शहरं
Join us  
Trending Stories
1
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
2
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
3
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
4
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
5
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
6
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
7
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
8
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
9
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
10
भाजपचे माजी नगरसेवक हरेश केणी यांचा कॉग्रेस मध्ये प्रवेश
11
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
12
जीएसटी कपातीनंतरही गाड्या स्वस्त होणार नाहीत? सणासुदीच्या काळातही डिस्काउंट नाही, 'हे' आहे कारण
13
जीएसटी कपातीनंतर MRP चा गोंधळ: केंद्र सरकारचा मोठा निर्णय
14
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
15
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!
16
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
17
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
18
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
19
'लवकरच व्यापार करार...', ट्रम्प टॅरिफबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिली महत्वाची माहिती
20
IND vs PAK: "जसप्रीत बुमराहला मैदानात.."; सुनील गावसकरांचा एक सल्ला, पाकिस्तानची निघाली लाज

राज्यातील दुष्काळाला शरद पवारच जबाबदार - विखे

By admin | Updated: September 8, 2015 17:19 IST

ज्यात पाण्याचे दुर्भिक्ष्य आणि सध्याच्या दुष्काळाला राष्ट्रवादीचे नेते शरद पवार हेच जबाबदार आहेत, अशी टीका काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब विखे यांनी केली.

विकासाचा खेळखंडोबा केला
 अहमदनगर : राज्यात पाण्याचे दुर्भिक्ष्य आणि सध्याच्या दुष्काळाला राष्ट्रवादीचे नेते शरद पवार हेच जबाबदार आहेत, अशी टीका माजी मंत्री, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब विखे यांनी केली आहे. राज्यात पाणीप्रश्नावरुन तेच भांडणे लावण्याचे काम करतात, असा आरोप करुन आता दुष्काळावर मोर्चा काढणार्‍या पवारांनी एवढी वर्षे सत्तेत राहून काय केले, असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. 
सोमवारी लोणी येथे पत्रपरिषदेत विखे बोलत होते. प्रारंभी त्यांनी पवारांचा अप्रत्यक्ष उल्लेख केला. नंतर थेट पवारांवर संधान साधले. विखे म्हणाले, बारामतीकरांमुळे राज्यातील पाणी, वीज प्रश्नासोबत ग्रामीण विकासाचा खेळखंडोबा झाला आहे. पवार ३ वेळा राज्याचे मुख्यमंत्री, केंद्रात काही वर्षे कृषी मंत्री होते. राज्यात पाटबंधारे, वीज अशी महत्त्वाची खाती त्यांच्याकडे होती. आज त्यांच्यावर दुष्काळावर मोर्चा काढण्याची वेळ येते, याचे त्यांनी आत्मपरीक्षण करावे. पवार उठसूट दुसर्‍यांवर शेतीतील काय कळते म्हणून टीका करतात. यांना कळत होते तर यांनी आजवर काय केले, असा सवालही विखेंनी केला. मराठवाड्याचा दुष्काळ कायम राहील, याचे नियोजन पवारांनी खुबीने केले. राज्यात नाशिक, नगर, मराठवाडा ही भांडणे राजकीय पटलावर नेण्याचे श्रेयही त्यांचेच आहे. पश्‍चिम वाहिनी नद्यांचे पाणी पूर्वेकडे वळविण्याकडे त्यांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले. या कामांचे साधे सर्वेक्षणही त्यांनी करू दिले नाही. गोदावरी खोर्‍याचा पाणीप्रश्न पेटत ठेवतात. मात्र बीड, उस्मानाबाद, लातूरचे हक्काचे २१ टीएमसी पाणी कृष्णा खोर्‍यातून देणे बंधनकारक असताना या प्रश्नाला ते बगल देतात. आज राज्यातील ८0 टक्के दुष्काळ एकट्या मराठवाड्यात आहे. 
न्याय देणे कोषातच नाही!
शेतीचे पाणी उद्योगांकडे वळवून शेती ओस पाडण्यास पवारच जबाबदार आहेत. यासाठी त्यांच्याकडून उद्योगांतून कर जास्त मिळतो, शेतीतून कमी मिळतो असे लंगडे सर्मथन केले जाते. न्याय देणे हे त्यांच्या कोषातच नाही. न्याय दिल्याचे ते फक्त भासवतात, अशी टीका विखे यांनी केली. आठमाही कालवे धोरण
■ स्व.शंकरराव चव्हाण यांनी कालवे बारमाहीचे आठमाही करावेत, असे धोरण जाहीर केले कुकडीपासून याची सुरुवात झाली. पवारांनीही यास पाठिंबा दिला. पुढे याचाही त्यांना सोयीस्कर विसर पडला. 
■ केंद्रात कृषी मंत्री असताना कृत्रिम पावसाच्या धोरणास त्यांनी विरोध केला होता. दुष्काळी भागातील जनता सतत आपल्या दारात आली पाहिजे, हेच राजकारण यामागे होते.
■ सध्याच्या राज्य सरकारने कृत्रिम पावसाचे धाडस केले. पवारांनी मोर्चे काढण्यापेक्षा केंद्रातून या प्रयोगासाठी पैसे आणण्यासाठी वजन खर्ची घालावे, असा सल्लाही विखेंनी दिला.
 
कुकडीचे पाणी कुठे गेले?
नगर जिल्ह्याचे कुकडीतील ५0 टक्के पाणी कुठे गेले, असा सवालही त्यांनी केला. कुकडीतून ५0 टक्के पाणी नगर दक्षिण जिल्ह्यासाठी तर ५0 टक्के पुणे जिल्ह्यासाठी होते. यापैकी नगर दक्षिण जिल्ह्याला मिळाले किती, याची चौकशी पवारांनी कधी केली का? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.
 बारामतीकर बहुरुपीर 
उसाला पाणी कमी पडते, ती तूट भरुन काढण्यासाठी १२ हजार कोटींचा भिमा स्थिरीकरण प्रकल्प त्यांनी हाती घेतला. हेच पैसे वापरुन पश्‍चिमेचे पाणी मराठवाड्याला देण्यास ते हातभार लावू शकले असते. मराठवाड्यासह राज्य तहानलेले ठेवले, आता मात्र त्यांना मराठवाड्यातील दुष्काळ आठवला. त्यामुळे बारामतीकर हे खरे बहुरुपी आहेत, हे सिद्ध होते असे विखे म्हणाले
टगेगिरी हीच संस्कृती 
पवार शाहू-फुले-आंबेडकरांचे नाव घेण्यास विसरत नाहीत. त्यांना ही टगेगिरी अपेक्षित होती, असा त्यांचा समज आहे का? हीच का बारामतीकरांची संस्कृती, अशी कोपरखळीही विखे यांनी मारली.