शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
2
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
3
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
4
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
5
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
6
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
7
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
8
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
9
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
10
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
11
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
12
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट
13
IND vs ENG: गिल-राहुलची फलंदाजी अन् स्टोक्सची तंदुरूस्ती... 'या' ५ गोष्टी ठरवतील चौथ्या कसोटीचा निकाल
14
चातुर्मासातील पहिली श्रावण विनायक चतुर्थी: गणपती होईल प्रसन्न, कसे कराल व्रतपूजन? शुभच घडेल
15
पहिला श्रावणी सोमवार: ‘असे’ करा शिवपूजन, कोणती शिवामूठ वाहावी? पाहा, महत्त्व अन् मान्यता
16
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोना महामारीचा मेंदूवर भयंकर परिणाम, संसर्ग झाला नसला तरी...
17
प्राडाच्या वादानंतर कोल्हापुरी चप्पलांना QR कोड! संघटनेने का घेतला असा निर्णय? जाणून घ्या कोल्हापुरीचा इतिहास!
18
Pune Rave Party: "तुमच्या तर दिव्याखालीच अंधार"; चित्रा वाघांनी सुप्रिया सुळे, रोहिणी खडसेंना सुनावले
19
"पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विष्णूचे ११ वे अवतार, डोनाल्ड ट्रम्प त्यांना..."; भाजपा नेत्याचा मोठा दावा
20
आजारी लेकीला रुग्णालयात घेऊन चाललेले वडील, BMW ची धडक; मन हेलावून टाकणारी घटना

राज्यातील दुष्काळाला शरद पवारच जबाबदार - विखे

By admin | Updated: September 8, 2015 17:19 IST

ज्यात पाण्याचे दुर्भिक्ष्य आणि सध्याच्या दुष्काळाला राष्ट्रवादीचे नेते शरद पवार हेच जबाबदार आहेत, अशी टीका काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब विखे यांनी केली.

विकासाचा खेळखंडोबा केला
 अहमदनगर : राज्यात पाण्याचे दुर्भिक्ष्य आणि सध्याच्या दुष्काळाला राष्ट्रवादीचे नेते शरद पवार हेच जबाबदार आहेत, अशी टीका माजी मंत्री, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब विखे यांनी केली आहे. राज्यात पाणीप्रश्नावरुन तेच भांडणे लावण्याचे काम करतात, असा आरोप करुन आता दुष्काळावर मोर्चा काढणार्‍या पवारांनी एवढी वर्षे सत्तेत राहून काय केले, असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. 
सोमवारी लोणी येथे पत्रपरिषदेत विखे बोलत होते. प्रारंभी त्यांनी पवारांचा अप्रत्यक्ष उल्लेख केला. नंतर थेट पवारांवर संधान साधले. विखे म्हणाले, बारामतीकरांमुळे राज्यातील पाणी, वीज प्रश्नासोबत ग्रामीण विकासाचा खेळखंडोबा झाला आहे. पवार ३ वेळा राज्याचे मुख्यमंत्री, केंद्रात काही वर्षे कृषी मंत्री होते. राज्यात पाटबंधारे, वीज अशी महत्त्वाची खाती त्यांच्याकडे होती. आज त्यांच्यावर दुष्काळावर मोर्चा काढण्याची वेळ येते, याचे त्यांनी आत्मपरीक्षण करावे. पवार उठसूट दुसर्‍यांवर शेतीतील काय कळते म्हणून टीका करतात. यांना कळत होते तर यांनी आजवर काय केले, असा सवालही विखेंनी केला. मराठवाड्याचा दुष्काळ कायम राहील, याचे नियोजन पवारांनी खुबीने केले. राज्यात नाशिक, नगर, मराठवाडा ही भांडणे राजकीय पटलावर नेण्याचे श्रेयही त्यांचेच आहे. पश्‍चिम वाहिनी नद्यांचे पाणी पूर्वेकडे वळविण्याकडे त्यांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले. या कामांचे साधे सर्वेक्षणही त्यांनी करू दिले नाही. गोदावरी खोर्‍याचा पाणीप्रश्न पेटत ठेवतात. मात्र बीड, उस्मानाबाद, लातूरचे हक्काचे २१ टीएमसी पाणी कृष्णा खोर्‍यातून देणे बंधनकारक असताना या प्रश्नाला ते बगल देतात. आज राज्यातील ८0 टक्के दुष्काळ एकट्या मराठवाड्यात आहे. 
न्याय देणे कोषातच नाही!
शेतीचे पाणी उद्योगांकडे वळवून शेती ओस पाडण्यास पवारच जबाबदार आहेत. यासाठी त्यांच्याकडून उद्योगांतून कर जास्त मिळतो, शेतीतून कमी मिळतो असे लंगडे सर्मथन केले जाते. न्याय देणे हे त्यांच्या कोषातच नाही. न्याय दिल्याचे ते फक्त भासवतात, अशी टीका विखे यांनी केली. आठमाही कालवे धोरण
■ स्व.शंकरराव चव्हाण यांनी कालवे बारमाहीचे आठमाही करावेत, असे धोरण जाहीर केले कुकडीपासून याची सुरुवात झाली. पवारांनीही यास पाठिंबा दिला. पुढे याचाही त्यांना सोयीस्कर विसर पडला. 
■ केंद्रात कृषी मंत्री असताना कृत्रिम पावसाच्या धोरणास त्यांनी विरोध केला होता. दुष्काळी भागातील जनता सतत आपल्या दारात आली पाहिजे, हेच राजकारण यामागे होते.
■ सध्याच्या राज्य सरकारने कृत्रिम पावसाचे धाडस केले. पवारांनी मोर्चे काढण्यापेक्षा केंद्रातून या प्रयोगासाठी पैसे आणण्यासाठी वजन खर्ची घालावे, असा सल्लाही विखेंनी दिला.
 
कुकडीचे पाणी कुठे गेले?
नगर जिल्ह्याचे कुकडीतील ५0 टक्के पाणी कुठे गेले, असा सवालही त्यांनी केला. कुकडीतून ५0 टक्के पाणी नगर दक्षिण जिल्ह्यासाठी तर ५0 टक्के पुणे जिल्ह्यासाठी होते. यापैकी नगर दक्षिण जिल्ह्याला मिळाले किती, याची चौकशी पवारांनी कधी केली का? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.
 बारामतीकर बहुरुपीर 
उसाला पाणी कमी पडते, ती तूट भरुन काढण्यासाठी १२ हजार कोटींचा भिमा स्थिरीकरण प्रकल्प त्यांनी हाती घेतला. हेच पैसे वापरुन पश्‍चिमेचे पाणी मराठवाड्याला देण्यास ते हातभार लावू शकले असते. मराठवाड्यासह राज्य तहानलेले ठेवले, आता मात्र त्यांना मराठवाड्यातील दुष्काळ आठवला. त्यामुळे बारामतीकर हे खरे बहुरुपी आहेत, हे सिद्ध होते असे विखे म्हणाले
टगेगिरी हीच संस्कृती 
पवार शाहू-फुले-आंबेडकरांचे नाव घेण्यास विसरत नाहीत. त्यांना ही टगेगिरी अपेक्षित होती, असा त्यांचा समज आहे का? हीच का बारामतीकरांची संस्कृती, अशी कोपरखळीही विखे यांनी मारली.