शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
2
दहशतवादी कुठून आले, कुठे गेले? करणार तपास; ३ डी मॅपिंगद्वारे शोध; एनआयए प्रमुख सदानंद दाते बैसरन खोऱ्यात
3
‘जीडीपी’त क्रिएटिव्ह इकॉनॉमीचा मोठा वाटा; ॲनिमेशन उद्याेगासाठी यशाचे दार उघडले...
4
सुप्रिया सुळेंनी राज ठाकरेंना विचारले, ट्रिप कशी झाली?
5
विरार-अलिबाग मल्टीमॉडेल कॉरिडॉरची निविदा रद्द होणार; ‘बीओटी’वर आता उभारणी; राज्य सरकारकडे प्रस्ताव
6
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
7
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
8
IPL 2025 : रोहित शर्माचा बॉल बॉयसोबतचा व्हिडिओ होतोय व्हायरल; नेमकं काय घडलं? (VIDEO)
9
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
10
...अन् हिटमॅन रोहितनं युवा बॅटर वैभवला पुन्हा हिमतीनं मैदानात उतरण्यासाठी दिलं बळ
11
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
12
जे रोहित-विराटलाही नाही जमलं ते सूर्या भाऊनं करून दाखवलं; मोडला ११ वर्षांपूर्वीचा विक्रम
13
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
14
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
15
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
16
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
17
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
18
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
19
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
20
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...

सातवा वेतन आयोग देणारच

By admin | Updated: June 15, 2017 04:38 IST

१८ लाख राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग देण्यास सरकारने कधीच नकार दिलेला नाही. आम्ही त्यासाठी तरतूदही केली असून लवकरच त्याबाबतची

- अतुल कुलकर्णी । लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : १८ लाख राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग देण्यास सरकारने कधीच नकार दिलेला नाही. आम्ही त्यासाठी तरतूदही केली असून लवकरच त्याबाबतची घोषणा करण्यात येईल, अशी माहिती वित्त व नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी लोकमतशी बोलताना दिली. विरोधकांनी अफवा पसरवू नयेत, असेही ते म्हणाले.शेतकऱ्यांच्या कर्जमाफीमुळे सातवा वेतन आयोग लांबणीवर टाकण्यात येईल, अशी शक्यता वर्तविण्यात आली होती. विरोधकांनी त्यावरून सरकारला जाब विचारला होता. मुनगंटीवार यांनी ही शक्यता फेटाळून लावत कर्जमाफीप्रमाणेच वेतन आयोगाच्या अंमलबजावणीची तारीख लवकरच जाहीर केली जाईल, असे सांगितले.राज्य सरकारच्या विविध विभागांनी राष्ट्रीयकृत बँकांमध्ये डिपॉझिट म्हणून नेमकी किती रक्कम ठेवली आहे, याची माहिती वित्त विभागाने घेतली असून तब्बल बँकांमधील ठेवींमध्ये १ लाख कोटी रुपये असल्याचे स्पष्ट झाले आहे. नॉन बँकिंग फायनान्स कार्पोरेशन स्थापन करुन त्यात ही रक्कम जमा करण्यात येणार आहे. त्यासाठी रिझर्व्ह बँकेची मान्यता आवश्यक आहे. पीएलए खात्यांची माहिती गोळा करण्याचे काम अंतिम टप्प्यात असून आजपर्यंत ६० हजार कोटींची रक्कम पीएलए खात्यात निघाली आहे, असेही मुनगंटीवार यांनी सांगितले.जीएसटीमुळे राज्याच्या महसुलात घट होणार नसल्याचे सांगून मुनगंटीवार म्हणाले, केंद्राकडून आम्हाला १४ टक्के वाढ देण्याचे मान्य केलेले आहे. त्यामुळे मिळणाऱ्या महसुलात १७ ते १८ हजार कोटी रुपये राज्याला मिळतील. नॉन टॅक्स (करेतर) महसूल ७ ते ८ हजार कोटींनी वाढेल आणि केंद्राकडून जेवढ्या योजनांचा जास्तीत जास्त निधी आणणे शक्य आहे तो आणला जाईल. शासकीय जमिनी विकून सरकार पैसा उभा करणार, हे खरे आहे का, असे विचारले असता मुनगंटीवार म्हणाले, सरकारी जमिनी विकण्याचा प्रश्नच येत नाही. मात्र त्या जागा विकसीत केल्या जातील व त्यातून पैसे उभे केले जातील.अनुत्पादक गोष्टींना कपातकर्जमाफीसाठी पैसा उभा करण्यासाठी विकास कामांना कात्री लावली जाणार नाही; मात्र कोणत्या कामांवर किती खर्च करायचा याचा प्राधान्यक्रम ठरवला जाईल. त्यामुळे काही अनुत्पादक गोष्टींवर कपात लागेल. काही विभागांच्या अनावश्यक खरेदीवर बंधने आणली जातील. विकास दर २ टक्क्यांनी वाढवणारसध्या राज्याचा विकास दर ९.४ टक्के आहे. तो ११.४ टक्क्यांपर्यंत वाढविण्याचा प्रयत्न आहे. जीएसटीनंतर आम्ही २ टक्के विकासदर वाढवू शकलो तर राज्याचे उत्पन्न ४० ते ५० हजार कोटींनी वाढेल, असा दावा अर्थमंत्र्यांनी केला आहे.या आधीच्या सरकारने काही ठिकाणी साडेनऊ टक्के तर काही कर्ज १२ टक्के दराने घेतले आहे. अशा कर्जाचा आकडा १ लाख कोटीच्या घरात आहे. या कर्जांचे व्याजदर कमी करुन घेतले जातील. त्यातून ३ ते ४ हजार कोटी वाचतील.कोणाकडे किती आहेत डिपॉझिट जिल्हा परिषदा१७,०००एमएमआरडीए१६,५००सिडको८,०००बांधकाम बोर्ड६,०००जलसंपदा५,५००एमआयडीसी५,५००