शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूरवेळी पाकिस्तानचा प्रत्येक वार ज्यानं हाणून पाडला, आता ते शस्त्र खरेदीसाठी हा मोठा देशही आतूरलेला, करणार 'बिग डील'!
2
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
3
रेल्वे प्रवाशांना झटका! उद्यापासून ट्रेन प्रवास महागणार; तिकिटांचे दर किती वाढणार? एका क्लिकवर जाणून घ्या
4
कोल्हापुरातील वराच्या फिर्यादीवरून जळगावची वधू व मध्यस्थांविरुद्ध गुन्हा दाखल
5
प्रेयसी मुलासोबत लाॅजमधून बाहेर येताना दिसली, प्रियकराने संपवले जीवन
6
आनंदाची बातमी! सुकन्या, PPF सह अल्प बचत योजनांसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय; पटा-पट चेक करा लेटेस्ट व्याज दर!
7
कुटुंबियांना फोन करून आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांच्या तत्परतेमुळे वाचला व्यावसायिकाचा जीव
8
तीन पिढ्या काँग्रेसमध्ये, ७० वर्षांनी सोडणार पक्षाची साथ; कुणाल पाटील करणार भाजपात प्रवेश
9
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
10
इराणच्या मनात धडकी; इंटरनेट वापरावरही आणली बंदी, न ऐकणाऱ्याला चाबकाचे फटके अन्... 
11
ENG vs IND : टीम इंडियाविरुद्ध खेळलेला डाव फसला! इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनमधून हा गोलंदाज 'गायब'
12
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
13
सोनम रघुवंशीचं दुसरं लग्नही झालेलं?  तपासादरम्यान सापडलेल्या दुसऱ्या मंगळसूत्रानं गूढ वाढवलं!
14
ENG vs IND : कॅप्टन आयुष म्हात्रेवर 'गोल्डन डक'ची नामुष्की; वैभव सूर्यंवशी टिकला, पण...
15
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
16
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच उद्धवसेना-मनसेला खिंडार; अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील
17
५० वर्षांची महिला मुलाच्या वर्गमित्राच्याच प्रेमात पडली, संसार थाटला अन् आता...! अशी सुरू झाली "Love story"
18
“हिंदीचा निर्णय RSSचा अजेंडा राबवायची जनमतचाचणी, भारताची विविधतेतील एकता संपवायचा प्रयत्न”
19
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी
20
कोलकाता बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी निघाला ‘हिस्ट्रीशीटर’; मोनोजितवर आधीच दाखल आहेत मोठे गुन्हे!

मुख्यमंत्र्यांविरोधात शरद राव आक्रमक

By admin | Updated: June 14, 2014 04:46 IST

फेरीवाला, महानगरपालिका आणि रिक्षा चालक-मालक संघटनांचे नेतृत्व करणाऱ्या शरद राव यांनी मुख्यमंत्र्यांविरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे

मुंबई : फेरीवाला, महानगरपालिका आणि रिक्षा चालक-मालक संघटनांचे नेतृत्व करणाऱ्या शरद राव यांनी मुख्यमंत्र्यांविरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे. शुक्रवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत रिक्षा चालक-मालक, फेरीवाले आणि महापालिका कर्मचाऱ्यांच्या आंदोलनांची घोषणा करत राव यांनी मुख्यमंत्र्यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला.राज्य सरकारने नेमलेल्या हकिम समितीच्या अहवालानुसार, रिक्षा चालकांना पहिल्या टप्प्यासाठी किमान भाडे म्हणून १८ रुपये देण्याची मागणी राव यांनी केली आहे. आॅटोरिक्षा धंद्याच्या विविध घटकांच्या किमतीत झालेली वाढ आणि घट याचा आढावा या समितीने घेतला होता. त्यानुसार पायाभूत भाडे ठरवून भाडेसारिणी तयार करण्याची शिफारस या अहवालात करण्यात आली आहे. १ मे २०१३ रोजी या सूत्रानुसार रिक्षाचालकांना ४६ पैशांची भाडेवाढ देण्याची गरज होती मात्र ती मिळाली नाही. त्यामुळे १५ लाख रिक्षाचालक आणि मालकांचे कोट्यवधींचे नुकसान झाल्याचे राव यांनी सांगितले. ते म्हणाले, ‘१ मे २०१४पासूनचे किमान भाडे ठरविण्याबाबत कोणत्याही न्यायालयाने स्थगिती दिलेली नाही. तरीही मुख्यमंत्री उदासीन असल्याने रिक्षा चालकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. २० जूननंतर रिक्षाचालकांचे आंदोलन२० जूनपर्यंत शासनाने भाडेवाढ दिली नाही, तर एकाच दिवशी राज्यातील १५ लाख रिक्षाचालक आणि मालक त्या-त्या जिल्ह्यातील वाहतूक आयुक्तांच्या कार्यालयाबाहेर आंदोलन करतील. नेमके कोणत्या दिवशी आंदोलन करणार, याबाबत राव यांनी सांगितले नाही....तर पालिकाही बंद करणारसध्या मुंबई वगळता इतर महापालिकांत लावलेल्या एलबीटीमुळे १६ हजार ५०० कोटी रुपयांचा महसूल मिळत आहे. मात्र एलबीटी रद्द करून व्हॅटवर अतिरिक्त भार लावल्यास केवळ ७६० कोटींचा महसूल मिळणार आहे. त्यामुळे ज्या दिवशी शासन एलबीटी रद्द करेल किंवा एलबीटीच्या धोरणात बदल करेल, त्या रात्रीपासून सर्व महापालिका कामबंद आंदोलन करू,’ असा इशारा राव यांनी दिला आहे. (प्रतिनिधी)