शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Alert : गणपतीच्या आगमनाला पावसाचा 'ताशा'! पुढचे काही दिवस 'मुसळधार' कोसळणार; कोणत्या जिल्ह्यांना इशारा?
2
'कर्मचारी निलंबित होऊ शकतो, तर पंतप्रधान का नाही?', PM-CM विधेयकावरुन मोदींचा काँग्रेसवर निशाणा
3
आता ट्रम्प यांचा खरा थयथयाट होणार...! देत बसले टॅरिफची धमकी, इकडे भारत-रशियानं मिळवला हात, केले अनेक करार! बघा लिस्ट
4
घर खरेदीदारांसाठी मोठी बातमी! घर बांधणे आणि खरेदी करणे स्वस्त होणार? कोणाला होणार सर्वाधिक फायदा?
5
उपराष्ट्रपती निवडणूक २०२५: पवार-ठाकरेंशी फोनवर काय बोलणे झाले? CM फडणवीसांनी सगळेच सांगितले
6
नवऱ्याच्या हत्येचा कट रचला, बॉयफ्रेंडही सामील झाला; पण 'त्या' WhatsApp मेसेजमुळे पत्नीचा डाव उघड झाला!
7
"त्यांना लीड भूमिका केलेल्याच मुली हव्या असतात...", अमृता देशमुखने सांगितलं टीव्ही मालिकांचं कटू सत्य
8
श्रीलंकेचे माजी राष्ट्रपती रानिल विक्रमसिंघे यांना अटक; सरकारी निधीचा गैरवापर केल्याचा आरोप
9
“RSS बंदी असलेली संघटना आहे का?”; CM फडणवीसांचे सुनेत्रा पवारांवरील टीकेला प्रत्युत्तर
10
Dream 11 लव्हर्सचा 'गेम ओव्हर'! टीम इंडियाच्या जर्सीवरुनही 'गायब' होणार नाव? जाणून घ्या सविस्तर
11
Airtel नं आपल्या स्वस्त रिचार्ज प्लानमध्ये केला मोठा बदल; पूर्वीपेक्षा कमी मिळणार डेटा, पाहा डिटेल्स
12
Kim Jong Un: मुलांना जवळ घेतलं, सैनिकांना दिला धीर, हुकुमशाह किम जोंग उन यांचे डोळे का पाणावले?
13
'नमस्ते सदा वत्सले मातृभूमे...', विधानसभेत काँग्रेसच्या उपमुख्यमंत्र्यांनी गायले RSS चे प्रार्थना गीत
14
Shani Amavasya 2025: देवघरात शनि देवाची मूर्ति किंवा प्रतिमा न ठेवण्यामागे काय आहे कारण?
15
बापरे! रात्रभर बेडवर नागाजवळ झोपला, सकाळी डोळं उघडताच धक्का बसला, घडलं असं...
16
Hero ने फक्त १ लाख रुपयांना लॉन्च केली दमदार बाईक, जाणून घ्या फिचर्स...
17
"चावण्याचं कारण केवळ..."; नसबंदीनंतर कुत्र्यांना सोडून देण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशावर नेमकं काय म्हणाल्या मनेका गांधी?
18
आधी लोकांची फसवणूक केली, नंतर तुरुंगात जायला लागू नये म्हणून महिलेनं काय शक्कल लढवली वाचाच!
19
“फडणवीसांचा फोन आला होता, पण आम्ही रेड्डी यांना पाठिंबा दिला आहे”; संजय राऊतांनी केले स्पष्ट
20
Asia Cup 2025 : MS धोनीनं करुन दाखवलं ते सूर्याला जमणार का? रोहितही ठरलाय फेल! जाणून घ्या खास रेकॉर्ड

चमकोंची हौस पुरी; पण ‘विच्छा’ मात्र अपुरी !

By admin | Updated: February 8, 2015 23:27 IST

यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे,’ हे वाक्य वारंवार म्हणतो तो निवेदक (नव्हे अँकर), लोक आपली कला नव्हे, तर आपल्याला पाहायला आलेत

राजीव मुळ्ये, बेळगाव, बाळासाहेब ठाकरे नाट्यनगरी : ‘यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे,’ हे वाक्य वारंवार म्हणतो तो निवेदक (नव्हे अँकर), लोक आपली कला नव्हे, तर आपल्याला पाहायला आलेत, याचं पक्कं भान ज्यांना आहे ते कलावंत (नव्हे सेलिब्रिटी) आणि या दोहोंची गोळाबेरीज म्हणजे ‘इव्हेंट’! या रूढ व्याख्यांचा जेव्हा अस्सल कलेला तडाखा बसतो, तेव्हा ‘हौस’ पुरी होते; पण ‘विच्छा’ अपुरीच राहते!नाट्य संमेलनाच्या मुख्य मंडपात शनिवारी रात्री असाच प्रकार पाहायला मिळाला. ‘इव्हेंट’ नावाचा सेलिब्रिटींचा उत्सव वाढता वाढे या न्यायाने लांबतच राहिला आणि त्यानंतर सुरू झालेला ‘विच्छा माझी पुरी करा’ या भन्नाट वगनाट्याचा रंगत चाललेला प्रयोग वेळ संपल्याने मध्येच थांबवावा लागला. अचूक ‘टायमिंग’ हे बलस्थान असलेले अभिनेते विजय कदम यांना सर्वोच्च न्यायालयाने आखून दिलेल्या ‘टायमिंग’चा फटका सहन करावा लागला. ‘विच्छा’चा प्रयोग अपूर्ण राहिल्यामुळं अस्सल नाट्यप्रेमी हळहळतच मंडपाबाहेर पडले.केवळ ‘एक्साइटमेंट’ देणाऱ्या ‘इव्हेंट’ या प्रकाराची क्रेझ आता केवळ मुंबईपुरती नव्हे, तर लहान-मोठ्या शहरांतही पसरली आहे. बेळगावकरांनाही या ‘क्रेझ’नं झपाटलं असणारच, असा होरा ठेवून ‘ज्येष्ठ सेलिब्रिटीं’ची एक रजनी शनिवारी झाली होती. मुख्यमंत्री सकाळी न येता संध्याकाळी आल्यामुळं ही रजनी सुरू व्हायला उशीर झाला. त्यानंतर ‘विच्छा’चा प्रयोग होता. सर्वोच्च न्यायालयाने वेळेसंदर्भात घातलेले निर्बंध आयोजकांना माहीतच नाहीत, हे शक्य नाही. त्यामुळं ‘इव्हेंट’ची हौस आवरती घेऊन रंगमंच विजय कदमांच्या हाती सोपवला जाणं आवश्यक होतं. मात्र, घडलं भलतंच!तरुण सेलिब्रिटींनी तर बेळगाव संमेलनाकडे पाठ फिरवलीच आहे; त्यामुळं जे सेलिब्रिटी हजर आहेत, त्यांनाच आग्रह करकरून गाणं म्हणायला भाग पाडण्यात आलं. पाच-सहा कलावंतांचा आॅर्केस्ट्रा दिमतीला होताच. ज्यांना गाणं अजिबातच येत नाही, त्यांनी कविता वगैरे (अर्थातच दुसऱ्यांनी लिहिलेल्या) म्हणून दाखवल्या. ज्यांना ‘स्केल’ सांभाळता येत नाही अशांनी गाणी म्हटली. कोणे एकेकाळी नृत्यांगना असलेल्यांनी नृत्यं सादर केली. मधून-मधून पातळ विनोदांची फोडणी दिली गेली. उत्सुकता ताणण्याचा अभिनय करणाऱ्या स्त्री-पुरुष निवेदकांनी बोलून-बोलून काव आणला. पुन्हा प्रत्येक परफॉर्मरचा सत्कार! तोही एखाद्या सेलिब्रिटीच्या हस्ते! म्हणजे, ‘आता मी स्टेजवर आमंत्रित करतो....’ हे वाक्यही पुन:पुन्हा ऐकायचं. सेलिब्रिटींचं ‘दर्शन’ घ्यायचं आणि (अँकरनं सांगितल्यावर) टाळ्या वाजवायच्या, एवढंच रसिकांच्या हाती उरलं. कारकिर्दीचा विशिष्ट मुक्काम गाठलेल्या सेलिब्रिटींनीच सादरीकरण केलं, ही बाब दखल घेण्याजोगी आहे. ज्येष्ठ रंगकर्मी जयंत सावरकर यांनी सादर केलेला ‘एकच प्याला’मधला सुंदर प्रवेश हीच या रजनीची एकमेव उजवी बाजू ठरली. त्यानंतर वगसम्राट विजय कदम यांच्याकडे रंगमंचाचा ताबा आला. ढोलकीच्या भन्नाट तुकड्याने वातावरण गरम केलं. फक्कड बतावणीतून गोष्ट सुरू झाली. प्रधान, कोतवाल, हवालदार, त्याची प्रेयसी अशी सगळीच पात्रं जीव ओतून नाटकात रंग भरू लागली... आणि... अचानक विजय कदम हात जोडून उभे राहिले. ‘न्यायालयाच्या आदेशानुसार इथंच थांबावं लागतंय. माफ करा,’ असं ते म्हणाले व सन्नाटा पसरला.