शहरं
Join us  
Trending Stories
1
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
2
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
3
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
4
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
5
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
6
Mumbai Rain Mithi River: दोरी फेकली, पण अंदाज चुकला; मिठी नदीच्या पुरात तरुण गेला वाहून
7
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
8
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
9
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका
10
कुत्र्याला वाचवण्याच्या प्रयत्नात पोलीस अधिकाऱ्याचा जीव गेला; रस्त्यावर पडताच कारने चिरडले
11
"मी सुरक्षित आहे..." १३ दिवसांनी अर्चना तिवारीचा आईला फोन; बेपत्ता होण्यामागचं रहस्य उलगडणार?
12
निमिषा प्रियासाठी सरकार जनतेकडून ८ कोटी मागत आहे? परराष्ट्र मंत्रालयाने सत्य सांगितले
13
याला म्हणतात शेअर...! 24 तासांत 1 लाखाचे केले 88 लाख, एवढी तेजी आली की ट्रेडिगच थांबवावी लागली! नेमकं काय घडलं?
14
जिओने खिसा कापला...! १ जीबी, २८ दिवसांचा प्लॅन बंद केला; आता २९९ रुपये मोजावे लागणार
15
काँग्रेसने ज्या 'ट्विट'वरून निवडणूक आयोगाची गचांडी धरली, ती पोस्टच डिलीट; संजय कुमारांनी माफी का मागितली?
16
ऑनलाइन बेटिंग आता दंडनीय गुन्हा, केंद्रीय मंत्रिमंडळाचा गेमिंग विधेयकाला हिरवा कंदील
17
India Squad For Asia Cup 2025: संघ ठरला! सूर्याच्या नेतृत्वाखाली गिलकडेही आली मोठी जबाबदारी, कुणाला मिळाली संधी?
18
Viral Video : तरुणीने ट्रक चालकाशी बांधली लग्नगाठ; स्वतः सांगितलं भन्नाट कारण! व्हिडीओ होतोय व्हायरल
19
KBC च्या हॉट सीटवर अमिताभ बच्चन यांच्यासोबत खेळण्याची सुवर्णसंधी! BHIM App वर अशी करा नोंदणी
20
पत्नीचा संशयास्पद मृत्यू, अनेक महिलांशी संबंध...निळ्या ड्रम प्रकरणातील आरोपी प्रियकराचा 'कारनामा'

शरद पवारांच्या अभिनंदनाच्या ठरावाकडे आमदारांनी फिरवली पाठ!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2017 01:50 IST

गेली ५० वर्षे सलग देशाच्या चारही सभागृहांत कार्यरत असणारे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या कार्याचे अभिनंदन करणारा ठराव विधानसभेत मांडला गेला. मात्र, या ठरावावरची भाषणे राष्ट्रवादी व काँग्रेसचे काही आमदार वगळता बहुतांश रिकाम्या बाकांसमोर झाली.

अतुल कुलकर्णी ।मुंबई : गेली ५० वर्षे सलग देशाच्या चारही सभागृहांत कार्यरत असणारे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या कार्याचे अभिनंदन करणारा ठराव विधानसभेत मांडला गेला. मात्र, या ठरावावरची भाषणे राष्ट्रवादी व काँग्रेसचे काही आमदार वगळता बहुतांश रिकाम्या बाकांसमोर झाली. शनिवारी येणारा हा ठराव शनिवार ते सोमवार अधिवेशनाला सुटी द्यायची म्हणून शुक्रवारी घेतला गेला. तो दुपारी २च्या सुमारास सुरू झाला. त्या वेळी सत्ताधारी बाकावर मंत्री एकनाथ शिंदे वगळता शिवसेनेचा एकही कॅबिनेट मंत्री सभागृहात नव्हता. तर काँग्रेसच्या बाकावर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह अनेक सदस्यांची अनुपस्थिती होती.सत्ताधारी बाकांवर तर लक्षणीय अनुपस्थिती होती. विधानसभेत पतंगराव कदम यांचे उत्स्फूर्त भाषण झाले. कोणताही कागद हातात न धरता पतंगरावांनी अनेक धमाल किस्सेही सांगितले व पवारांच्या त्यांना वाटणा-या राजकीय चुकाही बोलून दाखवल्या. शरद पवारांनी वसंतदादांच्या पाठीत खंजीर खुपसला हे सांगितले जात असले तरी ते चुकीचे आहे. उलट वसंतदादांनीच पवारांना मुख्यमंत्री करण्याची इच्छा आपल्याजवळ बोलून दाखवली होती, असेही पतंगराव म्हणाले. काँग्रेस सोडण्याची मोठी चूक पवारांनी केली. इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांच्यानंतर काँग्रेसमध्ये दुसरा मोठा मास लिडर नाही. जर पवार काँग्रेसमध्येच राहिले असते तर देशाचे व राज्याचे राजकारण वेगळ्या दिशेने गेले असते, असे सांगून पतंगराव म्हणाले, पवारांनी दुसरी चूक केली ती संरक्षणमंत्री असताना ते पद सोडून त्यांनी राज्याचे मुख्यमंत्रिपद स्वीकारले. एकदा मुख्यमंत्री झाल्यानंतर पुन्हा तेच पद घेण्याऐवजी पवार दिल्लीत राहिले असते तरी चालले असते; पण चुकीच्या सल्ल्यामुळे त्यांनी हे निर्णय घेतले, असे आपले व्यक्तिगत मत असल्याचेही पतंगराव म्हणाले.शरद पवार म्हणजे शपथ न घेतलेले जनतेचे पंतप्रधान आहेत, असे सांगून जयंत पाटील म्हणाले, धीर आणि आत्मविश्वास हे प्रचंड मोठे गुण असणाºया पवार यांनी एन्रॉनचा विषय कधीही राजकीय केला नाही. त्यांच्या काळात तांदूळ, डाळींना विक्रमी भाववाढ मिळाल्याचे सांगितले.अनेक सदस्यांनी भाषणांचे मुद्दे कागदावर लिहून आणले होते व वाचून दाखवत भाषण केले. विधानपरिषदेत प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि नारायण राणे यांची भाषणे अतिशय उत्स्फूर्त होती. कोणताही आडपडदा किंवा कोणतेही राजकीय अभिनिवेश न आणता आपल्याला अत्यंत आवडणारे नेते शरद पवार आहेत, असे राणे यांनी सांगून टाकले.सगळ्यात प्रभावी भाषण तटकरे यांचे होते. कोणताही कागद हातात न धरता, कोठेही न अडखळता ओघवत्या शैलीत त्यांनी पवार यांच्या राजकीय कारकिर्दीचा मोठा पट सभागृहात उभा केला. तर शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत बोलताना पवार यांनी आनंद दिघे अडचणीत असताना ते कोणत्या पक्षाचे नेते आहेत हे नपाहता दिघेंना मदत केली होती. पवारांना वेगळून राज्याचे राजकारण नोंदले जाऊच शकत नाही, असेही ते म्हणाले.