शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

चारित्र्याच्या संशयावरुन पत्नीच्या खून करणा-या पतीला जन्मठेप

By admin | Updated: August 26, 2016 21:18 IST

सासुरवाडीकडून पैसे मिळाले नसल्याच्या रागातून तसेच चारित्र्याच्या संशयावरुन पत्नीच्या डोक्यात दगड घालून खून करणा-या तिच्या पतीला अतिरिक्त जिल्हा

ऑनलाइन लोकमत
औरंगाबाद, दि. 26 - सासुरवाडीकडून पैसे मिळाले नसल्याच्या रागातून तसेच चारित्र्याच्या संशयावरुन पत्नीच्या डोक्यात दगड घालून खून करणा-या  तिच्या पतीला  अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश यु. एल. तेलगावकर यांनी जन्मठेपेची शिक्षा ठोठावली.
या प्रकरणी वन खात्याचा सुरक्षारक्षक काळू धर्मा राठोड (रा. तिसगाव, ता. औरंगाबाद) यांनी फिर्याद दिली होती. त्यानुसार, ८ जुलै २००९ रोजी चिंचोली शिवारातील सर्व्हे क्रमांक ३८ मधील जंगल परिसरात झाडे लावण्यासाठी खड्डे करताना एका ३० ते ३५ वर्षीय महिलेचा कुजलेला मृतदेह आढळून आला. याची माहिती फियार्दीने खुलताबाद पोलिसांना दिल्यानंतर प्रारंभी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. त्याच ठिकाणी करण्यात आलेल्या शवविच्छेदनाच्या अहवालात डोक्यात दगड घालून खून करण्यात आल्याचे निष्पन्न झाल्यानंतर घटनास्थळावरून अडीच किलोंचा दगड जप्त करण्यात आला आणि खुलताबाद पोलिस ठाण्यात कलम ३०२, २०१ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणाची माहिती तपास करणारे पोलिस निरीक्षक डी. एम. येरूळे यांनी सर्व पोलिस ठाण्यांना पाठवली. दरम्यान, आपली बहीण गंगासागर मच्छिंद्र सूर्यवंशी  (रा. गडदगव्हाण, ता. चिंतूर, जि. परभणी) ही बेपत्ता असल्याची तक्रार सूर्यकांता जमधडे (रा. पिंपरीलिंग, ता. सेनगाव, जि. हिंगोली) यांनी पोलिस ठाण्यात दिली होती. गावातील लोकांनी गंगासागर गायब झाल्याचे कळविल्यानंतर सूर्यकांता यांनी बहिणीच्या गडदगव्हाण येथील घरी धाव घेतली होती. मात्र बहीण आणि तिचा पती  मच्छिंद्र उकंडी सूर्यवंशी (३५) हादेखील घरी नसल्याचे लक्षात आल्यानंतर सूर्यकांता यांनी ‘मिसिंग’ची तक्रार दिली होती. आरोपी त्याच्या मामाच्या शेतात असल्याची खबर मिळाल्यानंतर, पोलिसांनी आरोपीच्या मामाला नोटीस देऊन आरोपीला हजर करण्याचे आदेश दिले. त्यानंतर आरोपी ठाण्यात हजर होऊन चौकशीदरम्यान त्याने आपल्या पत्नीचा खून केल्याची कबुली दिली. तसेच मृत गंगासागर हिचे कपडे, दागिने तिची बहिणी सूर्यकांता हिने ओळखले. या प्रकरणी सुनावणीदरम्यान, सहाय्यक सरकारी वकील बी. आर. लोया यांनी ११ साक्षीदारांचेजबाबनोंदविले यामध्ये मृताची बहीण, डॉक्टर, सोनार यांची साक्ष महत्वाची ठरली. आरोपीची कबुली तसेच सर्व परिस्थितीजन्य पुराव्यांच्या आधारे न्यायालयानेआरोपी पतीला कलम ३०२ अन्वये जन्मठेप व एक हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा ठोठावली. 
आरोपी व मृत गंगासागर यांचा विवाह १९९३ मध्ये झाला होता. त्यावेळी सासुरवाडीकडून २० हजार रुपये न मिळाल्याचा राग आरोपीच्या मनात होता. त्यावरुन आरोपीचे पत्नीच्या भावाशी भांडण झाले होते व आरोपी पत्नीला सतत त्रास देत होता. तसेच आरोपी नाशिकला कामाला गेला असता, तो पत्नीला बसस्थानकावरच सोडून परतला होता. त्यावेळी गावाकडील एकाने गंगासागर हिला पैसे देऊन माहेरी पाठवले होते. त्यानंतर गंगासागर चार वर्षे माहेरी राहात होती. मात्र आरोपीच्या भावाने समझोता घडून आणल्यानंतर व यापुढे कोणताही त्रास होणार नाही, असे आश्वासन दिल्यानंतर गंगासागरला आरोपीकडे पाठवण्यात आले होते. मात्र चारित्र्याच्या संशयावरून आरोपी पत्नीचा त्रास देत होता व दुसº्या लग्नाच्या हेतुने त्याने पत्नीचा खून केल्याचे तपासात स्पष्ट झाले.