शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशात माणसांची किंमत नाही, रेल्वेमंत्र्यांनी तिथं जाऊन ..."; मुंबई लोकल दुर्घटनेवर राज ठाकरे संतापले
2
२४ तासांत असे काय घडले की सोनम लगेच सरेंडर करायला आली? तिच्या साथीदारांची एक चूक...
3
सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
4
Vat Purnima 2025: कशी करावी वटपौर्णिमेच्या पूजेची तयारी? जाणून घ्या साहित्य, विधी आणि शुभ मुहूर्त!
5
राजा रघुवंशी हत्येप्रकरणात नवा ट्विस्ट...! सोनमचा मोठा दावा, स्वतःला सांगतेय निर्दोष; अशी पोहोचली गाझीपूरला
6
मुंब्रा ट्रेन अपघातावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले- "रोज सकाळी हजारो प्रवासी..."
7
Viral Video : मुलीला इम्प्रेस करायला गेला अन् पचका झाला! तरुणाचा व्हिडीओ बघून तुम्हीही म्हणाल अरेरे..
8
३००० गाड्या वाहून नेणाऱ्या जहाजाला भीषण आग! ७५० इलेक्ट्रिक कार धोक्यात; आगीचं नेमकं कारण काय?
9
Sonam Raghuvanshi : नेपाळला पळून जाण्याचा होता सोनमचा प्लॅन?, कोणीही ओळखू नये म्हणून 'अशी' लढवली शक्कल
10
ज्योतिष्याची 'ती' भविष्यवाणी खरी ठरली; राजा-सोनम लग्नाआधी अन् नंतर काय घडले?
11
"मोदी सरकार उत्सव करत असताना लोक रेल्वेतून पडून मेली" मुंब्रातील घटनेवरून राहुल गांधी बरसले
12
'छावा'नंतर महाराष्ट्रातील 'या' तमाशा कलावंतावर लक्ष्मण उतेकर बनवणार सिनेमा? श्रद्धा कपूर साकारणार भूमिका
13
Vat Purnima 2025 Wishes: वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा! जोडीदाराला पाठवा आणि स्टेटसला ठेवा 'हे' प्रेमळ संदेश
14
Mumbra Train Accident: लोकल ट्रेनमधून पडले, किडे-मुंग्यांसारखा गेला जीव, मृत्यू झालेले कोण? नावे आली समोर
15
'रेल्वे मंत्री आहेत की रील मंत्री?' मुंबई रेल्वे दुर्घटनेवरून आदित्य ठाकरेंची केंद्रावर टीका
16
मुंबईला जाणाऱ्या मालवाहू जहाजात स्फोट, ५० कंटेनर समुद्रात पडले; ४ कर्मचारी बेपत्ता
17
ना युक्रेन, ना ब्रिटन, 'हा' देश रशियाचा शत्रू नंबर वन; हिटलरशी आहे थेट कनेक्शन, कारण...
18
भारताच्या कंपन्यांवर टाळं लावण्याच्या प्रयत्नात पाकिस्तानचा मित्र चीन! आपली काय आहे तयारी?
19
परप्रातांमधून मुंबईत आदळणारे लोंढेच जबाबदार; मुंबईत मुंब्रा घटनेवरून राज ठाकरेंचा संताप
20
Sonam Raghuvanshi : राजा रघुवंशीची हत्या करणारे हेच ते; आरोपींचे फोटो आले समोर, सोनमसोबत रचला भयंकर कट

कचऱ्यातून वेचले तिने ज्ञानाचे कण!

By admin | Updated: June 13, 2016 05:13 IST

कोपर येथील राहुलनगर झोपडपट्टीत राहणारी कचरावेचक मुलगी नीशा सरोदेने दहावीच्या परीक्षेत ८४ टक्के गुण मिळवले आहेत.

डोंबिवली : कोपर येथील राहुलनगर झोपडपट्टीत राहणारी कचरावेचक मुलगी नीशा सरोदेने दहावीच्या परीक्षेत ८४ टक्के गुण मिळवले आहेत. नीशाने प्रतिकूल परिस्थितीवर मात करून कचऱ्यातून ज्ञानाचे कण वेचल्याने तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. तिला कॉम्प्युटर इंजिनीअरचे शिक्षण घेण्याची इच्छा आहे. घरची परिस्थिती हलाखीची असून कचरा वेचूनच कुटुंब कसेबसे चालवण्याचा संघर्ष राहुलनगर झोपडपट्टीत राहणाऱ्या मीना सरोदेकरीत आहे. त्यांच्या पतीने त्यांना सोडून गाव गाठले. त्यानंतर, मीना यांनी त्यांच्या चार मुलींना घेऊन जीवन जगण्यास सुरुवात केली. मुलींना सांभाळण्यासाठी त्यांनी कचरावेचकाचे काम सुरू केले. त्यांना अलका, शिल्पा, कल्पना आणि नीशा या चार मुली आहेत. त्यापैकी अलकाचा विवाह झाला आहे. शिल्पाने सहावीपर्यंत शिक्षण घेतले आहे. कल्पना नववीपर्यंत शिकली आहे. कल्पना व शिल्पा या घरची कामे उरकतात. नीशा ही सरोबा म्हात्रे विद्यालयात शाळेत जात होती. शाळा शिकत असताना ती आईला कचरा वेचण्यासाठी मदत करत होती. आईने गोळा करून आणलेल्या प्लास्टिक पिशव्या, बाटल्या, लोखंड, भंगार वेगळे करत होती. काही वेळा सुटीच्या दिवशी आईबरोबर ती कचरा गोळा करण्यासाठी घराबाहेर जात होती. पोेटासाठी घराला हातभार लावण्यास नीशाला कधी संकोच वाटला नाही. हे काम आनंदाने करत असतानाच खूप शिक्षण घेऊन तिला मोठे व्हायचे आहे. मात्र, कोणत्या कॉलेजमध्ये प्रवेश मिळणार, याविषयी नीशाच्या मनात साशंकता आहे. राहुलनगर झोपडपट्टीतील १० बाय १०च्या खोलीत दोन बहिणी व आईसह राहणाऱ्या नीशाने दहावीचा अभ्यास केला. क्लास लावण्याची ऐपत नसताना सगळा अभ्यास शाळा व घरातच केला. मराठीत १०० पैकी ९१ गुण मिळाले आहेत. तिला शिकण्यासाठी तिची आई मीना व तिचे लांबच्या नात्यातील मामा माणिक उगले हे तिला प्रोत्साहन देत आले. तिला शिक्षकांचेही मार्गदर्शन मिळाले. (प्रतिनिधी)>घराला हातभार लावण्यात पुढाकारनीशाने सगळा अभ्यास शाळा व घरातंच केला. आर्थिक परिस्थितीमुळे ‘क्साल’ लावणे शक्य नसल्याने प्रतिकूल परिस्थितून मिळवलेल्या यशामुळे तीचे कौतुक होत आहे.आईने वेचलेल्या प्लास्टिक पिशव्या, बाटल्या, भंगार ती वेगळे करत होती. काही वेळा सुटीच्या दिवशी आईबरोबर ती कचरा गोळा करण्यासाठी घराबाहेर जात होती. पोेटासाठी घराला हातभार लावण्यास नीशाला कधी संकोच वाटला नाही.