शहरं
Join us  
Trending Stories
1
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
2
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
3
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
4
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
5
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
6
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
7
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
8
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
9
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
10
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
11
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
12
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
13
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
14
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
15
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
16
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
17
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
18
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
19
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
20
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन

सुधींद्र कुलकर्णींवरील शाईफेक ही सौम्य प्रतिक्रिया - शिवसेना

By admin | Updated: October 12, 2015 12:47 IST

सुधींद्र कुलकर्णींवरील शाई हल्ला ही सौम्य प्रतिक्रिया असून ही शाई नसून भारतीय जवानांचे रक्त आहे असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. १२ - सुधींद्र कुलकर्णींवरील शाई हल्ला ही सौम्य प्रतिक्रिया असून ही शाई नसून भारतीय जवानांचे रक्त आहे असे सांगत सेना नेते संजय राऊत यांनी या हल्ल्याचे समर्थन केले आहे.

पाकिस्तानचे माजी परराष्ट्रमंत्री खुर्शीद कसुरी यांच्या पुस्तक प्रकाशन सोहळ्याचे मुंबईत आयोजन करणारे सुधींद्र कुलकर्णी यांच्यावर शाई फेकण्यात आली होती. यामागे शिवसेनेचा हात असल्याचा आरोप कुलकर्णींनी केला होता. यासंदर्भात संजय राऊत म्हणाले, सुधींद्र कुलकर्णींना डांबर फासलं की शाई फेकली हे मला माहित नाही. शिवसेनेसोबत सर्वसामान्यांमध्येही पाकिस्तानविरोधात संताप आहे. आमच्या जवानांचे व निरपराध नागरिकांचे रक्त बघून तुमचे रक्त खवळत नाही, पण शाई बघून तुम्ही चिडता असा टोलाही त्यांनी कुलकर्णी यांना लगावला. हे सर्व जण पाकचे चमचे आहेत असेही त्यांनी म्हटले आहे. जोपर्यंत पाकिस्तान काश्मीरमध्ये अस्थितरता निर्माण करुन जवानांची हत्या घडवून आणेल तोपर्यंत आमचा पाकविरोध कायम राहिल असेही त्यांनी म्हटले आहे.