शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

'ती' सध्या रांगेत उभी आहे - उद्धव ठाकरे

By admin | Updated: January 9, 2017 12:50 IST

गेल्या पन्नास दिवसांपासून ‘ती’ बिच्चारी रांगेतच उभी असून परिस्थितीशी झगडत आहे, अशा शब्दांत उद्धव ठाकरेंनी नोटाबंदीच्या निर्णयावर टोला हाणला आहे.

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ९ - ‘ती सध्या काय करते?’ या गमतीशीर प्रश्नावरून सध्या सर्वत्र धुमाकूळ असून त्या माध्यमातून चित्रपटाचे प्रमोशन सुरू आहे. मात्र ही कॅचलाईन हेरत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी त्या माध्यमातून नोटाबंदी, गरिबीच्या मुद्यावरून केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. ' ‘ती सध्या काय करते?’ असा प्रश्न कोणी विचारलाच तर आम्ही सरळ सांगून टाकू की, गेल्या पन्नास दिवसांपासून ‘ती’ बिच्चारी रांगेतच उभी आहे, परिस्थितीशी झगडत आहे. भविष्याच्या चिंतेने ती ग्रासली आहे' अशा रोखठोक शब्दांत उद्धव ठाकरेंनी आजच्या परिस्थितीवर भाष्य केले आहे. 'सामना'च्या अग्रलेखातून त्यांनी ही टीका केली असून देशातील महिलांची परिस्थिती, त्यांना सोसावे लागणारे हाल, त्यांचे दु:ख या सर्वांना वाचा फोडली आहे. 
 
काय म्हटले आहे अग्रलेखात ?
> 'ती' भविष्याच्या चिंतेने ग्रासली आहे. दिल्लीच्या भररस्त्यावर ती स्वतःच विवस्त्र झाली व आक्रोश केला, तर अनेक ठिकाणी ‘नोटाबंदी’च्या अत्याचाराने ती तडफडून मेली. तिला सध्या अस्वस्थ वाटतंय. तिच्यातील आई, पत्नी, बहीण, आजी ही सर्व नाती नोटाबंदीच्या रांगेत मूक आणि बधिर होऊन उभी आहेत. तिला कोणी विचारलेच की, ‘‘बाई, तू काय करतेस?’’, तर ती धाय मोकलून रडू लागते. काँग्रेजी राजवटीत जे भोगायला लागले नाही ते स्वकीयांच्या राजवटीत भोगावे लागत आहे असा दोष स्वतःच्याच नशिबाला देते. नोटाबंदीमुळे बाजारपेठ मंदावली आहे. आर्थिक विकासाचा वेग कमी झाला आहे. त्याचा फटका अनेक छोटय़ा-मोठय़ा व्यवसायांना बसला आहे. या व्यवसायांतील अनेकांना रोजगाराला मुकण्याची वेळ आली आहे. 
 
> या बेरोजगारीची टांगती तलवार डोक्यावर असलेली ‘ती’ विचारत आहे की, ‘‘माझ्या नवऱयाची, माझ्या मुलाची उद्या नोकरी जाईल. माझी चूल विझेल. त्याला कोण जबाबदार?’’ बांधावर राबणारी ‘ती’ विचारते आहे, ‘‘कालपर्यंत दुष्काळ, नापिकी, गारपीटीने शेतातील हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला. यंदा पाऊस बरा झाला. पीकपाण्याचीही कधी नव्हे ती बरकत आली. पण हाय रे दैवा, नोटाबंदीच्या निर्णयाने या बरकतीवरच कुऱहाड घातली. नोटाबंदीचा फटका बसल्याने माझ्या धन्याने काबाडकष्ट करून पिकवलेली वांगी, कांदा, बटाटा, टोमॅटो, हरभरा रस्त्यावर टाकावा लागला. या धक्क्याने माझ्या धन्याने जीवाचे काही बरेवाईट करून घेतले तर मी व माझी पोरेबाळे काय करू?’’ 
 
> देशभक्तीच्याच गोळ्या खाऊन पोट भरता येत होते मग सीमेवर इतके जवान का मारले जात आहेत? कश्मीरच्या सीमेवर शहीद झालेल्यांची ‘ती’सुद्धा दुःखातून आणि धक्क्यातून सावरायला तयार नाही. नोटाबंदीमुळे दहशतवाद कमी झाल्याच्या बातम्यांकडे ती अफवा म्हणून बघते. भिंतीवर लटकवलेल्या शहीद पती आणि पुत्राच्या तसबिरीला प्रश्न विचारीत आहे. ‘‘पाहा, नोटाबंदीमुळे सीमेवर रक्तपात थांबला आहे. नोटाबंदीमुळे उद्या अखंड कश्मीरचे स्वप्न साकार होईल. मग तू ‘नोटाबंदी’ची घोषणा होईपर्यंत का थांबला नाहीस? नोटाबंदीनंतर सीमेवर गेला असतास तर जगला असतास, कुटुंबात राहिला असतास.’’
 
> बाराबंकीतील छोटूलालची स्वर्गस्थ आई काय करत असेल? आईच्या अंत्यसंस्कारासाठी बँकेने छोटूलालला पैसे दिले नाहीत. दोन दिवस रांगेत उभे राहूनही पैसे मिळाले नाहीत. त्यामुळे घरातील गहू विकून मातेवर अंत्यसंस्कार करण्याची वेळ मुलावर आणली, म्हणून ती आई आशीर्वाद देत असेल की, तिच्या मुखातून शापवाणी बाहेर पडत असेल? प्रश्न अनेक आहेत, पण एकंदरीत काय तर ‘ती’ अस्वस्थ आहे. हतबल आहे. अगतिकतेने सारे काही पाहते आहे. परिवर्तनाची नवी पहाट आणि ‘अच्छे दिन’चा हा भरकटलेला प्रवास पाहून ती गोंधळली आहे. अध्यादेशांचा विक्रम होत असताना एखादा अध्यादेश अयोध्येतील राम मंदिरासाठी काढायला काय हरकत आहे, असेही तिला वाटते. समान नागरी कायद्याबाबतही असाच तोंड दाबून बुक्क्यांचा मार ती सहन करते आहे. ‘ती सध्या काय करते?’ या प्रश्नाचे उत्तर सिनेमाच्या पडद्यावर वेगळे आहे व प्रत्यक्ष जीवनात वेगळे आहे. ती रांगेत उभीच असल्याने तिच्याकडून वेगळे काही घडेल असे वाटत नाही. ‘चूल आणि मूल’च्या बेडय़ा तोडून ती फक्त रांगेतच उभी आहे. व्वा, यालाच म्हणतात महिलांचे सबलीकरण!