शहरं
Join us  
Trending Stories
1
"युद्ध थांबवलं नाही तर…’’, भारत-पाकिस्तानमधील संघर्षाचा उल्लेख करत डोनाल्ड ट्रम्प यांचा थायलंड कंबोडियाला इशारा
2
"...मग आम्हाला जगभर कशाला पाठवलं?"; IND vs PAK क्रिकेट शेड्युलवर संतापल्या प्रियंका चतुर्वेदी
3
मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात! कंटेनरचे ब्रेक फेल, अनेक वाहने एकमेकांवर धडकली...
4
IND vs ENG 4th Test Day 4 Stumps : साडे चार तासांत ३७३ चेंडूंचा सामना; KL राहुल-गिल जोडी जमली; पण लढाई अजून नाही संपली!
5
"जर 6 महिन्यांत मर्सिडीज अथवा बीएमडब्ल्यू हवी असेल तर..." सरन्यायाधीश गवई यांचा नव्या वकीलांना सल्ला
6
Asia Cup 2025: 'असं' झालं तर तब्बल तीन वेळा रंगणार IND vs PAK क्रिकेट सामना, जाणून घ्या
7
Shubman Gill Record : गिलनं साधला मोठा डाव! इंग्लंडच्या मैदानात पाक दिग्गजाला 'धोबीपछाड'
8
तेव्हा लोक म्हणाले होते जणू दुसरी ऐश्वर्याच, सलमान खानची ही हिरोईन आता दिसते अशी 
9
एलियन्सचं रहस्यमय अंतराळ यान नोव्हेंबरमध्ये करणार पृथ्वीवर हल्ला, शास्त्रज्ञांना धक्कादायक दावा
10
नवरा बायकोमध्ये तुफान भांडण, पतीच्या डोक्यात घातला हातोडा, हत्येनंतर दार लावलं अन्...
11
Video: बंगळुरूच्या महिला प्रोफेसरचा मराठमोळ्या 'वाजले की बारा' लावणीवर भन्नाट डान्स
12
"आम्ही खूप दुःखी..."; दिराने वहिनीला कुंकू लावलं अन् धबधब्यात घेतली उडी, प्रेमाचा भयंकर शेवट
13
IND vs ENG : जसप्रीत बुमराहचं 'शतक'; मँचेस्टर कसोटीतील न पटण्याजोगी गोष्ट
14
Asia Cup 2025 चे वेळापत्रक जाहीर! भारत पाकिस्तान पुन्हा एकाच गटात, 'या' दिवशी सामना
15
१४,२९८ पुरुषांना 'लाडकी बहीण'चा लाभ; अजित पवार म्हणाले, 'वसूल करणार, नाही दिले तर...'
16
"सरकार ही निरुपयोगी यंत्रणा, चालत्या गाडीला पंक्चर करण्याचं काम..."; नितीन गडकरींनी सुनावलं
17
बिहार निवडणुकीसाठी काँग्रेसची मोर्चेबांधणी, महाराष्ट्रातील या महिला खासदाराकडे सोपवली मोठी जबाबदारी
18
"बंदुकीच्या धाकाने बांगलादेशात ढकलले जातेय...!" बांगली भाषिक मुस्लिमांवरील कारवाईवरून ओवेसी भडकले
19
IND vs ENG : यशस्वीच्या पदरी लाजिरवाणा 'भोपळा'! साई आला अन् तोही फक्त 'दर्शन' देऊन गेला
20
"राहुल गांधींच्या नशिबात कायम माफी मागणे लिहीले आहे"; केंद्रीय कृषीमंत्र्यांनी काँग्रेसला घेरलं, "१० वर्षांनी पुन्हा..."

काळवाडी गाव भीतीच्या छायेत, माळीण पुन्हा उद्भवण्याची शंका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2016 23:54 IST

मृत्यूची टांगती तलवार घेऊन मृत्यूच्या दाढेत वसलेले काळवाडी (जांभोरी) हे गाव आहे.

ऑनलाइन लोकमत

तळेघर, दि. 9 - गावच्या वरच्या बाजूला रौद्ररूप धारण करून उभा असलेला भयानक डोंंगर, तर गावच्या खालच्या बाजूला डिंभे धरणाचे भव्य पाणलोटक्षेत्र व गाव तसेच पाणलोटक्षेत्राच्या मध्यभागी काही वर्षांपूर्वी पडलेली भली अशी मोठी भेग, अशी मृत्यूची टांगती तलवार घेऊन मृत्यूच्या दाढेत वसलेले काळवाडी (जांभोरी) हे गाव आहे. लवकरात लवकर या गावचे पुनर्वसन करण्यात यावे, अशी मागणी येथील स्थानिक ग्रामस्थांकडून होत आहे.आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागातील भीमाशंकर खोऱ्यामध्ये काळवाडी गाव असून, कित्येक वर्षे मृत्यूच्या छायेत वसले आहे. गावच्या वरच्या बाजूला असलेल्या भव्य डोंगरावर सुटलेल्या अवस्थेत मोठमोठाले दगड आहेत. या दगडांना थोडा जरी धक्का लागला तरी गावावर हे दगड कोसळू शकतात. याच काळवाडीच्या खालच्या बाजूला डिंभे धरणाच्या पाणलोट क्षेत्राचे पाणी व काही वर्षांपूर्वी धरण पूर्ण भरल्यानंतर पाण्याच्या दाबामुळे गावच्या खालच्या बाजूला मोठा आवाज होऊन मोठी भेग पडली आहे. अशा परिस्थितीत मृत्यूचा सांगाडा झालेल्या या नैसर्गिक वातावरणामध्ये काळवाडी येथील ग्रामस्थ जीवन जगत आहेत. काळवाडी नं. १ व नं. २ त्याचप्रमाणे शेळकेवस्ती असे मिळून ६० ते ७० घरे असणारे हे गाव आहे. आठ ते दहा दिवसांपासून आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागामध्ये मुसळधार पाऊस पडत आहे. गावातील घराघरांमध्ये पाण्याचा उपळा येऊन बुडबुडे निघाले आहेत, तर या डोंगरावरील सुटलेले दगड खाली येत आहेत. मुसळधार पडणाऱ्या पावसामुळे डोंगराचे पाणी झिरपून या गावातील घरांच्या भिंतीना येऊन दोन-तीन दिवसांमध्ये घरे कोसळण्याचेही प्रकार घडले आहेत. शासनदरबारी कित्येक वर्षे या गावाच्या पुनर्वसनाचे प्रस्तावाचे घोंगडे भिजत पडले आहेत. आमच्यावर एखादी घटना घडून गेल्यानंतर प्रशासन जागे होणार का? सरकारला आम्हा आदिवासी बापड्यांबद्दल केव्हा जाग येणार? असा प्रश्नही काळवाडी ग्रामस्थांना पडत आहे. गतवर्षी शेळकेवस्तीलगत भली मोठी भेग पडली आहे. स्थानिकांनी वारंवार प्रशासनाला याबाबत कळूनही याकडे मात्र प्रशासन व सरकार जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे. याबाबत ह्यलोकमतह्णशी बोलताना ग्रामस्थ चिमा कृष्णा पारधी म्हणाले, ह्यह्यबा आम्ही दगडांकडं पाहतोय. दगड आमच्याकडं पाहत्यात. कधी आमच्यावर घाला करील सांगता येत नाही. रात-दिस झोप नाय. घरामध्ये असलेल्या पेटत्या चुलीमधून पाण्याचं उभड (बुडबुडे) निघालंत. माळीणसारखा केव्हा घाला होईल सांगता येत नाही.ह्णह्ण या गावचे विद्यमान सरपंच संजय केंगले म्हणाले, ह्यह्यया गावाचा पुनर्वसनाचा विषय कित्येक दिवस शासनदरबारी पडून आहे. शासनाने तत्काळ या गावाचे पुनर्वसन करावे. या गावावरील डोंगरालाही भेगा पडल्या असून, घरांवर मोठ्या प्रमाणात ओलावा येत आहे. घटना घडण्यापूर्वी सरकारने याबाबतची काळजी घ्यावी.ह्णह्णया गावामध्ये पावसाच्या दिवसांमध्ये घरामध्ये पाणी निघणे, घरांना तडे जाणे, डोंगरावरील दगड खाली येणे असे प्रकार घडत असतात. तत्काळ या गावाचे स्थलांतर करण्यात यावे, अशी मागणी ग्रामस्थ नामदेव भोकटे, ग्रा. पं. सदस्य सुरेश भवारी, बबन पारधी, सीताराम भोकटे, ढवळा पारधी, सखाराम केंगले, सोमा भोकटे, चंद्रकांत पारधी, पांडुरंग पारधी, रमेश पारधी या ग्रामस्थांनी केली आहे.