शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
2
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
3
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
4
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
5
जातनिहाय जनगणनेला RSS ने दीड वर्षांअगोदरच केरळमधून दाखविला होता हिरवा झेंडा
6
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
7
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
8
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
9
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
10
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
11
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
12
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
13
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
14
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
15
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
16
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
17
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
18
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
19
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
20
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत

पाली एसटी स्थानकाची दुरवस्था

By admin | Updated: July 10, 2017 03:24 IST

पाली-सुधागड अष्टविनायक तीर्थक्षेत्रांपैकी एक आहे

लोकमत न्यूज नेटवर्कपाली : पाली-सुधागड अष्टविनायक तीर्थक्षेत्रांपैकी एक आहे. श्री बल्लाळेश्वर गणपतीचे तीर्थक्षेत्र असल्याने पालीचे नाव संपूर्ण महाराष्ट्रासह भारताच्या नकाशावर कोरले गेल्याने येथे दर्शनासाठी दररोज हजारो भाविकांची रीघ लागलेली असते. तसेच पाली हे तालुक्याचे ठिकाण असल्याने येथे शिक्षणासाठी जिल्हाभरातून हजारो विद्यार्थी येत असतात. ते सर्व विद्यार्थी, भाविक व पर्यटक एसटीनेच प्रवास करत असल्याने त्यांना पाली एसटी स्थानकात जावेच लागते; परंतु या पाली एसटी स्थानकाची अवस्था बिकट झाली आहे. या स्थानकात सर्वत्र कचरा साठला असून दुर्गंधी पसरली आहे, त्याचप्रमाणे स्थानकात जेथे एसटी लावल्या असतात तेथे समोरच अवैध दुचाकींची पार्किंग केल्याने प्रवाशांना ये-जा करण्याचा मार्ग देखील नसतो. या एक ना अनेक अशा समस्यांनी प्रवाशांसह नागरिक त्रस्त झाले आहेत.पाली एसटी स्थानकात शौचालयांची व्यवस्था नसल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे. येथील इमारत मोडकळीस आली असून, शेवटची घटका मोजता आहे. त्यामुळे येथे अपघात होण्याची शक्यता वतविण्यात येत आहे. अशा अनेक अडचणींचा सामना करीत प्रवास करावा लागत असल्यामुळे प्रवासीवर्गामध्ये नाराजीचे वातावरण पसरले असून, त्यांनी या सर्व समस्यांकडे लक्ष देण्यासाठी थेट परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्याकडे मागणी केली आहे. बल्लाळेश्वर पाली एसटी स्थानकाची नवीन इमारत बांधण्यासाठी रावते यांना साकडे घातले आहे. तसेच या इमारतीच्या दुरवस्थेबाबत सामाजिक कार्यकर्ते रवींद्रनाथ ओव्हाळ यांनी मागीलवर्षी उपोषण देखील केले होते; परंतु याचे काहीही सोयरसुतक कोणालाही नाही. >सुधागड तालुक्यातील बसथांब्यांची दुरवस्थापाली-खोपोली मार्गावर महाराष्ट्र परिवहन मंडळाचे अनेक बसथांबे आहेत. पावसाळा व उन्हाळ्यात प्रवाशांना या स्थानकांचा आधार असतो. मात्र, गेली अनेक वर्षे या थांब्यांकडे दुर्लक्ष केल्याने तालुक्यातील काही थांबे जमीनदोस्त झाले तर काही असून नसल्यासारखे आहेत. परळी व पेडली येथे स्थानक सुस्थितीत आहेत. मात्र, या स्थानकांच्या आवारात चारही बाजूने दुकाने थाटल्याने प्रवाशांना यात बसता येत नाही तर घोड्याचा डोह, राबगाव अशी स्थानके नेस्तनाबूत झाली आहेत.वाकण, पाली, खोपोली हा राज्यमार्ग मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाचा बायपास म्हणून वाकण-पाली-खोपोली या राज्यमार्गाचा उपयोग केला जातो. त्यामुळे या मार्गावर वाहनांची वर्दळ सतत चालू असते. या रस्त्यांवरून मोठ्या संख्येने प्रवासी प्रवास करत असतात. मात्र, या मार्गावर असलेल्या बसथांब्याची दुरवस्था झाली आहे. या स्थानकाला जोडलेली अनेक गावे आहेत. त्यात प्रामुख्याने सुधागड तालुक्यात डोंगराळ भाग असल्याने त्यांना बाजारहाट करण्याकरिता पाली, परळी, पेडली या बाजारपेठा आहेत. येथेच बाजारहटासाठी यावे लागते. अशा वेळी बसचाच आधार या नागरिकांना असतो. मात्र, तालुक्यातील बस थांब्यावरील शेडचे संपूर्ण पत्रे फुटलेले आहेत. भिंती पडलेल्या अवस्थेत असून लोखंडी खांब वाकलेले आहेत अशी अवस्था बसथांब्यांची झाली आहे. या बसथांब्यांची दुरवस्था झाल्यामुळे तालुक्यातील ग्रामस्थ, प्रवासी, शालेय विद्यार्थ्यांना त्रास सहन करावा लागत आहे आणि तेथेच त्या भागात माध्यमिक हायस्कूल असल्यामुळे तेथे येणाऱ्या-जाणाऱ्या विद्यार्थ्यांना रस्त्याच्या बाजूला उभे राहून बसची वाट पाहावी लागते. मात्र, या रस्त्यावर वाहनांची सतत वर्दळ असल्यामुळे येथे उभे राहणारे प्रवासी किंवा विद्यार्थ्यांचा अपघात होण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही. म्हणून येथील स्थानिक प्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्त्यांनी संबंधित प्रशासनाकडे लक्ष देऊन हे बसथांबे सुस्थितीत करावे, अशी मागणी जोर धरत आहे.पाली एसटी स्थानकाची इमारत ही पूर्णपणे जीर्ण झाली असून, तिचे अनेक भाग कोसळले आहेत. या धोकादायक इमारतीमध्येच प्रवासी व शाळा, कॉलेजच्या विद्यार्थ्यांना उभे राहावे लागत असल्याने या पावसाळ्यात ही इमारत पडून मोठी दुर्घटना झाल्यास त्यास परिवहन खाते जबाबदार असेल.- रवींद्रनाथ ओव्हाळ, सामाजिक कार्यकर्ते, पाली