शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
2
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
3
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
4
पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
5
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
6
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
7
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
8
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
9
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
10
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्स ३४० अकांनी तर निफ्टी ११५ अंकांनी वधारला; IT Stocks सुस्साट
11
देशभक्तीला बॉक्स ऑफिसवरील यशाचा फॉर्म्युला समजणं हा अपमान..., विकी कौशलची स्पष्ट प्रतिक्रिया
12
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
13
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
14
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
15
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
16
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
17
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
18
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
19
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
20
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात परतण्यास शरद पवारांचा नकार

By admin | Updated: June 9, 2014 02:31 IST

मी दिल्लीतच बरा आहे, नको त्या चर्चा करण्याची गरज नाही,’ अशा स्पष्ट शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्रिपदाच्या चर्चेला पूर्णविराम दिला.

मुंबई : ‘मी दिल्लीतच बरा आहे, नको त्या चर्चा करण्याची गरज नाही,’ अशा स्पष्ट शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्रिपदाच्या चर्चेला पूर्णविराम दिला. पण त्याचवेळी सामूहिक नेतृत्वात विधानसभा निवडणूक लढविली जाईल, असे सांगत मुख्यमंत्रिपदाची आस बाळगून असलेले अजित पवार यांच्या मनसुब्यांना मात्र धक्का दिला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या १५व्या वर्धापन दिनानिमित्त षण्मुखानंद सभागृहात आयोजित सोहळ्यात पवार बोलत होते. लोकसभा निवडणुकीतील दारुण पराभव, विधानसभा निवडणुकीआधी नेतृत्व जाहीर करण्याची अजित पवार यांनी केलेली मागणी आणि शरद पवार यांना मुख्यमंत्री पदाचा उमेदवार म्हणून घोषित करण्याची पुढे आलेली मागणी, या सर्व घडामोडींमुळे या कार्यक्रमाकडे सर्वांचे लक्ष लागून होते. अर्ध्या तासाच्या भाषणात पवार यांनी राष्ट्रवादीच्या मंत्री आणि नेत्यांचा चांगलाच समाचार घेतला. १५ वर्षे सत्तेत राहिल्यामुळे नेता व कार्यकर्ता यांच्यातील दरी अधिक वाढली आहे. आपल्या विभागात विकासकामे केल्याची आकडेवारी नेते मांडतात. पण, केवळ विकासकामे करून भागत नाही. त्याला माणुसकीचा चेहराही हवा असतो. त्यामुळे जनतेशी सुसंवाद ठेवत विकासकामे करा, अशा कानपिचक्या पवारांनी दिल्या. ज्या कार्यकर्त्यांच्या जिवावर पक्ष उभा आहे, त्यांचा सन्मान ठेवा. कार्यकर्त्याने हात दाखवला तर गाडी थांबवा, काच खाली करून त्यांच्याशी बोला. त्यांना सन्मान दिला नाही, तर ते जागा दाखवतात, असेही पवार म्हणाले. (प्रतिनिधी)