शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

सात वर्षे महिला वाळीत

By admin | Updated: February 5, 2015 01:56 IST

वाळीत प्रकरणे २१व्या शतकातही घडणे ही दुदैर्वी बाब आहे, अशी टीका उच्च न्यायालयाने मंगळवारी केल्यानंतरही रायगड जिल्ह्यात उघडकीस येणाऱ्या वाळीत प्रकरणांची मालिका सुरूच आहे.

जयंत धुळप - अलिबागवाळीत प्रकरणे २१व्या शतकातही घडणे ही दुदैर्वी बाब आहे, अशी टीका उच्च न्यायालयाने मंगळवारी केल्यानंतरही रायगड जिल्ह्यात उघडकीस येणाऱ्या वाळीत प्रकरणांची मालिका सुरूच आहे. श्रीवर्धन तालुक्यातील वडघर सतीचीवाडी येथील कुणबी जातपंचायतीने रसिका मांडवकर या निराधार महिलेला सात वर्षापासून वाळीत टाकल्याचा प्रकार पुढे आला आहे. चारित्र्याच्या संशयावरून त्यांना बहिष्कृत केले होते. रसिका मांडवकर यांनी दाखल केलेल्या तक्रारीची गांभीर दखल घेवून, सहाय्यक पोलीस अधिक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी तत्काळ चौकशीचे आदेश दिले आहेत. वाळीत टाकणाऱ्यांमध्ये मुंबई मंडळाचे अध्यक्ष प्रकाश महादेव जाधव, यशवंत जाधव, संतोष मोकल, नामदेव जाधव, दिलीप जाधव, सागर जाधव, रमेश जाधव, स्थानिक मंडळाचे अध्यक्ष राजाराम जाधव, संतोष पाटील, प्रकाश विठ्ठल जाधव, गणेश पाटील, तंटामुक्ती गाव समिती अध्यक्ष महादेव जाधव, जितू मांडवकर, महिला मंडळाच्या सदस्या लक्ष्मी मोकल, कविता जाधव, रंजीता जाधव, रजनी जाधव, संगीता लक्ष्मण शेडगे, राजश्री राजाराम जाधव, मिनाक्षी भोंबरे यांचा समावेश असल्याचे रसिका यांनी तक्रारीत म्हटले आहे. रसिकाचे पती रमेश मांडवकर यांचा २००७ मध्ये गावात क्षुल्लक कारणावरून वाद झाला होता. त्यांना गावपंचांनी पाच हजार रुपयांचा दंड आकारला. मात्र रमेश यांनी दंड न दिल्याने त्यांना वाळीत टाकण्यात आले. त्यामुळे मानसिक ढासळल्याने रमेश घर सोडून गेले. ते आजतागयत परतलेले नाहीत. रसिका यांनी दंड भरून वाळीतच्या बंदीतून सुटका करून घेतली, तसेच पती बेपत्ता झाल्याची तक्रार श्रीवर्धन पोलीस ठाण्यात दाखल केली. मात्र गावपंचांच्या विरोधात तक्रार केली म्हणून अर्ज मागे घेण्यासाठी रसिका यांच्यावर दबाव आणला जाऊ लागला.गावपंचानी चारित्र्यावर संशय घेत बैठक घेतली व भर बैठकीत ओढत नेत बेदम मारहाण केली. कुठे बाहेर जाऊ नये म्हणून दोन दिवस कोंडून व उपाशी ठेवले. १० हजारांचा दंड ही जबरदस्तीने वसुल करण्यात आला आणि पुन्हा वाळीत टाकण्यात आले. याशिवाय रात्री अपरात्री होणाऱ्या मुंबईच्या मिंटीगला हजर राहण्याची सक्ती करण्यात आली. रसिका यांनी जिल्हाधिकारी सुमंत भांगे, रायगड जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. शशिकांत महावरकर यांच्याकडे तक्रार अर्ज दिला असून त्याच्या प्रती मुख्यमंत्री, मानवी हक्क आयोग, पालकमंत्री रायगड, महिला व बालविकासमंत्री यांनाही दिल्या आहेत. २६ जानेवारी २०१५ रोजी गावात झालेल्या मिटींगमध्ये नव्याने बांधत असलेल्या घराचा विषय असल्याचे सांगून रसिका यांना हजर राहण्याची सक्ती करण्यात आली. १२ बाय १२ एवढ्याच बांधकामाची परवानगी देतो असे सांगण्यात आले. घर बांधण्यापूर्वी १०० रुपयांच्या बाँडपेपरवर गावकीच्या नावे संमतीपत्र देण्याची गावकीच्या पंचांनी सक्ती केली. मात्र रसिका यांनी हे मान्य न केल्याने गावपंचानी नवीन घर बांधून देणार नाही, अशी धमकी दिली. सरकारच्या तंटामुक्ती योजनेला या गावपंचानी आव्हान दिले आहे. तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षासह १७ जणांकडून प्रत्येकी दोन हजार प्रमाणे दंड वसूल करण्यात आला आहे. या प्रकाराची सखोल चौकशी करण्याची मागणी देखील त्यांनी केली आहे.