शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

खेर्डा स्थानकावर ‘शकुंतला’चे इंजिन निसटले!

By admin | Updated: May 14, 2017 02:23 IST

डबे थांबल्याने प्रवासी सुखरूप; नादुरूस्तीचा प्रकार वाढला.

कारंजा लाड : ग्रामीण भागातील प्रवाशांची सोय व्हावी, या मूळ उद्देशाने ब्रिटिश राजवटीत सुरू झालेली शकुंतला रेल्वे आजमितीस जुनी जीर्ण झाली असून, तिला नादुरूस्तीचे ग्रहण लागले आहे. १३ मे रोजी याचा पुन्हा एकवेळ प्रत्यय आला. खेर्डा (ता. कारंजा) येथील स्थानकावरून पुढे निघलेल्या या रेल्वेचे इंजिन अचानक जोड उखडल्याने डबे सोडून धावायला लागले. यावेळी सुदैवाने डबे जागीच थांबल्यामुळे कुठलाही अनर्थ घडला नाही. पूर्वी यवतमाळ ते मूर्तिजापूर या मार्गावर प्रवासाची साधने उपलब्ध नव्हती. ही बाब लक्षात घेऊन ब्रिटिशांनी रेल्वे रूळ टाकून शकुंतलेची सुरूवात केली. स्वातंत्र्योत्तर काळात मात्र या रेल्वेच्या देखभाल-दुरूस्तीकडे भारत सरकारचे दुर्लक्ष झाले. तेव्हापासून आजतागायत शकुंतला एकप्रकारे वनवास भोगत आहे. या रेल्वेच्या, रेल्वे रूळाच्या आधुनिकीकरणासाठी एकाही लोकप्रतिनिधीकडून ठोस असा पाठपुरावा अद्याप झालेला नाही. त्यामुळे शकुंतलेचे अस्तित्व संपण्याच्या वाटेवर आहे. १३ मे रोजी सकाळी १0 वाजता ही रेल्वे नित्यनेमाप्रमाणे खेर्डा रेल्वेस्थानकावर पोहोचण्याच्या बेतात असतानाच रेल्वेच्या इंजिनच्या डब्यांसोबतचा जोड अचानकपणे निसटला. त्यामुळे काही अंतरापर्यंत फक्त रेल्वेचे इंजिनच धावले. ही बाब खेर्डा रेल्वे स्थानकावरील प्रवाशांच्या लक्षात येताच त्यांनी आरडाओरड करून घडलेला प्रकार रेल्वेचालकाच्या लक्षात आणून दिल्याने मोठा अनर्थ टळला. काही क्षणानंतर रेल्वेचे डबे थांबल्यामुळे आतमध्ये बसलेल्या प्रवाशांनीदेखील सुटकेचा नि:श्‍वास सोडला. त्यानंतर सदर इंजिन पुन्हा डब्यांना जोडून शंकुतला रेल्वे पुढील मार्गक्रमणाकरिता सज्ज झाली. तथापि, अशा गंभीर प्रकाराची पुनरावृत्ती होऊ नये, अशी अपेक्षा प्रवाशांमधून व्यक्त होत आहे.