शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
2
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
3
मोठी बातमी! कबड्डी खेळाडू राणा बलाचौरिया यांच्या हत्येतील आरोपी चकमकीत ठार; दोन पोलिस जखमी
4
टोल नाके दुसरीकडे हलवा...; प्रदूषण कमी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या प्रशासनाला सूचना
5
दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; पिकअपला आग लागल्याने ३ जणांचा होरपळून मृत्यू
6
ऑनलाइन हेल्थ इन्शुरन्स घेताय? 'या' ५ चुका पडतील महागात; तुमचा क्लेम नाकारला जाऊ शकतो!
7
'सरन्यायाधीशांवर चप्पलफेक' यासारखे प्रकार परत घडू नयेत म्हणून सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
8
पाण्याच्या एक-एक थेंबासाठी तरसणार पाकिस्तान; भारतानंतर, आता अफगाणिस्तानचाही मोठा निर्णय
9
साताऱ्यातील ११५ कोटींच्या ड्रग्ज प्रकरणात शिंदे कनेक्शन? सुषमा अंधारेंचा उपमुख्यमंत्र्यांच्या भावावर गंभीर आरोप
10
"साताऱ्यातील ड्रग्ज प्रकरणात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे लागेबांधे असल्याने प्रकरण दडपण्याचा प्रयत्न’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा गंभीर आरोप 
11
मोदी सरकार नववर्षाला गोड भेट देणार! १ जानेवारीपासून सीएनजी आणि पीएनजी स्वस्त होणार
12
कुठल्याही क्षणी अटकेची शक्यता असताना माणिकराव कोकाटे पडले आजारी; लीलावती रुग्णालयात दाखल
13
वाल्मीक कराडला जामीन नाकारला; संतोष देशमुख हत्या प्रकरणात खंडपीठाचा मोठा निकाल
14
Motorola: ६.८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP सेल्फी कॅमेरा आणि बरेच काही; मोटोरोलाचा नवा फोन लॉन्च!
15
भयंकर! लग्नात वाजत होता DJ; १५ वर्षांच्या मुलीला सहन झाला नाही आवाज, हार्ट अटॅकने मृत्यू
16
मार्गशीर्ष शेवटचा गुरुवार २०२५: उंबरठ्यावर करा 'हा' छोटा उपाय; अष्टलक्ष्मीचा मिळेल आशीर्वाद!
17
“किडनी विकावी लागणे शेतकऱ्यांच्या अडचणींची परीसीमा, अतिशय दुर्दैवी”; सुप्रिया सुळेंची टीका
18
'आता निष्पक्ष निवडणुका राहिलेल्या नाहीत', राजदचे खासदार मनोज कुमार झा स्पष्टच बोलले
19
बाजारात सलग तिसऱ्या दिवशी घसरण! टाटा समुहाच्या 'या' कंपनीला सर्वाधिक फटका, IT सेक्टरचा आधार
20
ICC T20 Rankings : तिलक वर्माची उंच उडी! बटलरसह पाकिस्तानच्या साहिबजादा फरहानला फटका
Daily Top 2Weekly Top 5

‘शकुंतले’चे भवितव्य मुख्यमंत्र्यांच्या हाती!

By admin | Updated: November 2, 2016 04:49 IST

११६ वर्षे धावून थकलेली शकुंतला नॅरोगेज रेल्वे २,१४७.४४ कोटी रुपये खर्चून ब्रॉडगेज करण्याचा प्रस्ताव रेल्वे मंत्रालयाने मंजूर केला

गणेश वासनिक,

अमरावती- अचलपूर ते यवतमाळदरम्यान गेली तब्बल ११६ वर्षे धावून थकलेली शकुंतला नॅरोगेज रेल्वे २,१४७.४४ कोटी रुपये खर्चून ब्रॉडगेज करण्याचा प्रस्ताव रेल्वे मंत्रालयाने मंजूर केला आहे; मात्र त्याकरिता राज्य शासनाला खर्चाचा निम्मा भार उचलावा लागणार आहे. त्यामुळे याबाबत मुख्यमंत्री काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी ‘अचलपूर- यवतमाळ’ ब्रॉडगेजला यापूर्वीच मंजुरी दिली आहे. विदर्भातील प्रवाशांची वर्षांनुवर्षांपासूनची मागणी त्यानिमित्ताने पूर्णत्वास आली आहे. परंतु हा रेल्वे मार्ग ब्रॉडगेज करण्यासाठी राज्य शासनाला ५० टक्के निधी केंद्र सरकारला द्यावा लागणार आहे. ‘शकुंतले’ला पुनरुज्जीवित करण्यासाठी अचलपूर- यवतमाळ रेल्वेमार्गाचे ब्रॉडगेजमध्ये रुपांतर करण्याचा विषय अमरावतीचे खा. आनंदराव अडसूळ यांनी खासदारांच्या पिटीशन कमिटीत मंजूर करुन घेतला होता. त्यानंतर खासदारांच्या पीटीशन कमिटीने अचलपूर- यवतमाळ रेल्वे मार्गाचे ब्रॉडगेज करण्यात यावे, असे पत्र रेल्वे मंत्रालयाला पाठविले होते. त्यानंतर रेल्वे मंत्रालयाने या रेल्वे मार्गाचे ब्रॉडगेजमध्ये रुपांतर करण्यासाठी कामांचे अंदाजपत्रक तयार केले. त्याकरिता लागणाऱ्या खर्चाचा केंद्र व राज्यशासन निम्मा-निम्मा वाटा उचलणार असे ठरविण्यात आले. रेल्वे बोर्डाच्या वित्त विभागाचे सहायक संचालक एम. आनंद क्रिष्णा यांनी २४ आॅगस्ट २०१६ रोजी मुंबई मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापकांना पत्र पाठवून राज्य शासनाकडून निधीचा निम्मा वाटा घेण्याबाबतची कार्यवाही करावी, असे कळविले आहे. राज्य शासनाला तिजोरीतून किमान १०७३ कोटी रुपये द्यावे लागणार आहे. उर्वरित निधी हा केंद्र शासन देईल, अशी माहिती आहे. असे झाल्यास खासगी कंपनीच्या ताब्यात असलेली देशातील बहुधा एकमेव ‘शकुंतला’ ही यापुढे रेल्वेच्या अधिपत्याखाली येईल.>‘शकुंतला’ ब्रिटिशांची देणंअचलपूर-यवतमाळ या मार्गावर धावणारी लेकुरवाळी अशी विदर्भात ओळख असलेली ‘शकुंतला’ ही ‘क्लिक निक्सन’ या ब्रिटिश कंपनीने १९१० मध्ये विदर्भातील कापूस वाहतूक करण्यासाठी सुरू केली होती. अचलपूर- कारंजा- वाशीम- यवतमाळ असा १८८ किमीचा पल्ला गाठते. मात्र नॅरोगेज कालबाह्य झाल्याने ही गाडी काही महिन्यांपासून बंद आहे.>कें द्र व राज्य शासनाच्या समान निधीतून ‘शकुंतला’ जिवंत ठेवली जाणार आहे. अचलपूर- यवतमाळ रेल्वे मार्ग ब्रॉडगेज करण्यासाठी आवश्यक असलेला ५० टक्के निधी राज्य शासनाने द्यावा, यासाठी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठविण्यात आले आहे.- आनंदराव अडसूळ, खासदार, अमरावती