शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

भाजपा सरकारला शरदाचे चांदणो

By admin | Updated: November 11, 2014 01:38 IST

महाराष्ट्रात अस्थिर सरकार राहू नये यासाठी सरकारच्या बाजूने मतदान करणार की राष्ट्रवादीचे आमदार अनुपस्थित राहणार हे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सांगितले नाही.

 बचावासाठी पवार सरसावले : वास्तवाचे भान ठेवून राष्ट्रवादी आमदारांचे मतदान

मुंबई : महाराष्ट्रात अस्थिर सरकार राहू नये यासाठी सरकारच्या बाजूने मतदान करणार की राष्ट्रवादीचे आमदार अनुपस्थित राहणार हे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सांगितले नाही. मतदानाच्या दिवशी वास्तवाचे भान ठेवून निर्णय घेतला जाईल, असे  ते म्हणाले.
ज्या भाजपाला आपण जातीयवादी पक्ष म्हणून हिणवले त्यांनाच मदत करणार का, भाजपा आजही आपल्यासाठी जातीयवादी पक्ष आहे का, या पत्रकारांच्या प्रश्नात पवार म्हणाले की, सरकारला काही दिवस काम करू द्या. त्यांनी जातीयवादी भूमिका घेतली तर आर.आर. पाटील सभागृहात त्यांना जाब विचारतील. आताच्या परिस्थितीत प्रशासन आणि राज्याच्या अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने पुन्हा निवडणूक होणो परवडणारे नाही. त्यामुळे आम्ही हे सरकार अस्थिर होऊ देणार नाही. प्रभावी विरोधी पक्ष म्हणून आमची भूमिका राहीलच. भाजपाने आम्हाला पाठिंबा मागितलेला नव्हता. आम्ही पक्षात सामूहिकरीत्या विवेकी निर्णय घेतला. राष्ट्रवादीच्या काही माजी मंत्र्यांच्या भ्रष्टाचाराची चौकशी होऊ नये म्हणून आपण पाठिंबा देत आहात का, या प्रश्नात ते म्हणाले की, तसे काहीही नाही. केंद्रात आणि राज्यात भाजपाचे सरकार आहे. त्यांनी खुशाल चौकशी करावी, अगदी खोलात जाऊन करावी, तो त्यांचा अधिकार आहे. आमची काहीही हरकत नाही. (विशेष प्रतिनिधी)
 
1‘आपण जे बोलता त्याच्या उलट करता असे आपल्याबाबत बोलले जाते. सरकारचा पाठिंबा पाच वर्षासाठी असेल का? या प्रश्नावर पत्रपरिषदेत एकच हशा पिकला. त्यावर हसत हसत दाद देत पवार यांनी, ‘सरकार पाच वर्षे टिकेल,’ असे मी कुठेही म्हटलेले नाही, असा गुगली टाकला.
2अध्यक्षपदासाठी दोन उमेदवार उभे राहिले तर तुम्ही कोणाला मतदान करणार, या प्रश्नात ते म्हणाले की, उमेदवार बघून ठरवू. नाहीतर नोटाचा पर्याय आहे आमच्याकडे. अध्यक्षपदासाठी राष्ट्रवादीचा उमेदवार नसेल.
3सरकार चालविणो ही एक कला आहे. अटलबिहारी वाजपेयी यांना ती साधली होती. राममंदिरासारखे मुद्दे त्यांनी बाजूला ठेवले होते. तसे या राज्य सरकारने अडचणीचे मुद्दे बाजूला ठेवले तर सरकार नीट चालेल, असे पवार यांनी सूचित केले.