शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

'ती' सध्या रांगेत उभी आहे - उद्धव ठाकरे

By admin | Updated: January 9, 2017 12:50 IST

गेल्या पन्नास दिवसांपासून ‘ती’ बिच्चारी रांगेतच उभी असून परिस्थितीशी झगडत आहे, अशा शब्दांत उद्धव ठाकरेंनी नोटाबंदीच्या निर्णयावर टोला हाणला आहे.

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ९ - ‘ती सध्या काय करते?’ या गमतीशीर प्रश्नावरून सध्या सर्वत्र धुमाकूळ असून त्या माध्यमातून चित्रपटाचे प्रमोशन सुरू आहे. मात्र ही कॅचलाईन हेरत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी त्या माध्यमातून नोटाबंदी, गरिबीच्या मुद्यावरून केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. ' ‘ती सध्या काय करते?’ असा प्रश्न कोणी विचारलाच तर आम्ही सरळ सांगून टाकू की, गेल्या पन्नास दिवसांपासून ‘ती’ बिच्चारी रांगेतच उभी आहे, परिस्थितीशी झगडत आहे. भविष्याच्या चिंतेने ती ग्रासली आहे' अशा रोखठोक शब्दांत उद्धव ठाकरेंनी आजच्या परिस्थितीवर भाष्य केले आहे. 'सामना'च्या अग्रलेखातून त्यांनी ही टीका केली असून देशातील महिलांची परिस्थिती, त्यांना सोसावे लागणारे हाल, त्यांचे दु:ख या सर्वांना वाचा फोडली आहे. 
 
काय म्हटले आहे अग्रलेखात ?
> 'ती' भविष्याच्या चिंतेने ग्रासली आहे. दिल्लीच्या भररस्त्यावर ती स्वतःच विवस्त्र झाली व आक्रोश केला, तर अनेक ठिकाणी ‘नोटाबंदी’च्या अत्याचाराने ती तडफडून मेली. तिला सध्या अस्वस्थ वाटतंय. तिच्यातील आई, पत्नी, बहीण, आजी ही सर्व नाती नोटाबंदीच्या रांगेत मूक आणि बधिर होऊन उभी आहेत. तिला कोणी विचारलेच की, ‘‘बाई, तू काय करतेस?’’, तर ती धाय मोकलून रडू लागते. काँग्रेजी राजवटीत जे भोगायला लागले नाही ते स्वकीयांच्या राजवटीत भोगावे लागत आहे असा दोष स्वतःच्याच नशिबाला देते. नोटाबंदीमुळे बाजारपेठ मंदावली आहे. आर्थिक विकासाचा वेग कमी झाला आहे. त्याचा फटका अनेक छोटय़ा-मोठय़ा व्यवसायांना बसला आहे. या व्यवसायांतील अनेकांना रोजगाराला मुकण्याची वेळ आली आहे. 
 
> या बेरोजगारीची टांगती तलवार डोक्यावर असलेली ‘ती’ विचारत आहे की, ‘‘माझ्या नवऱयाची, माझ्या मुलाची उद्या नोकरी जाईल. माझी चूल विझेल. त्याला कोण जबाबदार?’’ बांधावर राबणारी ‘ती’ विचारते आहे, ‘‘कालपर्यंत दुष्काळ, नापिकी, गारपीटीने शेतातील हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला. यंदा पाऊस बरा झाला. पीकपाण्याचीही कधी नव्हे ती बरकत आली. पण हाय रे दैवा, नोटाबंदीच्या निर्णयाने या बरकतीवरच कुऱहाड घातली. नोटाबंदीचा फटका बसल्याने माझ्या धन्याने काबाडकष्ट करून पिकवलेली वांगी, कांदा, बटाटा, टोमॅटो, हरभरा रस्त्यावर टाकावा लागला. या धक्क्याने माझ्या धन्याने जीवाचे काही बरेवाईट करून घेतले तर मी व माझी पोरेबाळे काय करू?’’ 
 
> देशभक्तीच्याच गोळ्या खाऊन पोट भरता येत होते मग सीमेवर इतके जवान का मारले जात आहेत? कश्मीरच्या सीमेवर शहीद झालेल्यांची ‘ती’सुद्धा दुःखातून आणि धक्क्यातून सावरायला तयार नाही. नोटाबंदीमुळे दहशतवाद कमी झाल्याच्या बातम्यांकडे ती अफवा म्हणून बघते. भिंतीवर लटकवलेल्या शहीद पती आणि पुत्राच्या तसबिरीला प्रश्न विचारीत आहे. ‘‘पाहा, नोटाबंदीमुळे सीमेवर रक्तपात थांबला आहे. नोटाबंदीमुळे उद्या अखंड कश्मीरचे स्वप्न साकार होईल. मग तू ‘नोटाबंदी’ची घोषणा होईपर्यंत का थांबला नाहीस? नोटाबंदीनंतर सीमेवर गेला असतास तर जगला असतास, कुटुंबात राहिला असतास.’’
 
> बाराबंकीतील छोटूलालची स्वर्गस्थ आई काय करत असेल? आईच्या अंत्यसंस्कारासाठी बँकेने छोटूलालला पैसे दिले नाहीत. दोन दिवस रांगेत उभे राहूनही पैसे मिळाले नाहीत. त्यामुळे घरातील गहू विकून मातेवर अंत्यसंस्कार करण्याची वेळ मुलावर आणली, म्हणून ती आई आशीर्वाद देत असेल की, तिच्या मुखातून शापवाणी बाहेर पडत असेल? प्रश्न अनेक आहेत, पण एकंदरीत काय तर ‘ती’ अस्वस्थ आहे. हतबल आहे. अगतिकतेने सारे काही पाहते आहे. परिवर्तनाची नवी पहाट आणि ‘अच्छे दिन’चा हा भरकटलेला प्रवास पाहून ती गोंधळली आहे. अध्यादेशांचा विक्रम होत असताना एखादा अध्यादेश अयोध्येतील राम मंदिरासाठी काढायला काय हरकत आहे, असेही तिला वाटते. समान नागरी कायद्याबाबतही असाच तोंड दाबून बुक्क्यांचा मार ती सहन करते आहे. ‘ती सध्या काय करते?’ या प्रश्नाचे उत्तर सिनेमाच्या पडद्यावर वेगळे आहे व प्रत्यक्ष जीवनात वेगळे आहे. ती रांगेत उभीच असल्याने तिच्याकडून वेगळे काही घडेल असे वाटत नाही. ‘चूल आणि मूल’च्या बेडय़ा तोडून ती फक्त रांगेतच उभी आहे. व्वा, यालाच म्हणतात महिलांचे सबलीकरण!