शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या हल्ल्यात ११ नाही तर अनेक पाकिस्तानी सैनिक ठार; पाक लष्कराने केले मान्य
2
Operation Sindoor: पाकिस्तानच्या आण्विक सुविधा केंद्रामधून किरणोत्सर्ग झालाय का, IAEA ने काय सांगितले?
3
Boycott Turkey: एकनाथ शिंदेंनी भारतीय व्यापारी आणि पर्यटकांची थोपाटली पाठ, तुर्की-अझरबैजानला फटका!
4
पहलगामचा बदला; आता स्थानिक दहशतवादी भारतीय सैन्याच्या निशाण्यावर, आतापर्यंत 6 ठार
5
Viral Video : आईस्क्रीममध्ये सापडली पालीची शेपूट; व्हिडीओ पाहून तुम्हालाही किळस येईल
6
निफ्टीने ७ महिन्यांनंतर ओलांडला २५,००० चा टप्पा; डिफेन्समधील तेजी कायम, हे शेअर्स घसरले
7
IND vs ENG: तब्बल ५०५५ दिवसांनंतर टीम इंडियाच्या बाबतीत घडून येणार 'असा' योगायोग
8
यावेळी मोठा धमाका करायचा... PM मोदींनी पहलगाम हल्ल्याची बातमी मिळताच मनात आखलेला 'प्लॅन'
9
'तो' वाद पिझ्झाच्या क्वालिटीवरून, मराठी न बोलण्यावरून नाही; महिलेने सांगितली खरी स्टोरी
10
उल्हासनगरात संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त! पत्नी व मुलीची हत्या करून पवन पाहुजा यांनी घेतला गळफास
11
Video - दहशतवाद्याच्या हातात बंदूक, चेहऱ्यावर भीती...; त्राल चकमकीचं ड्रोन फुटेज आलं समोर
12
WTC Finalच्या विजेत्याला मिळणार मोठ्ठी रक्कम, टीम इंडियाही मालामाल, पाकिस्तानला किती बक्षीस?
13
आमिर खान-राजकुमार हिरानी पुन्हा एकत्र, महाराष्ट्राच्या 'या' सुपुत्रावर घेऊन येणार बायोपिक!
14
पाकिस्तानातून गाढवांची खरेदी का करतो भारताचा शेजारी देश? काय आहे चिनी कनेक्शन?
15
इंग्लंड दौऱ्याआधी टीम इंडियाचा कोच गौतम गंभीरने पत्नीसह घेतले सिद्धिविनायकाचे दर्शन
16
सोशल मीडियावर लाईव्ह होती प्रसिद्ध इन्फ्लुएंसर, भेटवस्तू देण्याच्या बहाण्याने आलेल्या इसमाने झाडल्या गोळ्या!
17
Swami Samartha: स्वामी कृपा व्हावी वाटत असेल तर त्यांना नावडणारी 'ही' गोष्ट ताबडतोब सोडा!
18
कहाणी १९६५ च्या युद्धाची! आदमपूर एअरबेसवर कब्जा करण्यासाठी उतरले ५५ पाकिस्तानी कमांडो, १२ ठार तर बाकी...
19
मुकेश अंबानी यांनी घेतली डोनाल्ड ट्रम्प यांची भेट; आखाती देशात किती पसरलाय व्यवसाय?
20
IAS-IPS बनण्याची सूवर्णसंधी; UPSC ने जारी केले परीक्षांचे वेळापत्रक, जाणून घ्या संपूर्ण माहिती...

चमकोंची हौस पुरी; पण ‘विच्छा’ मात्र अपुरी !

By admin | Updated: February 8, 2015 23:27 IST

यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे,’ हे वाक्य वारंवार म्हणतो तो निवेदक (नव्हे अँकर), लोक आपली कला नव्हे, तर आपल्याला पाहायला आलेत

राजीव मुळ्ये, बेळगाव, बाळासाहेब ठाकरे नाट्यनगरी : ‘यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे,’ हे वाक्य वारंवार म्हणतो तो निवेदक (नव्हे अँकर), लोक आपली कला नव्हे, तर आपल्याला पाहायला आलेत, याचं पक्कं भान ज्यांना आहे ते कलावंत (नव्हे सेलिब्रिटी) आणि या दोहोंची गोळाबेरीज म्हणजे ‘इव्हेंट’! या रूढ व्याख्यांचा जेव्हा अस्सल कलेला तडाखा बसतो, तेव्हा ‘हौस’ पुरी होते; पण ‘विच्छा’ अपुरीच राहते!नाट्य संमेलनाच्या मुख्य मंडपात शनिवारी रात्री असाच प्रकार पाहायला मिळाला. ‘इव्हेंट’ नावाचा सेलिब्रिटींचा उत्सव वाढता वाढे या न्यायाने लांबतच राहिला आणि त्यानंतर सुरू झालेला ‘विच्छा माझी पुरी करा’ या भन्नाट वगनाट्याचा रंगत चाललेला प्रयोग वेळ संपल्याने मध्येच थांबवावा लागला. अचूक ‘टायमिंग’ हे बलस्थान असलेले अभिनेते विजय कदम यांना सर्वोच्च न्यायालयाने आखून दिलेल्या ‘टायमिंग’चा फटका सहन करावा लागला. ‘विच्छा’चा प्रयोग अपूर्ण राहिल्यामुळं अस्सल नाट्यप्रेमी हळहळतच मंडपाबाहेर पडले.केवळ ‘एक्साइटमेंट’ देणाऱ्या ‘इव्हेंट’ या प्रकाराची क्रेझ आता केवळ मुंबईपुरती नव्हे, तर लहान-मोठ्या शहरांतही पसरली आहे. बेळगावकरांनाही या ‘क्रेझ’नं झपाटलं असणारच, असा होरा ठेवून ‘ज्येष्ठ सेलिब्रिटीं’ची एक रजनी शनिवारी झाली होती. मुख्यमंत्री सकाळी न येता संध्याकाळी आल्यामुळं ही रजनी सुरू व्हायला उशीर झाला. त्यानंतर ‘विच्छा’चा प्रयोग होता. सर्वोच्च न्यायालयाने वेळेसंदर्भात घातलेले निर्बंध आयोजकांना माहीतच नाहीत, हे शक्य नाही. त्यामुळं ‘इव्हेंट’ची हौस आवरती घेऊन रंगमंच विजय कदमांच्या हाती सोपवला जाणं आवश्यक होतं. मात्र, घडलं भलतंच!तरुण सेलिब्रिटींनी तर बेळगाव संमेलनाकडे पाठ फिरवलीच आहे; त्यामुळं जे सेलिब्रिटी हजर आहेत, त्यांनाच आग्रह करकरून गाणं म्हणायला भाग पाडण्यात आलं. पाच-सहा कलावंतांचा आॅर्केस्ट्रा दिमतीला होताच. ज्यांना गाणं अजिबातच येत नाही, त्यांनी कविता वगैरे (अर्थातच दुसऱ्यांनी लिहिलेल्या) म्हणून दाखवल्या. ज्यांना ‘स्केल’ सांभाळता येत नाही अशांनी गाणी म्हटली. कोणे एकेकाळी नृत्यांगना असलेल्यांनी नृत्यं सादर केली. मधून-मधून पातळ विनोदांची फोडणी दिली गेली. उत्सुकता ताणण्याचा अभिनय करणाऱ्या स्त्री-पुरुष निवेदकांनी बोलून-बोलून काव आणला. पुन्हा प्रत्येक परफॉर्मरचा सत्कार! तोही एखाद्या सेलिब्रिटीच्या हस्ते! म्हणजे, ‘आता मी स्टेजवर आमंत्रित करतो....’ हे वाक्यही पुन:पुन्हा ऐकायचं. सेलिब्रिटींचं ‘दर्शन’ घ्यायचं आणि (अँकरनं सांगितल्यावर) टाळ्या वाजवायच्या, एवढंच रसिकांच्या हाती उरलं. कारकिर्दीचा विशिष्ट मुक्काम गाठलेल्या सेलिब्रिटींनीच सादरीकरण केलं, ही बाब दखल घेण्याजोगी आहे. ज्येष्ठ रंगकर्मी जयंत सावरकर यांनी सादर केलेला ‘एकच प्याला’मधला सुंदर प्रवेश हीच या रजनीची एकमेव उजवी बाजू ठरली. त्यानंतर वगसम्राट विजय कदम यांच्याकडे रंगमंचाचा ताबा आला. ढोलकीच्या भन्नाट तुकड्याने वातावरण गरम केलं. फक्कड बतावणीतून गोष्ट सुरू झाली. प्रधान, कोतवाल, हवालदार, त्याची प्रेयसी अशी सगळीच पात्रं जीव ओतून नाटकात रंग भरू लागली... आणि... अचानक विजय कदम हात जोडून उभे राहिले. ‘न्यायालयाच्या आदेशानुसार इथंच थांबावं लागतंय. माफ करा,’ असं ते म्हणाले व सन्नाटा पसरला.