शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
4
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
5
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
6
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
7
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
8
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
9
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
10
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
11
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
12
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
13
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
14
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
15
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
16
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
17
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
18
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
19
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

राज्यातील दुष्काळाला शरद पवारच जबाबदार - विखे

By admin | Updated: September 8, 2015 17:19 IST

ज्यात पाण्याचे दुर्भिक्ष्य आणि सध्याच्या दुष्काळाला राष्ट्रवादीचे नेते शरद पवार हेच जबाबदार आहेत, अशी टीका काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब विखे यांनी केली.

विकासाचा खेळखंडोबा केला
 अहमदनगर : राज्यात पाण्याचे दुर्भिक्ष्य आणि सध्याच्या दुष्काळाला राष्ट्रवादीचे नेते शरद पवार हेच जबाबदार आहेत, अशी टीका माजी मंत्री, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब विखे यांनी केली आहे. राज्यात पाणीप्रश्नावरुन तेच भांडणे लावण्याचे काम करतात, असा आरोप करुन आता दुष्काळावर मोर्चा काढणार्‍या पवारांनी एवढी वर्षे सत्तेत राहून काय केले, असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. 
सोमवारी लोणी येथे पत्रपरिषदेत विखे बोलत होते. प्रारंभी त्यांनी पवारांचा अप्रत्यक्ष उल्लेख केला. नंतर थेट पवारांवर संधान साधले. विखे म्हणाले, बारामतीकरांमुळे राज्यातील पाणी, वीज प्रश्नासोबत ग्रामीण विकासाचा खेळखंडोबा झाला आहे. पवार ३ वेळा राज्याचे मुख्यमंत्री, केंद्रात काही वर्षे कृषी मंत्री होते. राज्यात पाटबंधारे, वीज अशी महत्त्वाची खाती त्यांच्याकडे होती. आज त्यांच्यावर दुष्काळावर मोर्चा काढण्याची वेळ येते, याचे त्यांनी आत्मपरीक्षण करावे. पवार उठसूट दुसर्‍यांवर शेतीतील काय कळते म्हणून टीका करतात. यांना कळत होते तर यांनी आजवर काय केले, असा सवालही विखेंनी केला. मराठवाड्याचा दुष्काळ कायम राहील, याचे नियोजन पवारांनी खुबीने केले. राज्यात नाशिक, नगर, मराठवाडा ही भांडणे राजकीय पटलावर नेण्याचे श्रेयही त्यांचेच आहे. पश्‍चिम वाहिनी नद्यांचे पाणी पूर्वेकडे वळविण्याकडे त्यांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले. या कामांचे साधे सर्वेक्षणही त्यांनी करू दिले नाही. गोदावरी खोर्‍याचा पाणीप्रश्न पेटत ठेवतात. मात्र बीड, उस्मानाबाद, लातूरचे हक्काचे २१ टीएमसी पाणी कृष्णा खोर्‍यातून देणे बंधनकारक असताना या प्रश्नाला ते बगल देतात. आज राज्यातील ८0 टक्के दुष्काळ एकट्या मराठवाड्यात आहे. 
न्याय देणे कोषातच नाही!
शेतीचे पाणी उद्योगांकडे वळवून शेती ओस पाडण्यास पवारच जबाबदार आहेत. यासाठी त्यांच्याकडून उद्योगांतून कर जास्त मिळतो, शेतीतून कमी मिळतो असे लंगडे सर्मथन केले जाते. न्याय देणे हे त्यांच्या कोषातच नाही. न्याय दिल्याचे ते फक्त भासवतात, अशी टीका विखे यांनी केली. आठमाही कालवे धोरण
■ स्व.शंकरराव चव्हाण यांनी कालवे बारमाहीचे आठमाही करावेत, असे धोरण जाहीर केले कुकडीपासून याची सुरुवात झाली. पवारांनीही यास पाठिंबा दिला. पुढे याचाही त्यांना सोयीस्कर विसर पडला. 
■ केंद्रात कृषी मंत्री असताना कृत्रिम पावसाच्या धोरणास त्यांनी विरोध केला होता. दुष्काळी भागातील जनता सतत आपल्या दारात आली पाहिजे, हेच राजकारण यामागे होते.
■ सध्याच्या राज्य सरकारने कृत्रिम पावसाचे धाडस केले. पवारांनी मोर्चे काढण्यापेक्षा केंद्रातून या प्रयोगासाठी पैसे आणण्यासाठी वजन खर्ची घालावे, असा सल्लाही विखेंनी दिला.
 
कुकडीचे पाणी कुठे गेले?
नगर जिल्ह्याचे कुकडीतील ५0 टक्के पाणी कुठे गेले, असा सवालही त्यांनी केला. कुकडीतून ५0 टक्के पाणी नगर दक्षिण जिल्ह्यासाठी तर ५0 टक्के पुणे जिल्ह्यासाठी होते. यापैकी नगर दक्षिण जिल्ह्याला मिळाले किती, याची चौकशी पवारांनी कधी केली का? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.
 बारामतीकर बहुरुपीर 
उसाला पाणी कमी पडते, ती तूट भरुन काढण्यासाठी १२ हजार कोटींचा भिमा स्थिरीकरण प्रकल्प त्यांनी हाती घेतला. हेच पैसे वापरुन पश्‍चिमेचे पाणी मराठवाड्याला देण्यास ते हातभार लावू शकले असते. मराठवाड्यासह राज्य तहानलेले ठेवले, आता मात्र त्यांना मराठवाड्यातील दुष्काळ आठवला. त्यामुळे बारामतीकर हे खरे बहुरुपी आहेत, हे सिद्ध होते असे विखे म्हणाले
टगेगिरी हीच संस्कृती 
पवार शाहू-फुले-आंबेडकरांचे नाव घेण्यास विसरत नाहीत. त्यांना ही टगेगिरी अपेक्षित होती, असा त्यांचा समज आहे का? हीच का बारामतीकरांची संस्कृती, अशी कोपरखळीही विखे यांनी मारली.