शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतानं ८० लढाऊ विमानांनी केला हल्ला; बिथरलेल्या पाकिस्तानी पंतप्रधानांचा कांगावा
2
२४ तासांत दुसऱ्यांदा बलुच बंडखोरांचा पाकिस्तानी सैन्यावर हल्ला, रिमोटने वाहन उडवले, ७ सैनिकांना ठार मारल्याचा दावा
3
मुंबईच्या हॉटेलमध्ये प्रियकराची हत्या, पत्नीला केला मेसेज...; राजस्थानात महिलेला अटक
4
एकनाथ शिंदेंचा एकाचवेळी काँग्रेस, शरद पवार गटाला धक्का; पदाधिकारी, कार्यकर्ते शिवसेनेत
5
Operation Sindoor Live Updates: जम्मू-काश्मीरच्या कुपवाडामध्ये पाकिस्तानकडून पुन्हा गोळीबार, भारताने दिले चोख प्रत्युत्तर
6
भारताने सियालकोटवर हल्ला चढवला, अन् पाकिस्तानने अमृतसरवर; रात्रभर अफवांचा बाजार उठला...
7
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आर्थिक लाभ होऊ शकेल; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
8
पाकिस्तानला घरात घुसून मारले! १०० हून अधिक दहशतवादी ठार; पहलगाम हल्ल्याचा घेतला बदला
9
Mohini Ekadashi 2025: आज मोहिनी एकादशीनिमित्त विष्णुंच्या मोहक रूपाला घालूया आर्त साद!
10
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
11
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी निवडले ‘सिंदूर’ नाव; दडले आहेत कोणते पाच अर्थ? 
12
भारताच्या हल्ल्याला प्रत्युत्तरासाठी पाकची लष्कराला परवानगी
13
अर्ध्या तासात दहशतवादी भुईसपाट; ९ तळ उद्ध्वस्त; लष्करातील नारीशक्तीचे जगाला दर्शन
14
संपादकीय: याद राखा, हिशेब चुकता होईल! पाकिस्तान काय करेल आणि काय नाही...
15
पाकला धडा शिकवलाच, कायदेही मोडले नाहीत! एलओसी पार न करताच शत्रूवर मारा... 
16
सिंदूर, सोफिया अन् व्योमिका... नावात काय नाही, नावातच सारे दडलेले होते...
17
प्रवाशांना ‘बेस्ट’ची रिअल-टाइम सुविधा; मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उपक्रमाचे उद्घाटन 
18
सीमावर्ती जिल्ह्यांमधील १४ जिल्ह्यांत सर्व शाळा बंद; ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर पंजाब, राजस्थान आणि जम्मूत सूचना जारी  
19
विनाअपघात एसटी बस चालकांना बक्षीस देणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती

‘मोदींपेक्षा शरद पवारांना शेतीची अधिक जाण’

By admin | Updated: April 23, 2017 02:08 IST

शेतकऱ्यांचे प्रश्न पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापेक्षा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना जास्त कळतात, असे मत खासदार राजू शेट्टी यांनी व्यक्त केले.

पुणे : शेतकऱ्यांचे प्रश्न पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापेक्षा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना जास्त कळतात, असे मत खासदार राजू शेट्टी यांनी व्यक्त केले. शेट्टी यांनी यापूर्वी शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसंदर्भात पवारांच्या विरोधात थेट बारामतीत आंदोलने केलेली आहेत. त्यामुळे त्यांच्या वक्तव्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. परिवर्तन सामाजिक संस्थेतर्फे आयोजित राज्यस्तरीय परिवर्तन परिषदेचे उद्घाटन महापौर मुक्ता टिळक यांच्या हस्ते झाले. या परिषदेत तरूणांनी राजकारणात यावे का, या विषयावर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि खासदार राजू शेट्टी यांची भूषण राऊत यांनी मुलाखत घेतली़ त्यावेळी शेतीचे प्रश्न नरेंद्र मोदी की शरद पवार या दोघांपैकी कोणाला अधिक समजतात, असा प्रश्न विचारला असता शेट्टी यांनी क्षणाचाही विलंब न लावता पवार यांचे नाव सांगितले. शेट्टी म्हणाले, राजकारणात आलो तेव्हापासून शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी लढत आलो आहे. मागील वर्षी शेतकऱ्यांसाठी ऋण मुक्त अभियान ही विशेष मोहिम हाती घेतली आहे. १ मे पासून शेतकऱ्यांचा ७/१२ कोरा होण्यासाठी तीव्र लढा उभारला जाणार आहे. युवकांचा राजकारणाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला पाहिजे.पृथ्वीराज चव्हाण यांनी संघर्ष यात्रेवर सत्ताधारी भाजपकडून करण्यात येत असलेल्या टिकेबद्दल तीव्र नापसंती व्यक्त केली. राज्याच्या राजकारणात पहिल्यांदा विरोधक शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी एकत्र आले आहेत, याकडेही त्यांनी लक्ष वेधले. (प्रतिनिधी)