शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई सेंट्रल स्टेशनचे नाव बदलले जाणार, नवे नाव काय असणार? CM देवेंद्र फडणवीस म्हणाले...
2
हरयाणा,गोव्यासह लडाखला मिळाले नवे राज्यपाल; घोष, गुप्ता आणि गजपती राजू यांची राष्ट्रपतींकडून नियुक्ती
3
IND vs ENG : गौतम गंभीरने Live सामन्यात दिली शिवी; अपशब्द उच्चारतानाचा Video झाला व्हायरल
4
ठाकरे गटाला पुन्हा कोकणात मोठा धक्का; बडे पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा रामराम, भाजपात प्रवेश
5
भाचाच्या प्रेमात वेडी झालेली बायको पळाली, घरी आणण्यासाठी गेलेल्या नवऱ्याचा हार्ट अटॅकने मृत्यू
6
भारताच्या शेअर बाजारात घसरण, पण पाकिस्तानच्या स्टॉक मार्केटमध्ये तुफान तेजी; १,३५,००० अंकांच्या पार, कारण काय?
7
"पहाटे ४ वाजता उठतो, रात्री ८ ला झोपतो", लेकाची शिस्त पाहून आर माधवनही होतो दंग; म्हणाला...
8
IND vs ENG :दुखापतग्रस्त पंत 'डिफेन्स' करताना फसला! जोफ्रा आर्चरची 'वेदनादायी' गोलंदाजी
9
Viral Video: चक्क माणसासारखं दोन पायावर उभा राहिला बिबट्या; स्वत: बघितल्याशिवाय विश्वास बसणार नाही!
10
"राज ठाकरे मराठीच्या नावावर द्वेष पसरवतात, त्यांच्यावर रासुका लावा’’, मुंबई हायकोर्टातील वकिलांची मागणी  
11
DSP सिराजला इंग्लिश बॅटर बेन डकेटशी पंगा घेणं पडलं महागात! ICC नं फाडलं 'चलान'
12
मुंबई-पुण्यात घरं घेणाऱ्यांसाठी गुडन्यूज! मालमत्ता विक्रीत ३०% घट; 'या' कारणामुळे किमती खाली येणार!
13
भयंकर! कर्ज फेडण्यासाठी, विम्याचे २ कोटी हडपण्यासाठी मित्राची केली हत्या, जिवंत जाळलं अन्...
14
अनिल अग्रवाल याच्या वेदांतानं भाजपला चार पट जास्त देणगी दिली, काँग्रेसच्या देणगीत मोठी घट, रिपोर्टमधून खुलासा
15
एकनाथ शिंदेंना ‘संजय’ लाभदायक नाही? विरोधकांनी कोंडी केली; पक्षाची डोकेदुखी वाढली!
16
Karka Sankranti 2025 : कर्क संक्रांतीला 'या' पाच राशींच्या आयुष्यात होईल मोठे संक्रमण; येतील अच्छे दिन!
17
“एसटीचे कदापि खाजगीकरण होऊ देणार नाही”; परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांनी स्पष्टच सांगितले
18
आधी कोट्यवधी रुपयांचे घर पाडले, आता प्रशासन छांगूर बाबाकडून पाडण्याचा खर्च ८ लाख ५५ हजार रुपये वसूल करणार
19
Ahilyanagar: पोलिसांना बघून धरणात मारल्या उड्या, एका चोराचा बुडून मृत्यू, तर दुसरा...
20
Astro Tips: बायपाससारख्या मोठ्या शस्त्रक्रीया होण्यामागे कारणीभूत असते 'ही' ग्रहस्थिती!

‘ती’ बनली शेकडो अनाथांची माय

By admin | Updated: May 8, 2016 03:39 IST

संसारात रमण्याच्या वयात विमलातार्इंनी अनाथालयाची जबाबदारी खांद्यावर घेतली आणि विमलाताई आज शेकडो निराधार मुलांच्या माय बनून राहिल्या आहेत.

- मंगेश व्यवहारे,  नागपूर 

संसारात रमण्याच्या वयात विमलातार्इंनी अनाथालयाची जबाबदारी खांद्यावर घेतली आणि विमलाताई आज शेकडो निराधार मुलांच्या माय बनून राहिल्या आहेत. विमलताई आळे यांंनी विड्या वळून दहावीपर्यंतचे शिक्षण कसेबसे पूर्ण केले. बाबासाहेबांच्या विचारांचा त्यांच्यावर पगडा होता. दहावीनंतर त्यांना शिक्षक म्हणून ५० रुपये मासिक वेतनावर नोकरी लागली. नोकरी व ग्रामीण भागात समाजकार्य सुरू असताना, डॉ. भदंत आनंद कौशल्यायन यांनी त्यांच्या कामाचे कौतुक केले. कौशल्यायन यांनी अनाथ मुलांसाठी निराश्रित गृह सुरू केले होते. परंतु त्यांच्याकडे गृहमाता नव्हती. त्यांनी विमलताईंना अनाथांची आई होशील का?, अशी विचारणा केली. तरुण वयात विमलताईंनी ही जबाबदारी स्वीकारली. उत्तर नागपुरातील जयभीम चौकात हे अनाथालय होते. विमलताईंवर सुरुवातीला पाच मुलांची जबाबदारी होती. अनाथालयाला उत्पनाचे साधन नव्हते, सुविधाही नव्हत्या. विमलताई कामठीतील शाळेत नोकरी करून अनाथालय सांभाळायच्या. मुलांची संख्या वाढत असताना पोटाला चिमटा काढून त्या अनाथ मुलांची भूक भागवू लागल्या. या वेळी काशीनाथ मेश्राम त्यांच्या मदतीला धावून आले. विमलताई व मेश्राम यांनी वर्गणी गोळा करून, पुस्तके विकून अनाथालयाचा गाडा चालविला. तीन वर्षानंतर अनाथालयाला ग्रॅण्ट मिळू लागली. विमलाताईंनी नोकरी सोडली. अनाथालयाचे ‘राहुल बालसदन’ असे नामकरण केले. अडचणींवर मात करून विमलातार्इंनी बालसदन नावारुपाला आणले आहे. बालसदनमधील १४ मुलींची त्यांनी लग्न करून दिली. आतापर्यंत २५० वर मुलामुलींचे संगोपन केले आहे. सध्या त्यांच्याकडे ३० मुले आहेत. मी जर संसारात रमले असते, तर एक दोन मुलांचाच सांभाळ करू शकले असता. सध्या २५० वर मुलांना सांभाळून त्यांना स्वत:च्या पायावर उभे करून, सक्षम करू शकले, याचे फार मोठे समाधान मला आहे. - विमलताई आळे, संचालक, राहुल बालसदन