शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरे एक्शन मोडवर! मनपा निवडणुकीपूर्वी शाखा भेटींवर जोर; २ दिवस मुंबई शहर पिंजून काढणार
2
राज आणि उद्धव ठाकरे मुंबईतील 'या' ११३ जागांवर विशेष लक्ष देणार, जागावाटपात ‘MaMu’ फॉर्म्युला वापरणार  
3
सातारा ड्रग्ज प्रकरणात CM फडणवीसांची पहिली मोठी प्रतिक्रिया; म्हणाले, “पोलिसांचे अभिनंदन करतो की…”
4
बाजारात पुन्हा 'बुल्स'चे पुनरागमन! सलग ४ दिवसांच्या घसरणीला ब्रेक; 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर्स
5
Viral Video: धैर्य आणि प्रसंगावधान! अचानक केसांनी पेट घेतला तरी शाळकरी मुलगी डगमगली नाही...
6
"कुठेही लिहिलेलं नाही की, काळे कपडे घालून...!", भाजप नीतीश कुमारांच्या पाठीशी; हिजाबवर बंदी घातली जाणार?
7
Winter Special: १० मिनिटात तयार होणारी तीळ शेंगदाण्याची पौष्टिक आणि रुचकर वडी; पाहा रेसिपी 
8
Jara Hatke: टक्कल पडू नये म्हणून 'या' मंदिरात देवाला अर्पण करतात केसांची बट
9
"चांगली कामगिरी करुनही टीम इंडियात निवड होत नसेल तर..." ईशान किशनने बोलून दाखवली मनातली गोष्ट
10
याला म्हणतात 'धुरंधर'...! या ₹2 च्या शेअरनं गुंतवणूकदारांचं नशीबच बदललं, 5 वर्षांत दिला 19000% चा परतावा
11
विमानतळ क्षेत्रात अदानींची 'उंच झेप'! ११ नवीन विमानतळांसाठी लावणार बोली; IPO कधी येणार?
12
Viral Video: पाच वर्षाच्या चिमुकल्याला फुटबॉलप्रमाणे उडवलं, शेजाऱ्याचं अमानुष कृत्य, घटना कॅमेऱ्यात कैद!
13
Sonam Raghuvanshi : नवा ट्विस्ट! "मी राजाला मारलं नाही, राज माझा भाऊ..."; जामीन अर्जात काय म्हणाली सोनम रघुवंशी?
14
ठरले! अखेर मनसे आता महाविकास आघाडीसोबत निवडणूक लढवणार; काँग्रेस नेत्यांनीच केली मोठी घोषणा
15
Kapil Dev On Gautam Gambhir : गौतम गंभीर कोच नव्हे मॅनेजर! कपिल देव यांनी संदर्भासह दिलं स्पष्टीकरण
16
डंकी रुट प्रकरणात ED ची मोठी कारवाई; 6 KG सोने, 313 KG चांदी अन् ₹4.62 कोटी जप्त
17
‘अर्ज, विनंती करून थकलो, आता शेतात जाण्यासाठी हेलिकॉप्टर द्या’, शेतकऱ्याचं थेट मुख्यमंत्र्यांना पत्र
18
भाजप म्हणतो, ५० जागा सोडूनच बोला! मविआतील घटक पक्षांना एकमेकांच्या हाकेची प्रतिक्षा!
19
“नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव द्या, दुसरे कोणतेही नाव चालणार नाही”: सपकाळ
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दरात घसरण; पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेट सोन्याचे दर
Daily Top 2Weekly Top 5

शंकरराव तोरस्कर यांची १०७ वे हुतात्मा म्हणून नोंद

By admin | Updated: January 22, 2016 01:04 IST

५९ वर्षांनंतर शासनाकडून दखल : नातू संजय तोरस्कर यांच्या प्रयत्नांना यश; महाराष्ट्र निर्मितीच्या चळवळीतील पश्चिम महाराष्ट्रातील पहिले हुतात्मा

कोल्हापूर : महाराष्ट्र शासनाने सन २०११ मध्ये महाराष्ट्र राज्य निर्मितीच्या चळवळीतील हुतात्म्यांची यादी जाहीर केली होती. त्यात या आंदोलनात पश्चिम महाराष्ट्रातील पहिले बलिदान देणारे कोल्हापूरचे शंकरराव तोरस्कर यांचे नाव यादीत नव्हते. त्यांच्या नातेवाइकांनी याबाबत लढा देत राज्य शासनाच्या विविध खात्यांकडे अर्ज-विनंत्या व पुरावे सादर केले. त्यांच्या कष्टाला अखेर यश आले. १३ जानेवारी २०१६ रोजी राज्य शासनाने १०७ वे हुतात्मा म्हणून शंकरराव तोरस्कर यांच्या नावाची नोंद केल्याची माहिती नातू संजय तोरस्कर यांनी दिली. कोल्हापूरचे शंकरराव तोरस्कर महाराष्ट्र राज्य निर्मितीच्या चळवळीत अग्रभागी होते. १८ जानेवारी १९५६ रोजी बिंदू चौक येथे झालेल्या सभेत शंकरराव पोलिसांच्या गोळीने, बंदुकीच्या संगीनीने जखमी झाले. त्यातच त्यांचा सात दिवसांत मृत्यू झाला. तशी ही घटना ५० वर्षांहून अधिक काळाची होती. तिचे पुरावे मिळविणे तसे कुटुंबीयांना अवघड काम होते. तरीही त्यांच्यासमवेत त्यावेळी असणारे ज्येष्ठ नेते प्रा. डॉ. एन. डी. पाटील, माजी आमदार बाबूराव धारवाडे, पैलवान नारायण जाधव यांनी स्वत: येऊन जिल्हाधिकारी कार्यालयात जबाब नोंदविले. त्याचबरोबर महानगरपालिका, सीपीआर, जिल्हा पोलीसप्रमुख कार्यालय, पुराभिलेखागार, जिल्हाधिकारी कार्यालय, मुंबई मंत्रालय येथे पाठपुरावा केला. तीन वर्षांच्या अखंड पाठपुराव्यानंतर अखेर शासनाने १०७ वे हुतात्मा म्हणून असाधारण राजपत्रात त्यांची नोंद घेतली. याबाबतचे पत्र सामान्य प्रशासन विभागाकडून १३ जानेवारीला तोरस्कर कुटुंबीयांना प्राप्त झाले. यावेळी अ‍ॅड. शाहू काटकर, आप्पासाहेब जाधव, रमेश पोवार, स्वाती तोरस्कर, आदी उपस्थित होते.गोळी लागूनही थांबले नाहीत शंकरराव !सन १९५६ मध्ये संयुक्त महाराष्ट्रातून मुंबई गुजरातला जोडण्याचा घाट काही नेतेमंडळींनी घातला होता. त्याच्या निषेर्धात १७ जानेवारी १९५६ मध्ये बेळगाव येथे संयुक्त महाराष्ट्र राहिलाच पाहिजे. मुंबई महाराष्ट्रातून तोडू नये, याकरीता मोठे आंदोलन झाले. या आंदोलनात पोलिसांनी लाठीमार आणि गोळीबार केला. त्यात अनेक आंदोलकांना आपला जीव गमावावा लागला. त्याचा निषेध म्हणून कोल्हापुरातील बिंदू चौक येथे १८ जानेवारी १९५६ रोजी भाई माधवराव बागल यांच्या नेतृत्वाखाली कोल्हापुरातील तालीम, मंडळे येथील कार्यकर्त्यांची निषेध सभा झाली. या सभेसाठी जुना बुधवार पेठ तालीम येथील तरुणही सहभागी झाले होते. त्यात शंकरराव तोरस्कर हा २१ वर्षाचा अविवाहित तरुणही सहभागी झाला होता. त्यावेळी सरकारने निषेध सभा, एकत्रित जमण्यास मज्जाव करत संचारबंदी जाहीर केली होती. सभा सुरू झाली आणि पोलिसांचा प्रथम लाठीमार व नंतर गोळीबार झाला. पोलिसांनी जमाव नियंत्रणात येत नाही, असे दिसताच गोळीबार करण्यास सुरुवात केली. त्यात अनेकजण सैरावैरा धावू लागले. मात्र, शंकरराव तोरस्कर हे व्यासपीठाकडे धावले. यावेळी त्यांना डाव्या खांद्यात गोळी लागली. गोळी लागूनही हा तरुण थांबत नाही म्हटल्यावर एका पोलिसाने त्यांच्या पोटात संगीन घुसवली. त्यात जखमी होऊन ते खाली पडले. जखमी शंकररावांना नारायण जाधव, प्रा. एन. डी. पाटील, माजी आमदार बाबूराव धारवाडे आदींनी त्यावेळच्या थोरल्या दवाखान्यात (सीपीआर)मध्ये दाखल केले. १८ ते २४ जानेवारीअखेर त्यांच्यावर डॉक्टरांनी उपचार केले. अखेर २५ जानेवारीला सायंकाळी साडेसहा वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या नावाने गेली कित्येक वर्षे बुधवार पेठेतील चौकाला ‘हुतात्मा तोरस्कर चौक’ म्हणून ओळखले जातेहौतात्म्य जाहीर करून शासनाने त्यांच्या लढ्याला एकप्रकारे न्याय दिला. आमच्या काकांना मरणोत्तर न्याय मिळावा व त्यांना हुतात्मा म्हणून गौरविण्यात यावे, याकरिता आम्ही तोरस्कर कुटुंबीय गेले चार वर्षांपासून फेऱ्या मारत होतो. शासनाने मागितले तितके पुरावे दिले. त्यात सन २०१२ मंत्रालय जळाले. त्यात आमची फाईलही जळाली. आम्ही मात्र न खचता पुन्हा सर्व पुरावे दिले. - संजय तोरस्कर, हुतात्मा तोरस्कर यांचे पुतणे