शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

भाजपा सरकारला शरदाचे चांदणो

By admin | Updated: November 11, 2014 01:38 IST

महाराष्ट्रात अस्थिर सरकार राहू नये यासाठी सरकारच्या बाजूने मतदान करणार की राष्ट्रवादीचे आमदार अनुपस्थित राहणार हे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सांगितले नाही.

 बचावासाठी पवार सरसावले : वास्तवाचे भान ठेवून राष्ट्रवादी आमदारांचे मतदान

मुंबई : महाराष्ट्रात अस्थिर सरकार राहू नये यासाठी सरकारच्या बाजूने मतदान करणार की राष्ट्रवादीचे आमदार अनुपस्थित राहणार हे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सांगितले नाही. मतदानाच्या दिवशी वास्तवाचे भान ठेवून निर्णय घेतला जाईल, असे  ते म्हणाले.
ज्या भाजपाला आपण जातीयवादी पक्ष म्हणून हिणवले त्यांनाच मदत करणार का, भाजपा आजही आपल्यासाठी जातीयवादी पक्ष आहे का, या पत्रकारांच्या प्रश्नात पवार म्हणाले की, सरकारला काही दिवस काम करू द्या. त्यांनी जातीयवादी भूमिका घेतली तर आर.आर. पाटील सभागृहात त्यांना जाब विचारतील. आताच्या परिस्थितीत प्रशासन आणि राज्याच्या अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने पुन्हा निवडणूक होणो परवडणारे नाही. त्यामुळे आम्ही हे सरकार अस्थिर होऊ देणार नाही. प्रभावी विरोधी पक्ष म्हणून आमची भूमिका राहीलच. भाजपाने आम्हाला पाठिंबा मागितलेला नव्हता. आम्ही पक्षात सामूहिकरीत्या विवेकी निर्णय घेतला. राष्ट्रवादीच्या काही माजी मंत्र्यांच्या भ्रष्टाचाराची चौकशी होऊ नये म्हणून आपण पाठिंबा देत आहात का, या प्रश्नात ते म्हणाले की, तसे काहीही नाही. केंद्रात आणि राज्यात भाजपाचे सरकार आहे. त्यांनी खुशाल चौकशी करावी, अगदी खोलात जाऊन करावी, तो त्यांचा अधिकार आहे. आमची काहीही हरकत नाही. (विशेष प्रतिनिधी)
 
1‘आपण जे बोलता त्याच्या उलट करता असे आपल्याबाबत बोलले जाते. सरकारचा पाठिंबा पाच वर्षासाठी असेल का? या प्रश्नावर पत्रपरिषदेत एकच हशा पिकला. त्यावर हसत हसत दाद देत पवार यांनी, ‘सरकार पाच वर्षे टिकेल,’ असे मी कुठेही म्हटलेले नाही, असा गुगली टाकला.
2अध्यक्षपदासाठी दोन उमेदवार उभे राहिले तर तुम्ही कोणाला मतदान करणार, या प्रश्नात ते म्हणाले की, उमेदवार बघून ठरवू. नाहीतर नोटाचा पर्याय आहे आमच्याकडे. अध्यक्षपदासाठी राष्ट्रवादीचा उमेदवार नसेल.
3सरकार चालविणो ही एक कला आहे. अटलबिहारी वाजपेयी यांना ती साधली होती. राममंदिरासारखे मुद्दे त्यांनी बाजूला ठेवले होते. तसे या राज्य सरकारने अडचणीचे मुद्दे बाजूला ठेवले तर सरकार नीट चालेल, असे पवार यांनी सूचित केले.