शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

मध्यस्थीसाठी शत्रुघ्न सिन्हांचे प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2015 02:50 IST

ज्येष्ठ अभिनेते आणि भारतीय जनता पक्षाचे नेते शत्रुघ्न सिन्हा यांनी एफटीआयआयला (फिल्म अ‍ॅँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट) भेट देऊन तोडगा काढण्याचे आश्वासन दिले.

पुणे : ज्येष्ठ अभिनेते आणि भारतीय जनता पक्षाचे नेते शत्रुघ्न सिन्हा यांनी एफटीआयआयला (फिल्म अ‍ॅँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट) भेट देऊन तोडगा काढण्याचे आश्वासन दिले. मंगळवारी रात्री उशिरा संस्थेमध्ये येऊन त्यांनी संचालक डी. जे. नारायण यांच्याशी चर्चा केली. विद्यार्थ्यांशी मात्र संवाद साधला नाही. संस्थेचा माजी विद्यार्थी या नात्याने आपण संपाबाबत तोडगा काढण्यासाठी प्रयत्नशील आहोत, त्यासाठी मध्यस्थीचीही तयारी असल्याचे त्यांनी सांगितले. माहिती व प्रसारण मंत्रालयाबरोबरची चर्चा फिस्कटल्याने २५ दिवसांपासून विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू आहे. या पार्श्वभूमीवर एफटीआयआयचे माजी विद्यार्थी या नात्याने सिन्हा यांनी एफटीआयआयचे संचालक नारायण यांच्याशी विविध मुद्द्यांवर सविस्तर चर्चा केल्याचे समजते.सिन्हा म्हणाले, ‘‘मी भाजप सरकार किंवा येथील विद्यार्थी दोन्हींची बाजू मांडायला आलेलो नाही. माजी विद्यार्थी या नात्याने मी येथे आलो आहे. इतक्या दिवसांच्या आंदोलनाचा मुलांच्या अभ्यासावर परिणाम होत आहे. मी त्यांच्या मागण्या समजतो. पण मी विद्यमान सरकारचा भाग आहे. त्यामुळे या दोन्हींमध्ये मध्यस्थी करण्याचा माजी विद्यार्थी म्हणून प्रयत्न करणार आहे. त्यामुळे मी नारायण यांना भेटून काही मध्यम मार्ग निघतो का यावर चर्चा केली. काही दिवसांत मी स्वत: मंत्रालयस्तरावर भेटून तोडगा काढण्याचा प्रयत्न करणार आहे.’’आश्वासनापलीकडे काही नाही४चित्रपट क्षेत्रातील अनेक जण भारतीय जनता पक्षाचे नेते आहेत. यामध्ये शत्रुघ्न सिन्हा, हेमामालिनी यांचा समावेश आहे. या कलाकार मंडळींकडून विद्यार्थ्यांना खूप आशा आहेत; मात्र सत्ताधारी पक्षाचा भाग असल्यामुळे त्यांचे हात दगडाखाली आहेत. त्यामुळे केवळ आश्वासन देण्यापलीकडे ते काहीच करू शकत नाही. त्यामुळेच शत्रुघ्न सिन्हा यांनी विद्यार्थ्यांची भेट न घेता संचालकांशीच थेट संवाद साधणे हिताचे मानले. म्हणूनच खासदार म्हणून नव्हे, तर एफटीआयआयचा माजी विद्यार्थी या नात्याने आलो असल्याचे त्यांनी वारंवार स्पष्ट केले. राजीनामा द्यायचा प्रश्नच उद्भवत नाही : अनघा घैसास पुणे : हो, मी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे काम करीत होते; पण पूर्ण वेळ कार्यकर्ती नव्हते, अशी कबुली देत आम्ही विद्यार्थ्यांच्या भल्याचाच विचार करू. फक्त विद्यार्थ्यांनी आमच्यावर विश्वास ठेवावा. आमच्यावर अनेक आरोप झाले, तरीही आम्ही त्यांच्याशी चर्चा करण्यास तयार आहोत; पण त्यांनाच बोलायचे नाही. इतर सदस्यांनी राजीनामे का दिले माहीत नाही; पण मी राजीनामा द्यायचा प्रश्नच उद्भवत नाही, असे एफटीआयआयच्या (फिल्म अ‍ॅँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट) नियामक मंडळाच्या सदस्या अनघा घैसास यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. ‘व्हिजन’ नसलेल्या व्यक्तींची नियामक मंडळाच्या अध्यक्षपदासह सदस्यपदी नियुक्ती करून संस्थेचे ‘भगवीकरण’ करण्याचा घाट शासनस्तरावर घातला जात आहे. त्यामुळे गेल्या २५ दिवसांपासून वर्ग बंद करून विद्यार्थ्यांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयातर्फे विद्यार्थ्यांच्या या मागणीची दखल न घेता उलट संस्थेचे खासगीकरण आणि स्थलांतर करण्याच्या धमक्या देऊन त्यांचीच मुस्कटदाबी करण्याचा प्रयत्न केला जात आहे. हे चिघळत चाललेले आंदोलन पाहता विद्यार्थीच जर नाखूष असतील तर पदावर राहण्यात काय अर्थ आहे, या भावनेने मंडळातील पल्लवी जोशी, जॉन बरूआ या सदस्यांनी राजीनामे देणे पसंत केले आहे. मात्र, अनघा घैसास यांनी राजीनामा देण्याचा प्रश्नच नसल्याचे सांगत नकार दर्शविला आहे. घैसास म्हणाल्या, ‘‘विद्यार्थ्यांना आमची नियुक्ती चुकीची का वाटत आहे. शॉर्टफिल्मसह चित्रपट क्षेत्रामध्ये आमचे योगदान आहे. ‘अयोध्या राम मंदिर’, ‘नॉर्थ ईस्ट’ यावर मी लघुपट केले आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मी काम करीत होते, हे मान्य आहे; पण म्हणून आमची नियुक्ती करण्यात आली आहे, हा पूर्णत: चुकीचा समज आहे. हे पद सन्माननीय आहे, चांगले काम करण्याची आमची इच्छा आहे. आंदोलनामुळे विद्यार्थ्यांचेच नुकसान होत आहे. त्यांच्या आंदोलनाला दिशा मिळत नसल्याने तेच ‘कन्फ्यूज’ आहेत. त्यांना नक्की काय हवे आहे तेच कळत नाही.’’