शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचं हिंदुत्व अस्सल, फक्त मतांसाठी भगवी शाल घालणारे आम्ही नाहीत"; मुख्यमंत्र्यांचे राज ठाकरेंना सडेतोड उत्तर
2
'या' वाक्यापासून आम्ही एकत्र येण्याची सुरुवात झाली; राज ठाकरेंनी सांगितली 'मनोमिलना'ची कथा
3
स्मार्टफोन, कपडे आणि घरगुती उपकरणांवर सवलतींचा पाऊस; वर्षाच्या शेवटी कुठे आहेत बंपर ऑफर्स
4
युती होताच दाखवलं शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतरच पहिलं भाषण; भाजपनं राज ठाकरेंना डिवचलं
5
रोहितच्या शतकानं मन भरलं नाही! चाहत्याची थेट मुंबईचा कर्णधार शार्दुल ठाकूरला विनंती! आम्हाला...
6
नोकरी गेली तरी भीती नाही, तुमच्या कर्जाचा हप्ता आता विमा कंपनी भरेल; नक्की काय आहे प्रकरण?
7
उल्हासनगरात उद्धव ठाकरेंना मोठा धक्का; कल्याण जिल्हाप्रमुख धनंजय बोडारे यांचा भाजपात प्रवेश
8
"आमचा हिंदुत्ववाद केवळ पूजापद्धतीवर आधारित नाही तर..."; CM फडणवीसांनी ठाकरे बंधूंना सुनावलं
9
मेष वार्षिक राशिभविष्य २०२६: 'आत्मिक शांती' आणि प्रगतीचे वर्ष; आव्हाने पेलून गाठता येणार यशाचे शिखर!
10
प्राजक्ताच्या स्वप्नातील राजकुमार आहे तरी कसा? लग्नासाठी तिची एकच अट; सिंगल राहण्यामागचं खरं कारण समोर
11
जालना महापालिकेत भाजपानं युती न केल्यास सर्व पर्याय खुले; शिंदेसेनेचे आमदार खोतकरांचा इशारा
12
Vijay Hazare Trophy : हिटमॅनचा हिट शो जारी! मुंबईच्या संघाकडून खेळण्यासाठी मैदानात उतरला अन्...
13
३१ डिसेंबरला उघडणार या वर्षाचा अखेरचा आयपीओ; प्राईज बँड ₹९०, पाहा GMP सह अनेक डिटेल्स
14
“१०० टक्के माझ्या वॉर्डातून लढणार, ठाकरे बंधू १३० पेक्षा जास्त जागा जिंकणार”: किशोरी पेडणेकर
15
Tata Nexon EV खरेदी करायची आहे? किती करावं लागेल डाऊनपेमेंट, पाहा EMI चं संपूर्ण गणित
16
कष्टाचं फळ! २६ व्या वर्षी रोज १८ तासांची ड्युटी करून तरुणीने घेतलं तब्बल ७ कोटींचं घर
17
Shiv Sena UBT MNS Alliance: सध्या मुंबईपुरती उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा, जागावाटपावर सस्पेन्स; इतर महापालिकांचे काय?
18
बापरे! करोडपती सरकारी अधिकारी, ६२ कोटींची मालमत्ता, आलिशान फ्लॅट्स अन् रोख रक्कम; तेलंगणा उपपरिवहन आयुक्तांच्या साम्राज्याचे गुपिते उघड
19
"तेव्हा बडव्यांनी घेरलं होतं, मग आता हातमिळवणी कशी?" शेलारांचा राज ठाकरेंना रोखठोक सवाल!
20
Travel : कुठे आहे सांता क्लॉजचे खरेखुरे गाव, जिथे रोजच साजरा होतो ख्रिसमस? तुम्हीही जाऊ शकता फिरायला!
Daily Top 2Weekly Top 5

काळवाडी गाव भीतीच्या छायेत, माळीण पुन्हा उद्भवण्याची शंका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2016 23:54 IST

मृत्यूची टांगती तलवार घेऊन मृत्यूच्या दाढेत वसलेले काळवाडी (जांभोरी) हे गाव आहे.

ऑनलाइन लोकमत

तळेघर, दि. 9 - गावच्या वरच्या बाजूला रौद्ररूप धारण करून उभा असलेला भयानक डोंंगर, तर गावच्या खालच्या बाजूला डिंभे धरणाचे भव्य पाणलोटक्षेत्र व गाव तसेच पाणलोटक्षेत्राच्या मध्यभागी काही वर्षांपूर्वी पडलेली भली अशी मोठी भेग, अशी मृत्यूची टांगती तलवार घेऊन मृत्यूच्या दाढेत वसलेले काळवाडी (जांभोरी) हे गाव आहे. लवकरात लवकर या गावचे पुनर्वसन करण्यात यावे, अशी मागणी येथील स्थानिक ग्रामस्थांकडून होत आहे.आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागातील भीमाशंकर खोऱ्यामध्ये काळवाडी गाव असून, कित्येक वर्षे मृत्यूच्या छायेत वसले आहे. गावच्या वरच्या बाजूला असलेल्या भव्य डोंगरावर सुटलेल्या अवस्थेत मोठमोठाले दगड आहेत. या दगडांना थोडा जरी धक्का लागला तरी गावावर हे दगड कोसळू शकतात. याच काळवाडीच्या खालच्या बाजूला डिंभे धरणाच्या पाणलोट क्षेत्राचे पाणी व काही वर्षांपूर्वी धरण पूर्ण भरल्यानंतर पाण्याच्या दाबामुळे गावच्या खालच्या बाजूला मोठा आवाज होऊन मोठी भेग पडली आहे. अशा परिस्थितीत मृत्यूचा सांगाडा झालेल्या या नैसर्गिक वातावरणामध्ये काळवाडी येथील ग्रामस्थ जीवन जगत आहेत. काळवाडी नं. १ व नं. २ त्याचप्रमाणे शेळकेवस्ती असे मिळून ६० ते ७० घरे असणारे हे गाव आहे. आठ ते दहा दिवसांपासून आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागामध्ये मुसळधार पाऊस पडत आहे. गावातील घराघरांमध्ये पाण्याचा उपळा येऊन बुडबुडे निघाले आहेत, तर या डोंगरावरील सुटलेले दगड खाली येत आहेत. मुसळधार पडणाऱ्या पावसामुळे डोंगराचे पाणी झिरपून या गावातील घरांच्या भिंतीना येऊन दोन-तीन दिवसांमध्ये घरे कोसळण्याचेही प्रकार घडले आहेत. शासनदरबारी कित्येक वर्षे या गावाच्या पुनर्वसनाचे प्रस्तावाचे घोंगडे भिजत पडले आहेत. आमच्यावर एखादी घटना घडून गेल्यानंतर प्रशासन जागे होणार का? सरकारला आम्हा आदिवासी बापड्यांबद्दल केव्हा जाग येणार? असा प्रश्नही काळवाडी ग्रामस्थांना पडत आहे. गतवर्षी शेळकेवस्तीलगत भली मोठी भेग पडली आहे. स्थानिकांनी वारंवार प्रशासनाला याबाबत कळूनही याकडे मात्र प्रशासन व सरकार जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे. याबाबत ह्यलोकमतह्णशी बोलताना ग्रामस्थ चिमा कृष्णा पारधी म्हणाले, ह्यह्यबा आम्ही दगडांकडं पाहतोय. दगड आमच्याकडं पाहत्यात. कधी आमच्यावर घाला करील सांगता येत नाही. रात-दिस झोप नाय. घरामध्ये असलेल्या पेटत्या चुलीमधून पाण्याचं उभड (बुडबुडे) निघालंत. माळीणसारखा केव्हा घाला होईल सांगता येत नाही.ह्णह्ण या गावचे विद्यमान सरपंच संजय केंगले म्हणाले, ह्यह्यया गावाचा पुनर्वसनाचा विषय कित्येक दिवस शासनदरबारी पडून आहे. शासनाने तत्काळ या गावाचे पुनर्वसन करावे. या गावावरील डोंगरालाही भेगा पडल्या असून, घरांवर मोठ्या प्रमाणात ओलावा येत आहे. घटना घडण्यापूर्वी सरकारने याबाबतची काळजी घ्यावी.ह्णह्णया गावामध्ये पावसाच्या दिवसांमध्ये घरामध्ये पाणी निघणे, घरांना तडे जाणे, डोंगरावरील दगड खाली येणे असे प्रकार घडत असतात. तत्काळ या गावाचे स्थलांतर करण्यात यावे, अशी मागणी ग्रामस्थ नामदेव भोकटे, ग्रा. पं. सदस्य सुरेश भवारी, बबन पारधी, सीताराम भोकटे, ढवळा पारधी, सखाराम केंगले, सोमा भोकटे, चंद्रकांत पारधी, पांडुरंग पारधी, रमेश पारधी या ग्रामस्थांनी केली आहे.