शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
2
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
3
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
4
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
5
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
6
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
7
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
8
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
9
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
10
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
11
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
12
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
13
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
14
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
15
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
16
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
17
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
18
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
19
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."
20
दिवस नाहीत फार, महिंद्रा ही कोणती आणतेय कार? एसयुव्ही प्रेमींमध्ये नाही उरला 'थार'...

शंभू छत्रपतींचे समाधिस्थळ शासनाच्या दृष्टीने अजूनही दुर्लक्षितच

By admin | Updated: June 27, 2016 22:19 IST

छत्रपती शंभूराजांचे चरित्र ज्याप्रमाने दुर्लक्षित राहिले त्याचप्रमाणे श्रीक्षेत्र वढू बुद्रुक (ता. शिरूर) येथील छत्रपती संभाजीमहाराजांचे समाधिस्थळ हे लोकप्रतिनिधी

- सुनील भांडवलकर

कोरेगाव भीमा, दि. २७ - छत्रपती शंभूराजांचे चरित्र ज्याप्रमाने दुर्लक्षित राहिले त्याचप्रमाणे श्रीक्षेत्र वढू बुद्रुक (ता. शिरूर) येथील छत्रपती संभाजीमहाराजांचे समाधिस्थळ हे लोकप्रतिनिधी, प्रशासनाच्या दृष्टीने दुर्लक्षित राहिले आहे. आजही समाधिस्थळ तीर्थक्षेत्र पर्यटन स्थळ ह्यकह्ण वर्गामध्ये असून, शासनाने ते ह्यअह्ण किंवा ह्यबह्ण वर्गात समावेश केला, तर पर्यटन विकास महामंडळाच्या निधीतून समाधिस्थळाचा विकास होणे शक्य होईल.संभाजीमहाराजांच्या मृत्यूनंतर संभाजीराजांची समाधी राणी सईबाई व शाहू महाराजांनी शोधून काढली. दगडी समाधी बनविण्यात आली. परंतु इंग्रजी राजवटीत पुन्हा समाधी दुर्लक्षित झाली. त्यानंतर इतिहासकार कै. वा. सी. बेंद्रे यांनी समाधी शोधून काढल्यानंतर समाधीचे बांधकाम करण्यात आले. ३ मे १९७६ रोजी महाराष्ट्रातील शंभुभक्तांचे आराध्य दैवत शंभू छत्रपतींचा जगातील पहिल्या पूर्णाकृती पुतळ्याचे भूमिपूजन शरद पवार यांच्या हस्ते व १७ डिसेंबर १९६७ साली पुतळ्याचे अनावरण मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते व कामगार व पुनर्वसन मंत्री शंकरराव पाटील, दत्तो वामन पोतदार, प्रा. शिवाजीराव भोसले, बाप्पुसाहेब थिटे, गो. ना. वाघ यांच्या उपस्थितीत श्रीक्षेत्र वढू बुद्रुक येथे बसवण्यात आला.वढू बुद्रुक ग्रामपंचायत, धर्मवीर संभाजीमहाराज स्मृती समिती यांच्या माध्यमातून समाधिस्थळाचा विकास होत आहे. त्यातच आता आमदार बाबूराव पाचर्णे यांच्या आमदार ह्यआदर्शग्रामह्णमध्ये सहभागी झाल्याने या स्थळाचा विकास झपाट्याने होण्यास मदत होणार आहे.समाधिस्थळ व बलिदान स्थळास जोडणार पूल गरजेचा...छत्रपती संभाजीमहाराजांच्या समाधिस्थळावर शंभूशिल्पसृष्टी, गार्डन, पार्किंग व्यवस्थेबरोबरच समाधिस्थळ वढू बुद्रुक व बलिदान स्थळ तुळापूर ही दोन्ही ठिकाणे शंभूराजांच्या पदस्पर्शाने पावन झाली असल्याने वढू-तुळापूर यांना जोडणाऱ्या पुलाची मागणी शंभूभक्त व वारकऱ्यांची आहे. या पुलाबाबत तत्कालीन विभागीय आयुक्त प्रभाकर देशमुख यांनीही हिरवा कंदील दाखविला होता. शिवरायांप्रमाणे अद्वितीय स्मारक उभारणार...शिवरायांचे राष्ट्रीय स्मारक अरबी समुद्रात उभे राहणार आहे. त्याच धर्तीवर छत्रपती संभाजीमहाराजांचे राष्ट्रीय स्मारक वढू तुळापूरमध्ये उभारण्याचा संकल्प करतानाच यासाठी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून आराखडा तयार करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. तो आराखडा शासनास सादर करण्यात येऊन संभाजीराजांचे अद्वितीय स्मारक उभारणार असल्याचे आमदार बाबूराव पाचर्णे यांनी सांगितले.समाधिस्थळाची सुरक्षा रामभरोसे...छत्रपती संभाजीमहाराज समाधिस्थळावर सीसीटीव्ही यंत्रणा व कायमस्वरूपी सुरक्षारक्षक नाही. त्यामुळे येथील सुरक्षा रामभरोसे असल्याचे चित्र पाहण्यास मिळत आहे. समाधिस्थळावर सुरक्षारक्षक किंवा पोलीस कर्मचारी तैनात ठेवण्याची अनेक वर्षांची मागणी आहे. या ठिकाणी खासगी कारखान्यांमार्फत सुरक्षारक्षक ठेवण्याची तयारी दर्शवली होती. परंतु त्यावर अद्याप कोणतीच कार्यवाही झाली नाही. पोलीस निरीक्षक श्रीकांत कंकाळ यांनी औद्योगिक कारखान्यांची पुन्हा बैठक घेऊन याठिकाणी सुरक्षारक्षक व सीसीटीव्ही बसवण्यासाठी पुढाकार घेण्याची मागणी होत आहे.