शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान करतोय हल्ले, भारतानं पाठवली 'अनमोल' मदत...; दिल्लीच्या निर्णयानं अफगाणिस्तानचं मन जिंकलं, मुनीरला मिरची लागणार!
2
'दहशतवादी हल्ल्याचा कट अमेरिकेने रचला, पाकिस्तानने घडवून आणला'; शेख हसीना यांनी मौन सोडले
3
'ऑपरेशन सिंदूरद्वारे विस्फोट पाकिस्तानात, अन् झोप उडाली काँग्रेसची', पीएम मोदींचा घणाघात...
4
IND vs AUS : वॉशिंग्टनची अति 'सुंदर' बॅटिंग! विक्रमी विजयासह टीम इंडियानं केली ऑस्ट्रेलियाची बरोबरी
5
सरकारी निवासस्थानी प्रेयसीसोबत झोपले होते अधिकारी, पत्नीने रंगेहात पकडले आणि घरात कोंडले, त्यानंतर... 
6
शिंदेसेना म्हणजे दिल्या भाकरीचे अन् सांगितल्या कामाचे; अंबादास दानवेंची खरमरीत टीका
7
धोक्याची घंटा! फोन, लॅपटॉपचा जास्त वापर घातक; तरुणांमध्ये वाढली 'ड्राय आईज'ची समस्या
8
'सरकारने SIT ची घोषणा केली, पण नियुक्तीच नाही'; सुषमा अंधारे फलटण पोलीस ठाण्यात जाऊन विचारणार जाब
9
लोअर बर्थ आरक्षणाचे नियम बदलले! 'या' प्रवाशांना मिळणार प्राधान्य; बसणे-झोपण्याच्या वेळेतही बदल
10
IND vs SA Womens World Cup 2025 Final :आफ्रिकेनं जिंकला टॉस, फायनल जिंकण्यासाठी टीम इंडिया सेट करणार टार्गेट
11
Crime: पोलिसांनी गाडी थांबवली, माजी आमदार म्हणाले,"कागदपत्रे नाहीत, गाडीही चोरीची!"
12
"दिल्लीमध्ये बसून गणित करणाऱ्यांनी येऊन बघावं, हवा कोणत्या दिशेची आहे?"; PM मोदींकडून बिहारच्या जनतेला मोठी आश्वासनं
13
'गाझा' नंतर आता इस्रायलची नजर या मुस्लिम देशावर, भयंकर हल्ला करण्याची धमकी
14
Rahul Gandhi : राहुल गांधींनी मासे पकडण्यासाठी तलावात मारली उडी अन्...; Video तुफान व्हायरल
15
टीनएजर्ससाठी अलर्ट! सुंदर दिसण्याची हौस भलतीच महागात; 'स्किनकेअर'ची क्रेझ धोकादायक
16
IND vs AUS : टिम डेविडची वादळी खेळी! पठ्ठ्यानं मोडला सूर्या दादाचा मोठा विक्रम
17
कामगाराच्या खात्यात चुकून आले ₹८७,०००००, त्याने बोनस म्हणून उडवले, बॉसवर आली डोक्यावर हात मारण्याची वेळ 
18
iPhone 16: आयफोन १६ प्लसच्या खरेदीवर २५००० रुपये वाचवा; कुठं मिळतोय इतका स्वस्त?
19
६० का लगता नही कहीं से! अक्षय कुमारच्या शाहरुखला हटके शुभेच्छा; म्हणाला, "शकल से ४०..."
20
युक्रेनकडून रशियावर भीषण ड्रोनहल्ला, तुआप्से बंदरात घडवला मोठा विध्वंस, ऑईल टर्मिलन जळाले  

शरद पवारांच्या अभिनंदनाच्या ठरावाकडे आमदारांनी फिरवली पाठ!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2017 01:50 IST

गेली ५० वर्षे सलग देशाच्या चारही सभागृहांत कार्यरत असणारे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या कार्याचे अभिनंदन करणारा ठराव विधानसभेत मांडला गेला. मात्र, या ठरावावरची भाषणे राष्ट्रवादी व काँग्रेसचे काही आमदार वगळता बहुतांश रिकाम्या बाकांसमोर झाली.

अतुल कुलकर्णी ।मुंबई : गेली ५० वर्षे सलग देशाच्या चारही सभागृहांत कार्यरत असणारे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या कार्याचे अभिनंदन करणारा ठराव विधानसभेत मांडला गेला. मात्र, या ठरावावरची भाषणे राष्ट्रवादी व काँग्रेसचे काही आमदार वगळता बहुतांश रिकाम्या बाकांसमोर झाली. शनिवारी येणारा हा ठराव शनिवार ते सोमवार अधिवेशनाला सुटी द्यायची म्हणून शुक्रवारी घेतला गेला. तो दुपारी २च्या सुमारास सुरू झाला. त्या वेळी सत्ताधारी बाकावर मंत्री एकनाथ शिंदे वगळता शिवसेनेचा एकही कॅबिनेट मंत्री सभागृहात नव्हता. तर काँग्रेसच्या बाकावर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह अनेक सदस्यांची अनुपस्थिती होती.सत्ताधारी बाकांवर तर लक्षणीय अनुपस्थिती होती. विधानसभेत पतंगराव कदम यांचे उत्स्फूर्त भाषण झाले. कोणताही कागद हातात न धरता पतंगरावांनी अनेक धमाल किस्सेही सांगितले व पवारांच्या त्यांना वाटणा-या राजकीय चुकाही बोलून दाखवल्या. शरद पवारांनी वसंतदादांच्या पाठीत खंजीर खुपसला हे सांगितले जात असले तरी ते चुकीचे आहे. उलट वसंतदादांनीच पवारांना मुख्यमंत्री करण्याची इच्छा आपल्याजवळ बोलून दाखवली होती, असेही पतंगराव म्हणाले. काँग्रेस सोडण्याची मोठी चूक पवारांनी केली. इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांच्यानंतर काँग्रेसमध्ये दुसरा मोठा मास लिडर नाही. जर पवार काँग्रेसमध्येच राहिले असते तर देशाचे व राज्याचे राजकारण वेगळ्या दिशेने गेले असते, असे सांगून पतंगराव म्हणाले, पवारांनी दुसरी चूक केली ती संरक्षणमंत्री असताना ते पद सोडून त्यांनी राज्याचे मुख्यमंत्रिपद स्वीकारले. एकदा मुख्यमंत्री झाल्यानंतर पुन्हा तेच पद घेण्याऐवजी पवार दिल्लीत राहिले असते तरी चालले असते; पण चुकीच्या सल्ल्यामुळे त्यांनी हे निर्णय घेतले, असे आपले व्यक्तिगत मत असल्याचेही पतंगराव म्हणाले.शरद पवार म्हणजे शपथ न घेतलेले जनतेचे पंतप्रधान आहेत, असे सांगून जयंत पाटील म्हणाले, धीर आणि आत्मविश्वास हे प्रचंड मोठे गुण असणाºया पवार यांनी एन्रॉनचा विषय कधीही राजकीय केला नाही. त्यांच्या काळात तांदूळ, डाळींना विक्रमी भाववाढ मिळाल्याचे सांगितले.अनेक सदस्यांनी भाषणांचे मुद्दे कागदावर लिहून आणले होते व वाचून दाखवत भाषण केले. विधानपरिषदेत प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि नारायण राणे यांची भाषणे अतिशय उत्स्फूर्त होती. कोणताही आडपडदा किंवा कोणतेही राजकीय अभिनिवेश न आणता आपल्याला अत्यंत आवडणारे नेते शरद पवार आहेत, असे राणे यांनी सांगून टाकले.सगळ्यात प्रभावी भाषण तटकरे यांचे होते. कोणताही कागद हातात न धरता, कोठेही न अडखळता ओघवत्या शैलीत त्यांनी पवार यांच्या राजकीय कारकिर्दीचा मोठा पट सभागृहात उभा केला. तर शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत बोलताना पवार यांनी आनंद दिघे अडचणीत असताना ते कोणत्या पक्षाचे नेते आहेत हे नपाहता दिघेंना मदत केली होती. पवारांना वेगळून राज्याचे राजकारण नोंदले जाऊच शकत नाही, असेही ते म्हणाले.