शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई सेंट्रल स्टेशनचे नाव बदलले जाणार, नवे नाव काय असणार? CM देवेंद्र फडणवीस म्हणाले...
2
हरयाणा,गोव्यासह लडाखला मिळाले नवे राज्यपाल; घोष, गुप्ता आणि गजपती राजू यांची राष्ट्रपतींकडून नियुक्ती
3
IND vs ENG : गौतम गंभीरने Live सामन्यात दिली शिवी; अपशब्द उच्चारतानाचा Video झाला व्हायरल
4
ठाकरे गटाला पुन्हा कोकणात मोठा धक्का; बडे पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा रामराम, भाजपात प्रवेश
5
भारताच्या शेअर बाजारात घसरण, पण पाकिस्तानच्या स्टॉक मार्केटमध्ये तुफान तेजी; १,३५,००० अंकांच्या पार, कारण काय?
6
"पहाटे ४ वाजता उठतो, रात्री ८ ला झोपतो", लेकाची शिस्त पाहून आर माधवनही होतो दंग; म्हणाला...
7
IND vs ENG :दुखापतग्रस्त पंत 'डिफेन्स' करताना फसला! जोफ्रा आर्चरची 'वेदनादायी' गोलंदाजी
8
Viral Video: चक्क माणसासारखं दोन पायावर उभा राहिला बिबट्या; स्वत: बघितल्याशिवाय विश्वास बसणार नाही!
9
"राज ठाकरे मराठीच्या नावावर द्वेष पसरवतात, त्यांच्यावर रासुका लावा’’, मुंबई हायकोर्टातील वकिलांची मागणी  
10
DSP सिराजला इंग्लिश बॅटर बेन डकेटशी पंगा घेणं पडलं महागात! ICC नं फाडलं 'चलान'
11
मुंबई-पुण्यात घरं घेणाऱ्यांसाठी गुडन्यूज! मालमत्ता विक्रीत ३०% घट; 'या' कारणामुळे किमती खाली येणार!
12
भयंकर! कर्ज फेडण्यासाठी, विम्याचे २ कोटी हडपण्यासाठी मित्राची केली हत्या, जिवंत जाळलं अन्...
13
अनिल अग्रवाल याच्या वेदांतानं भाजपला चार पट जास्त देणगी दिली, काँग्रेसच्या देणगीत मोठी घट, रिपोर्टमधून खुलासा
14
एकनाथ शिंदेंना ‘संजय’ लाभदायक नाही? विरोधकांनी कोंडी केली; पक्षाची डोकेदुखी वाढली!
15
Karka Sankranti 2025 : कर्क संक्रांतीला 'या' पाच राशींच्या आयुष्यात होईल मोठे संक्रमण; येतील अच्छे दिन!
16
“एसटीचे कदापि खाजगीकरण होऊ देणार नाही”; परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांनी स्पष्टच सांगितले
17
निमिषा प्रियाची फाशी आता अटळ? ब्लड मनीसाठी ठाम नकार; सुप्रीम कोर्टाने काय म्हटलं?
18
आधी कोट्यवधी रुपयांचे घर पाडले, आता प्रशासन छांगूर बाबाकडून पाडण्याचा खर्च ८ लाख ५५ हजार रुपये वसूल करणार
19
Ahilyanagar: पोलिसांना बघून धरणात मारल्या उड्या, एका चोराचा बुडून मृत्यू, तर दुसरा...
20
Astro Tips: बायपाससारख्या मोठ्या शस्त्रक्रीया होण्यामागे कारणीभूत असते 'ही' ग्रहस्थिती!

खेर्डा स्थानकावर ‘शकुंतला’चे इंजिन निसटले!

By admin | Updated: May 14, 2017 02:23 IST

डबे थांबल्याने प्रवासी सुखरूप; नादुरूस्तीचा प्रकार वाढला.

कारंजा लाड : ग्रामीण भागातील प्रवाशांची सोय व्हावी, या मूळ उद्देशाने ब्रिटिश राजवटीत सुरू झालेली शकुंतला रेल्वे आजमितीस जुनी जीर्ण झाली असून, तिला नादुरूस्तीचे ग्रहण लागले आहे. १३ मे रोजी याचा पुन्हा एकवेळ प्रत्यय आला. खेर्डा (ता. कारंजा) येथील स्थानकावरून पुढे निघलेल्या या रेल्वेचे इंजिन अचानक जोड उखडल्याने डबे सोडून धावायला लागले. यावेळी सुदैवाने डबे जागीच थांबल्यामुळे कुठलाही अनर्थ घडला नाही. पूर्वी यवतमाळ ते मूर्तिजापूर या मार्गावर प्रवासाची साधने उपलब्ध नव्हती. ही बाब लक्षात घेऊन ब्रिटिशांनी रेल्वे रूळ टाकून शकुंतलेची सुरूवात केली. स्वातंत्र्योत्तर काळात मात्र या रेल्वेच्या देखभाल-दुरूस्तीकडे भारत सरकारचे दुर्लक्ष झाले. तेव्हापासून आजतागायत शकुंतला एकप्रकारे वनवास भोगत आहे. या रेल्वेच्या, रेल्वे रूळाच्या आधुनिकीकरणासाठी एकाही लोकप्रतिनिधीकडून ठोस असा पाठपुरावा अद्याप झालेला नाही. त्यामुळे शकुंतलेचे अस्तित्व संपण्याच्या वाटेवर आहे. १३ मे रोजी सकाळी १0 वाजता ही रेल्वे नित्यनेमाप्रमाणे खेर्डा रेल्वेस्थानकावर पोहोचण्याच्या बेतात असतानाच रेल्वेच्या इंजिनच्या डब्यांसोबतचा जोड अचानकपणे निसटला. त्यामुळे काही अंतरापर्यंत फक्त रेल्वेचे इंजिनच धावले. ही बाब खेर्डा रेल्वे स्थानकावरील प्रवाशांच्या लक्षात येताच त्यांनी आरडाओरड करून घडलेला प्रकार रेल्वेचालकाच्या लक्षात आणून दिल्याने मोठा अनर्थ टळला. काही क्षणानंतर रेल्वेचे डबे थांबल्यामुळे आतमध्ये बसलेल्या प्रवाशांनीदेखील सुटकेचा नि:श्‍वास सोडला. त्यानंतर सदर इंजिन पुन्हा डब्यांना जोडून शंकुतला रेल्वे पुढील मार्गक्रमणाकरिता सज्ज झाली. तथापि, अशा गंभीर प्रकाराची पुनरावृत्ती होऊ नये, अशी अपेक्षा प्रवाशांमधून व्यक्त होत आहे.