शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
2
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
3
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
4
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
5
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
6
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
7
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
8
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
9
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
10
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
11
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
12
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
13
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
14
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
15
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
16
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
17
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
18
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
19
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
20
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!

‘मोदींपेक्षा शरद पवारांना शेतीची अधिक जाण’

By admin | Updated: April 23, 2017 02:08 IST

शेतकऱ्यांचे प्रश्न पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापेक्षा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना जास्त कळतात, असे मत खासदार राजू शेट्टी यांनी व्यक्त केले.

पुणे : शेतकऱ्यांचे प्रश्न पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापेक्षा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना जास्त कळतात, असे मत खासदार राजू शेट्टी यांनी व्यक्त केले. शेट्टी यांनी यापूर्वी शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसंदर्भात पवारांच्या विरोधात थेट बारामतीत आंदोलने केलेली आहेत. त्यामुळे त्यांच्या वक्तव्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. परिवर्तन सामाजिक संस्थेतर्फे आयोजित राज्यस्तरीय परिवर्तन परिषदेचे उद्घाटन महापौर मुक्ता टिळक यांच्या हस्ते झाले. या परिषदेत तरूणांनी राजकारणात यावे का, या विषयावर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि खासदार राजू शेट्टी यांची भूषण राऊत यांनी मुलाखत घेतली़ त्यावेळी शेतीचे प्रश्न नरेंद्र मोदी की शरद पवार या दोघांपैकी कोणाला अधिक समजतात, असा प्रश्न विचारला असता शेट्टी यांनी क्षणाचाही विलंब न लावता पवार यांचे नाव सांगितले. शेट्टी म्हणाले, राजकारणात आलो तेव्हापासून शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी लढत आलो आहे. मागील वर्षी शेतकऱ्यांसाठी ऋण मुक्त अभियान ही विशेष मोहिम हाती घेतली आहे. १ मे पासून शेतकऱ्यांचा ७/१२ कोरा होण्यासाठी तीव्र लढा उभारला जाणार आहे. युवकांचा राजकारणाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला पाहिजे.पृथ्वीराज चव्हाण यांनी संघर्ष यात्रेवर सत्ताधारी भाजपकडून करण्यात येत असलेल्या टिकेबद्दल तीव्र नापसंती व्यक्त केली. राज्याच्या राजकारणात पहिल्यांदा विरोधक शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी एकत्र आले आहेत, याकडेही त्यांनी लक्ष वेधले. (प्रतिनिधी)