शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
4
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
5
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
6
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
7
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
8
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
9
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
10
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
11
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
12
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
13
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
14
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
15
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
16
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
17
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
18
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
19
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
20
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू

खेर्डा स्थानकावर ‘शकुंतला’चे इंजिन निसटले!

By admin | Updated: May 14, 2017 02:23 IST

डबे थांबल्याने प्रवासी सुखरूप; नादुरूस्तीचा प्रकार वाढला.

कारंजा लाड : ग्रामीण भागातील प्रवाशांची सोय व्हावी, या मूळ उद्देशाने ब्रिटिश राजवटीत सुरू झालेली शकुंतला रेल्वे आजमितीस जुनी जीर्ण झाली असून, तिला नादुरूस्तीचे ग्रहण लागले आहे. १३ मे रोजी याचा पुन्हा एकवेळ प्रत्यय आला. खेर्डा (ता. कारंजा) येथील स्थानकावरून पुढे निघलेल्या या रेल्वेचे इंजिन अचानक जोड उखडल्याने डबे सोडून धावायला लागले. यावेळी सुदैवाने डबे जागीच थांबल्यामुळे कुठलाही अनर्थ घडला नाही. पूर्वी यवतमाळ ते मूर्तिजापूर या मार्गावर प्रवासाची साधने उपलब्ध नव्हती. ही बाब लक्षात घेऊन ब्रिटिशांनी रेल्वे रूळ टाकून शकुंतलेची सुरूवात केली. स्वातंत्र्योत्तर काळात मात्र या रेल्वेच्या देखभाल-दुरूस्तीकडे भारत सरकारचे दुर्लक्ष झाले. तेव्हापासून आजतागायत शकुंतला एकप्रकारे वनवास भोगत आहे. या रेल्वेच्या, रेल्वे रूळाच्या आधुनिकीकरणासाठी एकाही लोकप्रतिनिधीकडून ठोस असा पाठपुरावा अद्याप झालेला नाही. त्यामुळे शकुंतलेचे अस्तित्व संपण्याच्या वाटेवर आहे. १३ मे रोजी सकाळी १0 वाजता ही रेल्वे नित्यनेमाप्रमाणे खेर्डा रेल्वेस्थानकावर पोहोचण्याच्या बेतात असतानाच रेल्वेच्या इंजिनच्या डब्यांसोबतचा जोड अचानकपणे निसटला. त्यामुळे काही अंतरापर्यंत फक्त रेल्वेचे इंजिनच धावले. ही बाब खेर्डा रेल्वे स्थानकावरील प्रवाशांच्या लक्षात येताच त्यांनी आरडाओरड करून घडलेला प्रकार रेल्वेचालकाच्या लक्षात आणून दिल्याने मोठा अनर्थ टळला. काही क्षणानंतर रेल्वेचे डबे थांबल्यामुळे आतमध्ये बसलेल्या प्रवाशांनीदेखील सुटकेचा नि:श्‍वास सोडला. त्यानंतर सदर इंजिन पुन्हा डब्यांना जोडून शंकुतला रेल्वे पुढील मार्गक्रमणाकरिता सज्ज झाली. तथापि, अशा गंभीर प्रकाराची पुनरावृत्ती होऊ नये, अशी अपेक्षा प्रवाशांमधून व्यक्त होत आहे.