शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! शरद पवारांनी भाकरी फिरवली! जयंत पाटलांचा राजीनामा; या नेत्याकडे सोपवणार सूत्रे
2
१२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश; शरद पवारांनी मानले मोदी सरकारचे आभार
3
छत्तीसगडच्या सुकमामध्ये २३ नक्षलवाद्यांनी एकत्र आत्मसमर्पण केले, त्यांच्यावर १.१८ कोटी रुपयांचे होते बक्षीस
4
GST Meeting: मध्यमवर्गीयांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता; एसीपासून टुथपेस्टपर्यंत होऊ शकतात स्वस्त
5
लग्नाच्या रात्रीच नवरी करणार होती कांड, पण नवरदेव निघाला भलताच हुशार! मित्रांना घरी बोलावलं अन्... 
6
दोन वर १ शेअर मिळणार फ्री, 'ही' कंपनी ग्रहकांना देणार भेट; याच महिन्यात जमा होणार, तुमच्याकडे आहे का?
7
Air India Plane Crash : इंजिन थांबले, पण प्रयत्न सुरूच होते...; दोन्ही वैमानिकांनी शेवटच्या क्षणापर्यंत झुंज दिली
8
West Bengal Accident: जगन्नाथाच्या दर्शनासाठी जाताना भाविकांवर काळाचा घाला, वाटेतच ट्रकला धडक, कारमधील ४ जण ठार!
9
“१२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश झाल्याचा आनंद, अभिमान”: DCM अजित पवार
10
UNESCO 12 Forts: "जेव्हा आपण गौरवशाली मराठा साम्राज्याबद्दल बोलतो, तेव्हा..."; PM मोदींनी व्यक्त केला आनंद
11
काँग्रेसला धक्का! धंगेकर, थोपटेनंतर काँग्रेसचा आणखी एक माजी आमदार भाजपमध्ये करणार प्रवेश
12
Ahmedabad Plane Crash : विमानात नेमका कुठे असतो 'फ्यूअल स्विच'? कोण करू शकतं याला चालू-बंद?
13
जनसुरक्षा विधेयकाला उद्धवसेनेचा विरोध; भाजपाची टीका, नेते म्हणाले, “महाविकास आघाडी...”
14
राज ठाकरे मुख्यमंत्री झाले तर महाराष्ट्र कसा असेल?, तेजस्विनी पंडितने दिली प्रतिक्रिया
15
“एसटीने घडविले ९ लाख ७१ हजार भाविक-प्रवाशांना विठ्ठल दर्शन”; प्रताप सरनाईकांची माहिती
16
१२ किल्ल्यांचा युनेस्को यादीत समावेश, राज ठाकरे म्हणाले, "ही अतिशय आनंदाची बाब, त्यासोबतच..."
17
ना कोणता साईड बिझनेस, ना जास्त पगार.., ४५ व्या वर्षी रिटायरमेंट आणि ४.७ कोटींची नेटवर्थ, कसं झालं हे शक्य?
18
Viral Video: भाजप नेत्याला एका महिलेसोबत कारमध्ये नको त्या अवस्थेत पाहिलं, व्हिडीओ व्हायरल!
19
नेपाळ मार्गे भारताला हादरवण्याचा प्लॅन, जैश अन् लष्करची मोठी योजना उघड
20
छत्रपती संभाजीनगर: समृद्धी महामार्गावरील टोल नाक्यावर गोळीबार, कर्मचाऱ्याच्या पोटात लागली गोळी

‘शरीफ’ भेट दुदैवी

By admin | Updated: July 11, 2015 01:54 IST

पाकिस्तानला चांगला धडा शिकविणे गरजेचे असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांची भेट घेणे दुर्दैवी आहे, अशी टीका शिवसेनेचे

मुंबई : पाकिस्तानला चांगला धडा शिकविणे गरजेचे असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांची भेट घेणे दुर्दैवी आहे, अशी टीका शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी केली. ते पत्रकारांशी बोलत होते. शरीफ यांच्याबरोबरच्या भेटीत मोदींनी मुत्सद्देगिरीचे दर्शन घडविल्याचे कौतुक भाजपाने सुरू केलेले असताना मित्र पक्ष शिवसेनेने मात्र आजच्या भेटीबाबत नाराजी व्यक्त केली. ठाकरे म्हणाले की, भारत-पाकिस्तान संबंध अद्याप सुधारलेले नाहीत. सीमेवरील पाकिस्तानच्या कारवाया बघता आपल्या सरकारने धडा घेतला की नाही माहिती नाही, पण पाकिस्तानला चांगला धडा शिकविणे आवश्यक आहे. काश्मीरबाबत पाकिस्तानशी चर्चा कशाला, असा सवाल करून उद्धव म्हणाले की, काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग आहे आणि पाकव्याप्त काश्मीरवरील हक्क केंद्राने कुुठल्याही परिस्थितीत सोडता कामा नये. चर्चेतून काहीही निष्पन्न होणार नाही. म्यानमारमध्ये जाऊन केली तशी कारवाई केली पाहिजे. पाकिस्तानला उत्तर देण्याची क्षमता पंतप्रधान मोदी यांच्याकडे आहे आणि भारतीय जनतेचा त्यांच्यावर विश्वास आहे, अशी पुस्तीही त्यांनी जोडली. एसटी महामंडळात ५० आदिवासी युवकांना चालक म्हणून सामावून घेण्यात आले. ‘मातोश्री’वर शुक्रवारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते या युवकांना नियुक्तीपत्रे देण्यात आली. या वेळी परिवहनमंत्री दिवाकर रावते आणि खासदार संजय राऊत आदी.युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी मुंबईच्या नाइट लाइफचे समर्थन केले असतानाच भाजपाने नाइट बाजारचे पिल्लू सोडले आहे. याबाबत विचारले असता उद्धव म्हणाले की, त्यांना ही कल्पना कोणी दिली ते विचारा. युवा सेनेने सर्वप्रथम नाइट लाइफची कल्पना मांडली. कारण मुंबई कधीही झोपत नाही. जे रात्रपाळीत काम करतात त्यांच्यासाठी नाइट लाइफची योजना होती. ती न स्वीकारता रात्रबाजार योजना कशी स्वीकारता येईल, असा सवालही त्यांनी केला.अमित शहांना टोला : भविष्यात एकहाती सत्ता येईल, यासाठी मेहनत करण्याचे आवाहन भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी गुरुवारी पदाधिकाऱ्यांना केले होते. याबाबत विचारले असता उद्धव उपरोधिकपणे म्हणाले की, मी ते वर्तमानपत्रात वाचले. त्यांना वसुंधराराजे, शिवराजसिंह चौहान यांच्यासारखे एकहाती सत्ता आणणारे मुख्यमंत्री हवे आहेत का?(विशेष प्रतिनिधी)