरोप केला होता. आता आंदोलनाशिवाय पर्याय नसल्याचे त्यांनी सांगितले़ व्यवस्थापन व प्रशासन एकमेकांवर अपयशाचे खापर फोडत असल्याचे सांगण्यात येते.