शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

'ती' सध्या रांगेत उभी आहे - उद्धव ठाकरे

By admin | Updated: January 9, 2017 12:50 IST

गेल्या पन्नास दिवसांपासून ‘ती’ बिच्चारी रांगेतच उभी असून परिस्थितीशी झगडत आहे, अशा शब्दांत उद्धव ठाकरेंनी नोटाबंदीच्या निर्णयावर टोला हाणला आहे.

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ९ - ‘ती सध्या काय करते?’ या गमतीशीर प्रश्नावरून सध्या सर्वत्र धुमाकूळ असून त्या माध्यमातून चित्रपटाचे प्रमोशन सुरू आहे. मात्र ही कॅचलाईन हेरत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी त्या माध्यमातून नोटाबंदी, गरिबीच्या मुद्यावरून केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. ' ‘ती सध्या काय करते?’ असा प्रश्न कोणी विचारलाच तर आम्ही सरळ सांगून टाकू की, गेल्या पन्नास दिवसांपासून ‘ती’ बिच्चारी रांगेतच उभी आहे, परिस्थितीशी झगडत आहे. भविष्याच्या चिंतेने ती ग्रासली आहे' अशा रोखठोक शब्दांत उद्धव ठाकरेंनी आजच्या परिस्थितीवर भाष्य केले आहे. 'सामना'च्या अग्रलेखातून त्यांनी ही टीका केली असून देशातील महिलांची परिस्थिती, त्यांना सोसावे लागणारे हाल, त्यांचे दु:ख या सर्वांना वाचा फोडली आहे. 
 
काय म्हटले आहे अग्रलेखात ?
> 'ती' भविष्याच्या चिंतेने ग्रासली आहे. दिल्लीच्या भररस्त्यावर ती स्वतःच विवस्त्र झाली व आक्रोश केला, तर अनेक ठिकाणी ‘नोटाबंदी’च्या अत्याचाराने ती तडफडून मेली. तिला सध्या अस्वस्थ वाटतंय. तिच्यातील आई, पत्नी, बहीण, आजी ही सर्व नाती नोटाबंदीच्या रांगेत मूक आणि बधिर होऊन उभी आहेत. तिला कोणी विचारलेच की, ‘‘बाई, तू काय करतेस?’’, तर ती धाय मोकलून रडू लागते. काँग्रेजी राजवटीत जे भोगायला लागले नाही ते स्वकीयांच्या राजवटीत भोगावे लागत आहे असा दोष स्वतःच्याच नशिबाला देते. नोटाबंदीमुळे बाजारपेठ मंदावली आहे. आर्थिक विकासाचा वेग कमी झाला आहे. त्याचा फटका अनेक छोटय़ा-मोठय़ा व्यवसायांना बसला आहे. या व्यवसायांतील अनेकांना रोजगाराला मुकण्याची वेळ आली आहे. 
 
> या बेरोजगारीची टांगती तलवार डोक्यावर असलेली ‘ती’ विचारत आहे की, ‘‘माझ्या नवऱयाची, माझ्या मुलाची उद्या नोकरी जाईल. माझी चूल विझेल. त्याला कोण जबाबदार?’’ बांधावर राबणारी ‘ती’ विचारते आहे, ‘‘कालपर्यंत दुष्काळ, नापिकी, गारपीटीने शेतातील हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला. यंदा पाऊस बरा झाला. पीकपाण्याचीही कधी नव्हे ती बरकत आली. पण हाय रे दैवा, नोटाबंदीच्या निर्णयाने या बरकतीवरच कुऱहाड घातली. नोटाबंदीचा फटका बसल्याने माझ्या धन्याने काबाडकष्ट करून पिकवलेली वांगी, कांदा, बटाटा, टोमॅटो, हरभरा रस्त्यावर टाकावा लागला. या धक्क्याने माझ्या धन्याने जीवाचे काही बरेवाईट करून घेतले तर मी व माझी पोरेबाळे काय करू?’’ 
 
> देशभक्तीच्याच गोळ्या खाऊन पोट भरता येत होते मग सीमेवर इतके जवान का मारले जात आहेत? कश्मीरच्या सीमेवर शहीद झालेल्यांची ‘ती’सुद्धा दुःखातून आणि धक्क्यातून सावरायला तयार नाही. नोटाबंदीमुळे दहशतवाद कमी झाल्याच्या बातम्यांकडे ती अफवा म्हणून बघते. भिंतीवर लटकवलेल्या शहीद पती आणि पुत्राच्या तसबिरीला प्रश्न विचारीत आहे. ‘‘पाहा, नोटाबंदीमुळे सीमेवर रक्तपात थांबला आहे. नोटाबंदीमुळे उद्या अखंड कश्मीरचे स्वप्न साकार होईल. मग तू ‘नोटाबंदी’ची घोषणा होईपर्यंत का थांबला नाहीस? नोटाबंदीनंतर सीमेवर गेला असतास तर जगला असतास, कुटुंबात राहिला असतास.’’
 
> बाराबंकीतील छोटूलालची स्वर्गस्थ आई काय करत असेल? आईच्या अंत्यसंस्कारासाठी बँकेने छोटूलालला पैसे दिले नाहीत. दोन दिवस रांगेत उभे राहूनही पैसे मिळाले नाहीत. त्यामुळे घरातील गहू विकून मातेवर अंत्यसंस्कार करण्याची वेळ मुलावर आणली, म्हणून ती आई आशीर्वाद देत असेल की, तिच्या मुखातून शापवाणी बाहेर पडत असेल? प्रश्न अनेक आहेत, पण एकंदरीत काय तर ‘ती’ अस्वस्थ आहे. हतबल आहे. अगतिकतेने सारे काही पाहते आहे. परिवर्तनाची नवी पहाट आणि ‘अच्छे दिन’चा हा भरकटलेला प्रवास पाहून ती गोंधळली आहे. अध्यादेशांचा विक्रम होत असताना एखादा अध्यादेश अयोध्येतील राम मंदिरासाठी काढायला काय हरकत आहे, असेही तिला वाटते. समान नागरी कायद्याबाबतही असाच तोंड दाबून बुक्क्यांचा मार ती सहन करते आहे. ‘ती सध्या काय करते?’ या प्रश्नाचे उत्तर सिनेमाच्या पडद्यावर वेगळे आहे व प्रत्यक्ष जीवनात वेगळे आहे. ती रांगेत उभीच असल्याने तिच्याकडून वेगळे काही घडेल असे वाटत नाही. ‘चूल आणि मूल’च्या बेडय़ा तोडून ती फक्त रांगेतच उभी आहे. व्वा, यालाच म्हणतात महिलांचे सबलीकरण!