शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन 'सिंदूर'नंतर 'ब्रह्मोस मिसाइल'ची मागणी वाढली, १४-१५ देश रांगा लावून उभे!
2
उड्डाण करताच ब्रिटनमध्ये विमान कोसळले; एअर इंडिया अपघातासारखेच आगीचे लोळ... 
3
आधी हातोड्याने पतीवर वार केले, मग धारदार शस्त्र वापरून संपवून टाकलं! पत्नीचा क्रूरपणा ऐकून हादरून जाल
4
लठ्ठपणाविरोधात सरकार आखतंय नवा प्लॅन; खाद्यप्रेमींसाठी IMP बातमी, समोसा, जिलेबी खाताय तर...
5
'जर तुम्ही रशियाकडे...', उत्तर कोरियाच्या किम जोंग यांचा अमेरिका, जपानला इशारा
6
पैसे बुडणार नाहीत, तर वाढतील; ‘हे’ आहेत गुंतवणूकीचे सुरक्षित पर्याय, गुंतवू शकता तुम्ही पैसा
7
निमिषा प्रियाचा जीव वाचू शकेल? फाशीला उरलेत अवघे २ दिवस! सुप्रीम कोर्टात आज होणार मोठी सुनावणी 
8
Pune Crime: पुण्यात तरुणाची हत्या; पानटपरीवर वाद, थेट कोयताच घातला डोक्यात, हाताची बोटेही तुटली 
9
कराड 'आरटीओ'ला मुंबई उच्च न्यायालयाचा दणका, 'त्या' बुलेटचे रजिस्टर करण्याचे आदेश; नेमकं प्रकरण काय?
10
Air India Plane Crash : क्रॅश झालेल्या एअर इंडियाच्या विमानाचे टीसीएम दोनदा बदलले होते; इंधन नियंत्रण स्विच याचाच एक भाग
11
दुबई अन् नेपाळपर्यंत पसरलं होतं छांगुर बाबाचं जाळं; 'नीतू' करायची डील! कोण आहे 'ही' व्यक्ती?   
12
'दुआ में जरुर याद रखना' मृत्यूपूर्वी अभिनेत्रीचे अखेरचे शब्द; Voice Note पहिल्यांदाच समोर
13
...मग तेव्हा उद्धव ठाकरे २५ मिनिटं मोदीजींचे बूट चाटत होते का?; रामदास कदमांचा राऊतांवर हल्ला
14
बंगालच्या उपसागरात १६ दिवस चिनी जहाज लपून बसलेले; ओळख सांगणारी यंत्रणा चालू-बंद करत होते...
15
आजचे राशीभविष्य, १४ जुलै २०२५: नवीन कार्यारंभ यशस्वीपणे करू शकाल, भविष्यात लाभ होतील
16
इकडे चौकशी सुरू; तिकडे बाळाने मिटले डोळे, अंत्यसंस्काराची तयारी सुरू असतानाच रडलेले...
17
संपादकीय: गूढ उकलले की वाढले? एअर इंडियाच्या पायलटांवर संशय, बोईंगला वाचविण्याचे प्रयत्न...
18
उम्र का तू तमाशा न दिखा, तकाजा कुछ और हैं...; काळाबरोबर खूप काही बदलले...
19
धक्कादायक : बिहारच्या मतदार याद्यांत म्यानमार, नेपाळी, बांगलादेशींचा भरणा
20
नागरिकांना ४ लाखांचे विमा संरक्षण मिळणार? पीएमजेजेबीवाय अंतर्गत विमा संरक्षण दुप्पट करणार

सातवा वेतन आयोग देणारच

By admin | Updated: June 15, 2017 04:38 IST

१८ लाख राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग देण्यास सरकारने कधीच नकार दिलेला नाही. आम्ही त्यासाठी तरतूदही केली असून लवकरच त्याबाबतची

- अतुल कुलकर्णी । लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : १८ लाख राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग देण्यास सरकारने कधीच नकार दिलेला नाही. आम्ही त्यासाठी तरतूदही केली असून लवकरच त्याबाबतची घोषणा करण्यात येईल, अशी माहिती वित्त व नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी लोकमतशी बोलताना दिली. विरोधकांनी अफवा पसरवू नयेत, असेही ते म्हणाले.शेतकऱ्यांच्या कर्जमाफीमुळे सातवा वेतन आयोग लांबणीवर टाकण्यात येईल, अशी शक्यता वर्तविण्यात आली होती. विरोधकांनी त्यावरून सरकारला जाब विचारला होता. मुनगंटीवार यांनी ही शक्यता फेटाळून लावत कर्जमाफीप्रमाणेच वेतन आयोगाच्या अंमलबजावणीची तारीख लवकरच जाहीर केली जाईल, असे सांगितले.राज्य सरकारच्या विविध विभागांनी राष्ट्रीयकृत बँकांमध्ये डिपॉझिट म्हणून नेमकी किती रक्कम ठेवली आहे, याची माहिती वित्त विभागाने घेतली असून तब्बल बँकांमधील ठेवींमध्ये १ लाख कोटी रुपये असल्याचे स्पष्ट झाले आहे. नॉन बँकिंग फायनान्स कार्पोरेशन स्थापन करुन त्यात ही रक्कम जमा करण्यात येणार आहे. त्यासाठी रिझर्व्ह बँकेची मान्यता आवश्यक आहे. पीएलए खात्यांची माहिती गोळा करण्याचे काम अंतिम टप्प्यात असून आजपर्यंत ६० हजार कोटींची रक्कम पीएलए खात्यात निघाली आहे, असेही मुनगंटीवार यांनी सांगितले.जीएसटीमुळे राज्याच्या महसुलात घट होणार नसल्याचे सांगून मुनगंटीवार म्हणाले, केंद्राकडून आम्हाला १४ टक्के वाढ देण्याचे मान्य केलेले आहे. त्यामुळे मिळणाऱ्या महसुलात १७ ते १८ हजार कोटी रुपये राज्याला मिळतील. नॉन टॅक्स (करेतर) महसूल ७ ते ८ हजार कोटींनी वाढेल आणि केंद्राकडून जेवढ्या योजनांचा जास्तीत जास्त निधी आणणे शक्य आहे तो आणला जाईल. शासकीय जमिनी विकून सरकार पैसा उभा करणार, हे खरे आहे का, असे विचारले असता मुनगंटीवार म्हणाले, सरकारी जमिनी विकण्याचा प्रश्नच येत नाही. मात्र त्या जागा विकसीत केल्या जातील व त्यातून पैसे उभे केले जातील.अनुत्पादक गोष्टींना कपातकर्जमाफीसाठी पैसा उभा करण्यासाठी विकास कामांना कात्री लावली जाणार नाही; मात्र कोणत्या कामांवर किती खर्च करायचा याचा प्राधान्यक्रम ठरवला जाईल. त्यामुळे काही अनुत्पादक गोष्टींवर कपात लागेल. काही विभागांच्या अनावश्यक खरेदीवर बंधने आणली जातील. विकास दर २ टक्क्यांनी वाढवणारसध्या राज्याचा विकास दर ९.४ टक्के आहे. तो ११.४ टक्क्यांपर्यंत वाढविण्याचा प्रयत्न आहे. जीएसटीनंतर आम्ही २ टक्के विकासदर वाढवू शकलो तर राज्याचे उत्पन्न ४० ते ५० हजार कोटींनी वाढेल, असा दावा अर्थमंत्र्यांनी केला आहे.या आधीच्या सरकारने काही ठिकाणी साडेनऊ टक्के तर काही कर्ज १२ टक्के दराने घेतले आहे. अशा कर्जाचा आकडा १ लाख कोटीच्या घरात आहे. या कर्जांचे व्याजदर कमी करुन घेतले जातील. त्यातून ३ ते ४ हजार कोटी वाचतील.कोणाकडे किती आहेत डिपॉझिट जिल्हा परिषदा१७,०००एमएमआरडीए१६,५००सिडको८,०००बांधकाम बोर्ड६,०००जलसंपदा५,५००एमआयडीसी५,५००