शहरं
Join us  
Trending Stories
1
'काळजी करू नका; तुम्हाला जे हवे, तेच होणार', पहलगामबाबत राजनाथ सिंह यांचे सूचक विधान
2
सीमेवर तणाव, त्यात पाकिस्तानच्या या मित्रदेशाने थेट कराचीला पाठवली युद्धनौका, कारण काय?
3
चार पैकी दोन दहशतवादी काश्मिरी, पर्यटकांशी मैत्री केली आणि..., पहलगाम हल्ल्याबाबत सर्वात मोठा गौप्यस्फोट  
4
IPL 2025 : रियान परागचा मोठा पराक्रम; ६ चेंडूवर सलग ६ षटकार मारत सेट केला नवा रेकॉर्ड
5
IND W vs SL W: श्रीलंकेच्या नीलाक्षी दा सिल्वाचं वादळी अर्धशतक; भारताचा तीन विकेट्सने पराभव
6
तेल अवीव विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; दिल्लीहून इस्रायलला जाणारे एअर इंडियाचे विमान वळवले
7
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
8
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
9
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या
10
KKR vs RR : मसल पॉवर रसेलनं दाखवली ताकद; फिफ्टीसह मारली गंभीरच्या खास क्बमध्ये एन्ट्री
11
House Arrest Controversy: FIR दाखल केल्यानंतर उल्लू अ‍ॅपकडून माफीनामा, म्हणाले- "आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की..."
12
वरातीहून परतत असलेली कार झाडावर आदळली, हवाई दलाच्या कर्मचाऱ्यासह चार जणांचा मृत्यू, एक जण जखमी
13
IPL 2025: आयपीएलमध्ये सर्वात जलद अर्धशतक ठोकणारे ५ कॅरेबियन खेळाडू, पाहा फोटो
14
सलग १५ तास साधला प्रसारमाध्यमांशी संवाद, पत्रकार परिषदेत या देशाच्या राष्ट्रपतींनी बनवला रेकॉर्ड
15
कल्याणमध्ये ३५ वर्षीय महिलेची इमारतीच्या १७व्या मजल्यावरून उडी; थरारक घटना सीसीटीव्हीमध्ये कैद
16
संजय राऊतांनी घेतली भेट; फोटो शेअर करत शरद पवारांनी दिली माहिती, नेमके कारण तरी काय?
17
Ram Naik Resigns: राम नाईक यांचा मत्स्योद्योग विकास धोरण समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा
18
"लोकांनाही तेच हवं असतं, म्हणूनच...", डान्स शोच्या रिएलिटीबाबत गीता माँने स्पष्टच सांगितलं, म्हणाली...
19
भारताचा पाकिस्तानला मोठा धक्का, चिनाब नदीवरील बगलिहार धरणाचे पाणी रोखले
20
'कसौटी जिंदगी की' फेम अभिनेत्रीचा घटस्फोट, लग्नानंतर ५ वर्षांनी मोडला संसार

सतरा हजार जलस्रोत दूषित

By admin | Updated: April 1, 2017 03:38 IST

राज्यातील तब्बल १७ हजारांहून अधिक जलस्त्रोत दूषित असल्याची माहिती समोर आली आहे. विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील

विशाल शिर्के / पुणेराज्यातील तब्बल १७ हजारांहून अधिक जलस्त्रोत दूषित असल्याची माहिती समोर आली आहे. विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील जिल्हे यात आघाडीवर आहेत. नायट्रेट, फ्लोराईड, आयर्न यांसारख्या रासायनिक घटकांबरोबरच ई-कोलाई आणि कोलिफॉर्मंसारखे आजार पसरविणाऱ्या जीवाणूंचे प्रमाण यात जास्त असल्याचे दिसून आले आहे.केंद्रीय पेय जल विभागाच्या २०१६-१७चा अहवालावरुन ही बाब स्पष्ट झाली आहे. शेतीमध्ये वापरण्यात येत असलेल्या रासायनिक खतांमुळे नायट्रेट जमिनीत पाझरुन भूजल आणि इतर जलस्त्रोत दूषित करीत असल्याचे समोर आले आहे. राज्यातील प्रयोगशाळेत तब्बल पावणेदोन लाख स्त्रोतांची तपासणी करण्यात आली. त्यातील तब्बल १६ हजार १९९ जलस्त्रोतांमध्ये नायट्रेट आढळून आले आहे. ४०८ आणि ८१० ठिकाणच्या स्त्रोतांमध्ये अनुक्रमे फ्लोराईड, आयर्न यांचे प्रमाण आढळून आले. ई-कोलाई या जीवाणूचे प्रमाण तब्बल ९ हजार ५०४, तर कोलिफॉर्म या जीवाणूचे प्रमाणही तब्बल १७ हजार १३० स्त्रोतांमध्ये आढळून आले आहे. नायट्रेटसह, फ्लोराईड, आयर्न अशी एकाहून अधिक अशुद्धीतले १ हजार ६९५ जलस्त्रोत आहेत. यात भूजल, विहिरी, नदी, झरे, बंद नळ पाईप योजना अशा सर्व प्रकारच्या पेयजल स्त्रोतांचा समावेश आहे. शेतीत रासायिनक खतांच्या वापरामुळे नायट्रेटसारखा घटक आढळून येत असल्याचे भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेचे संचालक सुनील पाटील म्हणाले.