शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! रायगडच्या समुद्रात मासेमारी बोट बुडाली, बचाव कार्य सुरू; व्हिडीओ व्हायरल
2
जीएसटी कपातीनंतरही कारवर जादा कर लागू शकतो...; सीएने केले विश्लेषण...
3
रशियाची सर्वात शक्तिशाली युद्धनौका S-400 बटालियनसह समुद्रात दाखल, पुतिन काय करतायत..?
4
BEST Election Results 2025: उद्धवसेना-मनसे युतीचा २१-० ने पराभव; राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया आली
5
दोन वर्षाच्या मुलीसह अख्ख कुटुंब मृतावस्थेत आढळल्याने खळबळ; ५ जणांसोबत नेमकं काय घडलं? 
6
अभिनेत्रीला अश्लील मेसेज करणारा तो युवा नेता कोण? समोर आली धक्कादायक माहिती, राष्ट्रीय पक्षाशी संबंध 
7
4 वर्षांत तीन वेळा प्रेग्नंट, तुरुंगवासाची शिक्षा टाळण्यासाठी महिलेने भलताच मार्ग अवलंबला...! जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
8
Mumbai Crime: 'तुझ्या अंगात भूत आहे', पुजेला बोलावलं आणि ३२ वर्षीय महिलेवर मांत्रिकाने केला बलात्कार
9
श्रावण अमावस्येला पिठोरी अमावस्या का म्हणतात? त्याच दिवशी असतो पोळा आणि मातृदिन
10
राज ठाकरे शिवतीर्थावर परतताच CM देवेंद्र फडणवीसांनी केला उद्धव ठाकरेंना फोन; नेमके कारण काय?
11
रामललांच्या भक्तांना दिवाळीपूर्वीच मिळणार खास गिफ्ट! राम मंदिर ट्रस्ट देणार विशेष भेट, जाणून घ्या सविस्तर
12
ऑनलाइन गेमिंग विधेयकावरुन अनुपम मित्तल यांची सरकारवर टीका; म्हणाले 'या निर्णयामुळे थेट...'
13
UPI वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! १ ऑक्टोबरपासून 'हे' महत्त्वाचे फीचर कायमस्वरूपी बंद होणार
14
श्रावण शनि अमावास्या: शनिदोष, प्रतिकूल प्रभाव कसा ओळखावा? ‘हे’ ५ उपाय तारतील, कृपा होईल!
15
हा पी अर्जुन तेंडुलकर कोण? तुफानी खेळीत १२ चेंडूत ३ चौकार, ३ षटकार ठोकले; मुंबई इंडियन्सच्या नजरेत भरला?...
16
रोज इथे माणसं आदळत आहेत, झोपड्या वाढताहेत, 'अर्बन नक्षल'पेक्षा...; राज ठाकरेंचं 'मिशन मुंबई'
17
विद्यार्थ्याच्या हत्येवरून अहमदाबाद तापले, रस्त्यावर उतरले हजारो लोक, पोलीस आणि NSUI मध्ये वादावादी
18
युद्ध थांबण्याचे नाव नाही! रशियाचा युक्रेनवर आतापर्यंतचा सर्वात मोठा हल्ला; एकाच वेळी डागली ४० क्षेपणास्त्र
19
छत गळतेय, उंदीर फिरतात आणि वीज नसते; इमरान खान यांच्या पत्नी बुशरा बीबींची तुरुंगात दयनीय अवस्था
20
Viral Video: लोणावळ्यात मद्यधुंद महिलांमध्ये फ्री-स्टाईलमध्ये हाणामारी; पोलीस आल्यानंतरही थांबल्या नाहीत!

चंद्रपूरसारखी यवतमाळमध्ये दारुबंदीची शरद पवार यांची मागणी

By admin | Updated: September 27, 2015 05:38 IST

वर्धा, चंद्रपूर जिल्ह्याच्या धर्तीवर आत्महत्याग्रस्त यवतमाळ जिल्ह्यामध्ये संपूर्ण दारुबंदी करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार

मुंबई : वर्धा, चंद्रपूर जिल्ह्याच्या धर्तीवर आत्महत्याग्रस्त यवतमाळ जिल्ह्यामध्ये संपूर्ण दारुबंदी करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी शनिवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून केली आहे. पवार यांनी अलिकडेच विदर्भातील आत्महत्याग्रस्त भागाच्या दौऱ्यात शेतकऱ्यांशी संवाद साधला होता. मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात त्यांनी पवार यांनी म्हटले आहे, नापिकी, कर्जबाजारीपणा आणि शेतमालास योग्य बाजारभावाचा अभाव यांच्या दुष्टचक्रातून सुटका न होणे ही आत्महत्येची प्रमुख कारणे आहेत. वैफल्यग्रस्त शेतकरी व्यसनाधीनतेकडे झुकून मृत्यूला कवटाळण्याचे प्रकार होत असल्याचे आत्महत्याग्रस्त गावांतील महिलांनी आपल्याला सांगितले. गावातून दारू हद्दपार करण्यासाठी त्या गावातील ५० टक्के महिला मतदारांनी दारुबंदीसाठी मतदान करणे अनिवार्य असते. मतांची ही टक्केवारीची अट नापिकी आणि आत्महत्याग्रस्त भागात सरकारने कमी करावी. तसेच, यवतमाळ जिल्ह्यात दारुबंदीचा विचार करावा. नापिकी आहे आणि शेतकरी कर्जाच्या ओझ्याखाली दबला आहे त्या भागात सरकारने कर्जमाफी करावी. संपुआ सरकारच्या काळात देशातील शेतकऱ्यांची ७१ हजार कोटी रुपयांची कर्जे माफ करण्यात आली होती. शेतकऱ्यांनी कापसाला प्रतिक्विंटल ६५०० रुपये आणि सोयाबीनला प्रतिक्विंटल ५ हजार रुपये भाव मिळावा अशी मागणी केली,असे पवार यांनी या पत्रात म्हटले आहे. एकत्र कुटुंब पद्धतीत शेतजमीन कर्त्याच्या नावावर असल्याने आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याचे नाव सातबारा उताऱ्यावर नसते. या शिवाय, वर्षानुवर्षे जमीन कसत असणारे कूळ, सरकारी जमिनींवरील जुन्या अतिक्रमणदार शेतकऱ्यांची, देवस्थान जमिनींवरील जुन्या वहिवाटदारांची नावे हक्क-अभिलेखी मालकी हक्कात नमूद नसतात. म्हणून आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याच्या कुटुंबाला मदत करण्याच्या सरकारी निकषांत बदल करावेत, अशी मागणी त्यांनी केली.