शहरं
Join us  
Trending Stories
1
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
2
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
3
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
4
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
5
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
6
दुकानदाराच्या डोळ्यात मिरची पूड टाकून ५० हजार रुपये लुटले, संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद!
7
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
8
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
9
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
10
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
11
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
12
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
13
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
14
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
15
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
16
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
17
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
18
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
19
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  

शनिचौथऱ्याचा वाद पुन्हा पेटण्याची चिन्हे

By admin | Updated: January 8, 2016 03:47 IST

शनिशिंगणापूरमध्ये २६ जानेवारीला चौथऱ्यावर चढून धार्मिक प्रथा मोडण्याचा संकल्प ‘भूमाता ब्रिगेड’ने केला आहे. तर, त्यांना रोखण्यासाठी ‘हिंदू जनजागृती समिती’ने पुढाकार घेतला आहे.

अहमदनगर : शनिशिंगणापूरमध्ये २६ जानेवारीला चौथऱ्यावर चढून धार्मिक प्रथा मोडण्याचा संकल्प ‘भूमाता ब्रिगेड’ने केला आहे. तर, त्यांना रोखण्यासाठी ‘हिंदू जनजागृती समिती’ने पुढाकार घेतला आहे. राज्यातील ‘धर्मरक्षण मोहिमे’चा तिथून प्रारंभ करण्यात येणार आहे. त्यामुळे वाद पेटण्याची चिन्हे आहेत.हिंदू जनजागृती समितीचे महाराष्ट्र संघटक सुनील धनवट यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. ते म्हणाले, धार्मिक प्रथांमध्ये हस्तक्षेप करू नये, असा निर्णय कोर्टाने पूर्वीच दिला आहे. याअर्थाने प्रथा मोडणाऱ्यांना घटनाद्रोहीच ठरविले पाहिजे. १९ संघटना राज्यभर धर्मरक्षण मोहीम सुरू करणार आहेत. त्याचा प्रारंभ २६ जानेवारीला शनिशिंगणापूरला होईल, असे ते म्हणाले. (प्रतिनिधी)परिवर्तनाची नांदी - सुळेनाशिक : गेल्या ५३ वर्षांच्या इतिहासात प्रथमच शनिशिंगणापूर विश्वस्तपदी महिलांची झालेली निवड ही महिला सबलीकरण व परिवर्तनाची नांदीच असल्याचे मत राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केले.एका कार्यक्रमानिमित्त येथे आल्या असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्या म्हणाल्या, ‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नेहमी महिलांच्या पाठीशी उभा राहिला आहे. गेल्या दोन वर्षांत घडलेल्या पुरोगामी विचारवंतांच्या हत्या दुर्दैवी आहेत. त्यांच्या तपासाला गती यावी, अशी मागणी आपण केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांना भेटून केली आहे. या प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी स्वत: लक्ष घालून तपासाला गती द्यावी.’