शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
4
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
5
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
6
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
7
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
8
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
9
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
10
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
11
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
12
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
13
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
14
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
15
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
16
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
17
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
18
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
19
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
20
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता

शिंगणापूर चौथारा वाद ; तृप्ती देसार्इंना पोलिसांनी दोनदा अडविले

By admin | Updated: February 22, 2016 18:42 IST

शिंगणापूर ग्रामस्थ व देवस्थान ट्रस्टसोबत चर्चा करण्यासाठी शिंगणापूरला निघालेल्या भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांना आज (सोमवारी) पोलिसांनी नगर शहराजवळ केडगाव येथे अटकाव केला.

ऑनलाइन लोकमत

अहमदनगर, दि. २२ - शिंगणापूर ग्रामस्थ व देवस्थान ट्रस्टसोबत चर्चा करण्यासाठी शिंगणापूरला निघालेल्या भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांना आज (सोमवारी) पोलिसांनी नगर शहराजवळ केडगाव येथे अटकाव केला. कायदा सुव्यवस्थेच्या प्रश्नामुळे तुम्हाला शिंगणापूरला जाता येणार नाही, अशी नोटीस अतिरिक्त पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी त्यांना बजावली आहे.

पोलिसांनी देसार्इंसह माधुरी शिंदे, मीना राजू भटकर, मनिषा टिळेकर, शैनाज शेख या कार्यकर्त्यांना पोलीस मुख्यालयात थांबवून पुन्हा पुण्याकडे परतण्यास सांगितले. मात्र, नोटीस बजावल्यानंतरही देसाई व त्यांच्यासमवेतचे कार्यकर्ते नगरमधून शिंगणापूरकडे निघाल्याने औरंगाबाद रस्त्यावर त्यांना पुन्हा अडविण्यात आले.

आपण शिंगणापुरात जाऊनच ग्रामस्थांशी चर्चा करणार, अशी हटवादी भूमिका देसाई यांनी घेतली आहे. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन पुण्याच्या दिशेने नेले आहे. शनिशिंगणापूरचे विश्वस्तही चर्चा न करताच गावी परतले

 

यापुढे न सांगताच शिंगणापुरात प्रवेश करू, असा इशारा देसाई यांनी दिला आहे. आपल्या पहिल्या आंदोलनाला महिना उलटल्यानंतरही मुख्यमंत्र्यांनी आमच्यासोबत चर्चा केलेली नाही, असे नमूद करत देसाई यांनी पत्रकारांशी बोलताना सरकारचा निषेध केला आहे.