शहरं
Join us  
Trending Stories
1
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
2
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
3
AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video
4
१५ वर्ष भारतीय सेनेत देशसेवा केली, केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेत आला मृत्यू; कोण होते पायलट राजवीर सिंह?
5
कुंडमळा पूल दुर्घटनेनंतर सुप्रिया सुळे घटनास्थळी; जखमींना दिला धीर, मदतीचे निर्देश
6
नागरिकांनी अपघाताची केली होती, शक्यता व्यक्त;सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासनाने केले दुर्लक्ष
7
कुंडमळा येथे क्षणात कोसळला पूल..! रांजणखळग्यांमुळे शोध मोहिमेत अडथळे
8
राजकोट किल्ल्यावरील शिवरायांच्या पुतळ्याला पुन्हा धोका?; चबुतऱ्याजवळील माती खचली
9
Pune Bridge Collapse: पूल दुर्घटनेत २ मृत्यू, ३२ जखमी, ६ जणांना वाचवले, मात्र आणखी काही...; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
10
Bridge Collapse: कुंडमाळ्याजवळील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला; अनेक पर्यटक बुडाल्याची भीती
11
Pune Bridge Collapse: दोन महिन्यांपूर्वी इंद्रायणी नदीवरील पूल बंद झाला होता, बचाव मोहिम सुरू, व्हिडीओ आला समोर
12
नवरी जोमात, नवरा कोमात! लग्नानंतर १० दिवसांनी शॉपिंगच्या नावाने पत्नी फरार, पती पाहतोय वाट
13
एका दिवसात किती भाविक हेलिकॉप्टरने केदारनाथला जातात? किती वेळ लागतो? जाणून घ्या...
14
कुंडमळा दुर्घटनेत पहिला बळी..! बचाव कार्यादरम्यान महिलेचा मृतदेह सापडला
15
शिवसेना फुटीमागे कोण होतं जबाबदार?; मंत्री भरत गोगावले यांचा खळबळजनक दावा
16
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "मला बाबांशी बोलायचंय..."; विमान अपघातात ८ वर्षांच्या मुलाने गमावले वडील
17
तुमचा EMI कमी होणार! RBI च्या निर्णयानंतर 'या' बँका देतायत सर्वात स्वस्त कर्ज, पाहा संपूर्ण यादी!
18
पाठवणी होताच झालं नवरीचं अपहरण; शोधाशोध करताच समोर आलं धक्कादायक सत्य! नवराही शॉक
19
"महेश सापडेल अशी आशा..!" अहमदाबाद विमान दुर्घटनेत लोकप्रिय संगीतकार बेपत्ता, शेवटचं लोकेशन सापडलं, पण...
20
Neha Marda : 'बालिका वधू'मधील 'गेहना' कुठे झाली गायब? अभिनेत्री बनली बिझनेसवुमन, आता करणार कमबॅक

शिल्पग्रामला उर्जितावस्थेची गरज

By admin | Updated: April 4, 2015 00:10 IST

प्रकल्प बंद असल्यामुळे पर्यटकांची पाठ सावंतवाडीच्या समस्या

प्रसन्न राणे - सावंतवाडी  विदेशातील पर्यटकांनी केलेल्या सफरीतील आकर्षण असलेल्या सावंतवाडीतील शिल्पग्राम या पर्यटनस्थळाचा आनंद अनेकवेळा जिल्ह्यासह विदेशातील पर्यटकांनी लुटला आहे. मात्र, हे स्थळ मागील काही वर्षांपासून बंदावस्थेत असल्याने या स्थळाचे आकर्षण नष्ट होताना दिसत आहे. प्रशासनाने या स्थळाच्या सांैदर्याला पुन्हा नवीन झळाळी देत प्रकल्प सुरू करणे आवश्यक आहे. महाराष्ट्र पर्यटन विकास मंडळाच्या माध्यमातून साडेतीन कोटी रुपये खर्च करून शिल्पग्राम प्रकल्प उभारण्यात आला आहे. विविध चित्ररथ, फिल्म सिनेमागृह, पर्यटकांना राहण्यासाठी घरे, तंबू, तलाव, रेस्टॉरंट, हॉल अशा प्रकारच्या अनेक सोयीसुविधा या शिल्पग्राममध्ये पर्यटन विकास मंडळाच्या माध्यमातून या ठिकाणी करण्यात आल्या आहेत. मध्यंतरीच्या काळात या ठिकाणी दुर्लक्ष झाल्याने शिल्पग्राममधील काही सामानाची नासधूस झाली आहे. पर्यटकांना राहण्यासाठी उभारलेल्या घरातील सामानाची चोरी तसेच काही सामानाची तोडफोडही झाली होती. यानंतर या ठिकाणी सावंतवाडी नगर परिषदेने हा परिसर स्वच्छ करून ठेवल्याचे दिसून येत आहे. याठिकाणी पर्यटनदृष्ट्या कोणताही उपक्रम राबविण्यात आल्याचे दिसून येत नाही. सावंतवाडीत अनेक पर्यटन स्थळे आहेत. या सर्वांची पाहणी करून शिल्पग्राममध्ये उत्तम अशी पर्यटकांसाठी राहण्याची व अन्य सेवासुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. मात्र, आता या बंद सुविधा सुरू करणे आवश्यक आहे. शिल्पग्राममध्ये या अगोदर अनेक पर्यटकांचा प्रतिसाद लाभला आहे. देश-विदेशातून अनेकवेळा शिल्पग्रामात पर्यटक आनंदोत्सव साजरा करून गेलेले आहेत. सावंतवाडी नगरपरिषदेने या अगोदर लाखो रुपये खर्च करून तीन वेळा विदेशी पर्यटकांचे आयोजनही केले होते. दरम्यान, अनेक स्थानिक नागरिकांनीही या शिल्पग्रामचा आस्वाद घेतला होता. मात्र, त्यानंतरच्या काळात शिल्पग्रामात प्रवेश बंद केल्याने आजपर्यंत शिल्पग्राम त्याच स्थितीत आहे.शिल्पग्राम इच्छुक एजन्सीकडे देणारशिल्पग्राम येणाऱ्या पर्यटकांसाठी अगोदरपासूनच सुरू आहे. मात्र, त्यांच्याकरिता बांधण्यात आलेली घरे एजंटअभावी बंद ठेवण्यात आली होती. मात्र, ही घरे पुन्हा दुरुस्त करून इच्छुक एजन्सीकडे देण्याचा मानस आहे. याकरिता काही एजंटशी बोलणे झाले असून येत्या सहा महिन्यात शिल्पग्राम पूर्ववत बनविण्यात येणार आहे. - बबन साळगावकर, नगराध्यक्ष, सावंतवाडीप्रकल्प शुल्क सर्वसामान्यांना परवडणारे व्हावेसावंतवाडी शहरात शासन मान्यतेनुसार मोठे प्रकल्प उभारण्यात आले आहेत. मात्र, शासनाने सामान्य जनतेला परवडणारे शुल्क लावले पाहिजे तरच याचा विकास होईल. शिल्पग्रामसह शहरातील सर्व प्रकल्पांची प्रसिद्धी होणे आवश्यक आहे. यासाठी शासनाने मोठ्या प्रमाणात लादलेले शुल्क कमी करुन स्थानिकांना प्रकल्प चालविण्यास परवडेल असे शुल्क ठेवले पाहिजे. प्रकल्प करुन झाल्यास गोवा, कर्नाटक येथील पर्यटकांना याचा फायदा होणार आहे.- गोविंद वाडकर, नगरसेवक, सावंतवाडी