शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
3
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
4
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
5
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
6
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
7
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
8
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
9
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
10
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
11
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
12
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
13
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
14
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
15
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
16
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
17
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
18
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
19
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
20
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर

महाराष्ट्रातील राजकारण प्रगल्भ, पक्षीय मतभेद विसरून लोक एकमेकांच्या सुखदु:खात सहभागी होतात- शरद पवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2017 03:32 IST

महाराष्ट्रातील राजकारण प्रगल्भ आहे. पक्षीय मतभेद विसरून लोक एकमेकांच्या सुखदु:खात सहभागी होतात. देशात अन्य कोणत्याच राज्यात ही परंपरा पाहायला मिळत नाही.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : महाराष्ट्रातील राजकारण प्रगल्भ आहे. पक्षीय मतभेद विसरून लोक एकमेकांच्या सुखदु:खात सहभागी होतात. देशात अन्य कोणत्याच राज्यात ही परंपरा पाहायला मिळत नाही. संसदेतही असे चित्र दिसत नाही. महाराष्ट्र हे सुसंस्कृत लोकांचे राज्य आहे. राजकीय विरोधातही व्यक्तिगत सलोखा जपला जातो, असे उद्गार राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा. शरद पवार यांनी येथे काढले.राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या राजकीय वाटचालीचा आढावा घेणाºया ‘समग्र’ या पुस्तकाच्या प्रकाशनाचासोहळा सोमवारी रवींद्र नाट्यमंदिरात झाला. शिवसेना वगळता सर्वच राजकीत पक्षांच्या दिग्गजांनी लावलेली हजेरी, उपस्थितनेत्यांच्या राजकीय कोपरखळ््या, मिश्किल शेरेबाजीत तटकरेयांच्या राजकीय वाटचालीच्या कौतुकाचा हृदय सोहळा राजकीय, सामाजिक, कला आणि क्रीडा क्षेत्रातील दिग्गजांच्या उपस्थितीत रंगला. पवार कुटुंबीयांचे राजकारणातील विरोधक म्हणून ओळखले जाणारे मंत्री महादेव जानकर आणि राज्यमंत्री सदाभाऊ खोत व्यासपीठावर उपस्थित होते.एरवी, महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांना राजकीय टोमणे मारणारे शरद पवार सोमवारी त्यांच्याच मांडीला मांडी लावून बसले होते. तर, माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्यामध्ये ‘एनडीए’त सहभागी झालेले महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे नेते नारायण राणे हास्यविनोदात रंगल्याचे चित्र होते.रायगड जिल्ह्याच्या राजकारणात तटकरेंचे कट्टर स्पर्धक शेकापचे जयंत पाटील यांनीही कोपरखळ््या मारत तटकरेंना शुभेच्छा दिल्या. जातीचे संख्याबळ सोबत नसतानाही, ताकदवान नेत्यांची परंपरा असणाºया रायगड जिल्'ात तटकरे यांनी स्वत:चे स्थान निर्माण केले. एका लहान कुटुंबातून पुढे येऊन जिल्ह्यातील लोकांच्या मनावर राज्य केले. यातच त्यांच्या कर्तृत्वाची प्रचिती मिळते. तटकरे यांच्या कौतुकासाठी जमलेल्या विविध पक्षातील नेत्यांमुळे हे व्यासपीठ राज्याच्या सुसंस्कृतपणाचे आणि सलोख्याचे प्रतिक वाटत असल्याची भावना शरद पवार यांनी व्यक्त केली.मुख्यमंत्री कार्यक्रमाला अनुपस्थितप्रमुख अतिथी म्हणून येण्याचे मान्य करूनही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मात्र या कार्यक्रमाला अनुपस्थित राहिले.सुशीलकुमारांचीधमाल बॅटिंगरोषाला विसरून चालत नाही. माझी तर ती सासुरवाडी आहे, असे सांगत सुशीलकुमार शिंदे यांनी आपल्या खुमासदार भाषणाला सुरुवात केली. शरद पवारांना माणसे न्याहाळण्याचा नाद आहे. कर्तृत्ववान, धडपडणाºया तरुण मंडळींना हेरतात आणि त्यांना पुढे नेतात. आम्ही सगळे तसे काँग्रेसवालेच पण आता मी एकटाच आहे, असे शिंदे म्हणताच शरद पवारांसह सर्वांनाच हसू आवरता आले नाही. नारायण राणे आता तिकडे गेले तरी फरक पडत नाही. वैयक्तिक संबंध तसेच आहेत, असे सांगतानाच कोकणी माणूस चाणाक्ष असतो, असे शिंदे यांनी म्हणताच सभागृहात हशा पिकला.राजकीय टोले-प्रतिटोलेशरद पवारांनी तटकरेंना खासदारकी द्यावी. तटकरेंची ‘ब्याद’ दिल्लीला गेली की, आम्ही जिल्ह्यात मोकळे, असे शेकापचे नेते जयंत पाटील म्हणाले. त्यावर, स्वत:ची सोय लावण्यासाठी तटकरेंना दिल्लीला पाठवायला सांगितले. पण, शरदराव सगळंच ऐकतील असे समजू नका जयंतराव. कुणाला कधी आणि कसे ओढावे? हे शरद पवारांना चांगले कळते, अशी शेरेबाजी सुशीलकुमार शिंदे यांनी केली.चौफेर दृष्टी अन् लग्न...पवारांना माणसे न्याहाळण्याचा छंद असल्याचे सुशीलकुमार म्हणाले. त्यावर, राजकारणात न्याहाळणं, निवडणं हे काम सगळेच करतात. शिंदे पोलीस खात्यात होते. त्यामुळे न बोलता चौफेर दृष्टी ठेवण्याची त्यांची जुनी सवय. ती आमच्याकडे नव्हती म्हणून आमचं लग्न घरच्यांनी जुळवलं. शिंदे यांनी मात्र चौफेर दृष्टी ठेवली, असे उत्तर पवार यांनी देताच सुशीलकुमार शिंदे यांनाही हसू आवरता आले नाही.अंजली दमानिया यांची निदर्शने-तटकरेंच्या कार्यक्रमाला फडणवीस येणार म्हणून सभागृहाबाहेर ‘आप’च्या अंजली दमानिया यांनी निदर्शने केली. त्यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन सोडून दिले. मुख्यमंत्री या कार्यक्रमाला उपस्थित राहणार असल्याचे निमंत्रण पत्रिकेत नमूद केले होते. त्यावरून दमानिया यांनी सोशल मीडियातून टीका केली होती.