शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

बीटी कापसावर शेंद्री बोंड अळीचे आक्रमण!

By admin | Updated: August 20, 2016 16:36 IST

विदर्भात यावर्षी पिकांना पोषक पाऊस झाल्याने सर्वत्र पिके बहरली आहेत; परंतु किडींना पोषक वातावरण निर्माण झाल्याने बीटी कापसावर गुलाबी बोंड अळीनंतर शेंद्री बोंड अळीने आक्रमण केले आहे

राजरत्न सिरसाट
ऑनलाइन लोकमत
अकोला, दि. २० -  विदर्भात यावर्षी पिकांना पोषक पाऊस झाल्याने सर्वत्र पिके बहरली आहेत; परंतु किडींना पोषक वातावरण निर्माण झाल्याने बीटी कापसावर गुलाबी बोंड अळीनंतर शेंद्री बोंड अळीने आक्रमण केले आहे. सोयबाीनवरही खोडकिडीने हल्ला केल्याने शेतकºयांसमोर हे नवे अस्मानी संकट उभे ठाकले आहे.
 
 विदर्भात पुरक मुरतोनी पाऊस झाल्याने  सर्वच पिके बहरली आहेत; परंतु किडींना पोषक वातावरण तयार झाल्याने पिकांवर वेगवेगळ्या किडींनी हल्ला केला आहे.  खरीप कापसावर तुडतुडे व गुलाबी बोंडअळीने प्रादुर्भाव झाला होता आता शेंद्री बोंडअळीले आक्रमण केले आहे.  सोयाबीनवर हिरव्या उंटअळी, खोंडकींची प्रादुर्भाव वाढला आहे. डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या पीक संरक्षण अधिकाºयांनी विदर्भात कापसाचे सर्वेक्षण केले आहे. या सर्वेक्षणात तज्ज्ञ चमुला  अकोला,बुलडाणा व यवतमाळ या प्रमुख कापूस उत्पादक जिल्हयामध्ये बीटी कापसावर बोंडअळ््यांचा प्रादुर्भाव दिसून आला आहे. बीटी कापसाचा बेसुमार वापर आणि नॉन बीटीची (रेफ्यूजी बीटी) पेरणी न केल्याने बीटी कापसाला न जुमानणाºया बोंड अळ््यांच्या पिढ्या निर्माण होत आहेत.
बीटी कापसामध्ये बोंडअळीला प्रतिबंधक जीन्स असल्याने शेतकरी बीटी कापूस पेरणीचा पर्यांय निवडतो म्हणून, एकूण कापसाच्या पेरणीपैकी जवळपास ९० टक्के क्षेत्रावर बीटी कापसाची पेरणी शेतकºयांनी केली आहे. पंरतु बोंडअळ््याचा वाढता प्रभाव बघता देशात कापसाचे क्षेत्र यावर्षी कमी झाले आहे.
 
- कशी ओळखावी बोंडअळी?
गुलाबी बोंडअळीचा पतंग लहान व गर्द बदामी रंगाचा असतो.त्याच्या पंखावर बारीक काळे ठिपके असतात. सुरूवातीला अंड्यातून निघणारी ही अळी पांढूरकी असते नंतर ती गुलाबी होते. वाढलेली अळीचा लांबी १८ ते १९ मि.मी.असते. यालाच गुलाबी किंवा शेंदरी बोंडअळी म्हणतात. या बोंडअळीचा प्रादुर्भाव आॅक्टोबरवच्या पहिल्या आठवड्यापासून कापसाच्या हिरव्या बोंडात होतो. पण यावर्षी लकवरच हा प्रादुर्भाव झाला आहे. 
- कापसाचे मोठ्याप्रमाणावर होते नुकसान 
अंड्यातून बाहेर पडलेली अळी कापसाच्या बोंडात शिरल्यांनतर छिद्र बंद होत असल्याने बोंडाचे वरू न निरीक्षण केल्यास या अळीचा प्रादुर्भाव दिसून येत नाही.पंरतु हिरवी बोंडे फोडून बघितल्यास प्रादुर्भाव झालेला दिसतो.ही बोंडे परिपक्व न होताच उमलतात. त्यामुळे ्रकपाशीची प्रत बिघडते.बोंडातील अळ््यर सरकी खातात,रू ईची प्रत कमी होते. तेलाचे प्रमाण घटते आणि बियाण्याची उगवणशक्ती कमी होते.
- शेंद्री अळीचा प्रादुर्भाव आढळून आाल्याने शेतकºयांनी शेतकºयांनी पिकांचे नियमित सर्वेक्षण करणे गरजेचे असून, नत्र खताचा बेसुमार वापर टाळावा,कापसाच्या डोमकळ््या शोधून अळीसह नष्ट कराव्यात व कृषी विद्यापीठाने केलेल्या शिफारशीनुसार फवारणी करावी.
- डॉ.डी.बी.उंदीरवाडे, विभाग प्रमुख, -डॉ. अनिल कोल्हे, मुख्य पीक संरक्षण अधिकारी, किटकशास्त्र विभाग, डॉ.पंदेकृवि,अकोला.