शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

शनीचा तिढा, सरकारी पिडा

By admin | Updated: January 28, 2016 03:49 IST

शनी चौथऱ्यावर जाऊन दर्शन घेण्यावरून निर्माण झालेला तिढा सोडविण्यासाठी आता सरकारनेच पुढाकार घ्यावा, असे सांगत शनैश्वर देवस्थानने आपल्या पुढ्यातील चेंडू सरकार

अहमदनगर/पुणे : शनी चौथऱ्यावर जाऊन दर्शन घेण्यावरून निर्माण झालेला तिढा सोडविण्यासाठी आता सरकारनेच पुढाकार घ्यावा, असे सांगत शनैश्वर देवस्थानने आपल्या पुढ्यातील चेंडू सरकार दरबारी टोलविला. त्यामुळे कालपर्यंत जिल्हा प्रशासन आणि देवस्थानच्या माध्यमातून ही ‘पिडा’ परस्पर मार्गी लावण्याच्या प्रयत्नात असलेल्या सरकारला सर्वमान्य तोडग्यासाठी बरेच तेल गाळावे लागणार असे दिसते.शनी चौथरा चढण्यासाठी भूमाता ब्रिगेडच्या शेकडो महिलांनी तृप्ती देसाई यांच्या नेतृत्वाखाली मंगळवारी, प्रजासत्ताकदिनी शनी शिंगणापूरकडे कूच केली होती. मात्र, पोलिसांनी त्यांना नगर जिल्ह्याच्या सीमेवर सुपा येथेच रोखले. शिंगणापूरकडे जाऊ न देता या आंदोलकांना सायंकाळी पुन्हा पुणे हद्दीत पाठविण्यात आले. या आंदोलनाचा अहवाल मुख्यमंत्र्यांनी बुधवारी मागविला आहे़ शनी चौथऱ्यावर महिलांना प्रवेश देण्याच्या मागणीमुळे उपस्थित झालेल्या वादावर प्रतिक्रिया व्यक्त करताना मुख्यमंत्र्यांनी ‘स्त्री-पुरुष भेदभाव करू नये, वाद मिटविण्यासाठी जिल्हा प्रशासन व देवस्थानने पुढाकार घ्यावा,’ असा सल्ला देवस्थानला दिला होता. त्यावर देवस्थानने आपली भूमिका बुधवारी माध्यमांसमोर मांडली़ मुख्यमंत्र्यांनी केलेल्या सूचनेचा आम्ही आदर करतो़ ही परंपरा गेल्या अनेक वर्षांची आहे़ ती खंडित करणे एवढ्या सहजासहजी शक्य नाही़ यासंदर्भात सरकार, प्रशासन, धर्मगुरु आणि देवस्थानच्या विश्वस्तांची एकत्रित बैठक घेऊन चर्चा करावी़ सर्वांगीण चर्चा करून यावर सन्माननीय तोडगा काढावा, तो आम्हाला मान्य राहिल़ पण, अशा पध्दतीने कुणी रुढी आणि परंपरा मोडीत काढण्याचा प्रयत्न करत असेल तर त्यांच्याविरोधात गावकरी एकजुटीने रस्त्यावर उतरतील, असा इशारा देवस्थानच्या वतीने विश्वस्त योगेश बानकर यांनी दिला़आखाडा परिषदही उतरलीशनी दर्शनावरून उद्भवलेल्या या वादात आता अखिल भारतीय आखाडा परिषदही उतरली आहे. कोणत्याही मंदिरात महिलांना प्रवेश बंदी असू नये. मंदिरांमध्ये महिला आणि पुरुषांना समान वागणूक दिली पाहिजे, अशी भूमिका आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत नरेंद्रगिरी यांनी मांडली आहे. रविशंकर यांचेही समर्थन... शनी चौथऱ्यावर प्रवेशासाठी आंदोलन करणाऱ्या महिलांना अध्यात्मिक गुरू श्री श्री रविशंकर यांनी पाठिंबा दिला आहे. महिलांनी दर्शन घेऊ नये, असे हिंदू शास्त्रात कुठेही म्हटलेले नाही. उलट महिलांनी पूजाअर्चा केल्यास देवाला आनंदच होईल, असे त्यांनी म्हटले.भूमाता ब्रिगेडचा दावामहिलांना शनिशिंगणापूर येथील शनीचे दर्शन घेता यावे यासाठी भूमाता रणरागिणी ब्रिगेडने घेतलेल्या भूमिकेस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाठिंबा दिला असल्याचा दावा ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांनी पत्रकारांशी बोलताना केला. मुख्यमंत्री पुण्यात एका कार्यक्रमासाठी आले असता तृप्ती देसाई यांनी गर्दीतच फडणवीस यांना शनिशिंगणापूर येथील चौथऱ्यावर महिलांना जाण्याची परवानगी मिळावी, असे निवेदन दिले.