शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
2
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
3
IPL 2025 : रोहित शर्माचा बॉल बॉयसोबतचा व्हिडिओ होतोय व्हायरल; नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
5
जे रोहित-विराटलाही नाही जमलं ते सूर्या भाऊनं करून दाखवलं; मोडला ११ वर्षांपूर्वीचा विक्रम
6
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
7
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
8
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
9
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
10
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
11
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
12
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
13
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
14
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...
15
सरकार जात विचारणार, पण एखाद्याने जात सांगितली नाही तर? याबाबत कायदा काय सांगतो  
16
RR vs MI : एक सेकंद बाकी असताना DRS घेतल्यामुळे वाचला; मग रोहितनं फिफ्टीसह नवा इतिहास रचला
17
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
18
IPL 2025: राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! स्टार गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर
19
Mumbai RTO: महिलेकडून आरटीओ कर्मचाऱ्याला मारहाण, कार्यालयातही तोडफोड; मुंबईतील घटना
20
"शरद पवारांना हिंदू धर्मालाच शरण यावं लागलं, स्वत:ची मुंज झाल्याचंही दाखवतील"; प्रकाश महाजन यांचा टोला

सात वर्षे महिला वाळीत

By admin | Updated: February 5, 2015 01:56 IST

वाळीत प्रकरणे २१व्या शतकातही घडणे ही दुदैर्वी बाब आहे, अशी टीका उच्च न्यायालयाने मंगळवारी केल्यानंतरही रायगड जिल्ह्यात उघडकीस येणाऱ्या वाळीत प्रकरणांची मालिका सुरूच आहे.

जयंत धुळप - अलिबागवाळीत प्रकरणे २१व्या शतकातही घडणे ही दुदैर्वी बाब आहे, अशी टीका उच्च न्यायालयाने मंगळवारी केल्यानंतरही रायगड जिल्ह्यात उघडकीस येणाऱ्या वाळीत प्रकरणांची मालिका सुरूच आहे. श्रीवर्धन तालुक्यातील वडघर सतीचीवाडी येथील कुणबी जातपंचायतीने रसिका मांडवकर या निराधार महिलेला सात वर्षापासून वाळीत टाकल्याचा प्रकार पुढे आला आहे. चारित्र्याच्या संशयावरून त्यांना बहिष्कृत केले होते. रसिका मांडवकर यांनी दाखल केलेल्या तक्रारीची गांभीर दखल घेवून, सहाय्यक पोलीस अधिक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी तत्काळ चौकशीचे आदेश दिले आहेत. वाळीत टाकणाऱ्यांमध्ये मुंबई मंडळाचे अध्यक्ष प्रकाश महादेव जाधव, यशवंत जाधव, संतोष मोकल, नामदेव जाधव, दिलीप जाधव, सागर जाधव, रमेश जाधव, स्थानिक मंडळाचे अध्यक्ष राजाराम जाधव, संतोष पाटील, प्रकाश विठ्ठल जाधव, गणेश पाटील, तंटामुक्ती गाव समिती अध्यक्ष महादेव जाधव, जितू मांडवकर, महिला मंडळाच्या सदस्या लक्ष्मी मोकल, कविता जाधव, रंजीता जाधव, रजनी जाधव, संगीता लक्ष्मण शेडगे, राजश्री राजाराम जाधव, मिनाक्षी भोंबरे यांचा समावेश असल्याचे रसिका यांनी तक्रारीत म्हटले आहे. रसिकाचे पती रमेश मांडवकर यांचा २००७ मध्ये गावात क्षुल्लक कारणावरून वाद झाला होता. त्यांना गावपंचांनी पाच हजार रुपयांचा दंड आकारला. मात्र रमेश यांनी दंड न दिल्याने त्यांना वाळीत टाकण्यात आले. त्यामुळे मानसिक ढासळल्याने रमेश घर सोडून गेले. ते आजतागयत परतलेले नाहीत. रसिका यांनी दंड भरून वाळीतच्या बंदीतून सुटका करून घेतली, तसेच पती बेपत्ता झाल्याची तक्रार श्रीवर्धन पोलीस ठाण्यात दाखल केली. मात्र गावपंचांच्या विरोधात तक्रार केली म्हणून अर्ज मागे घेण्यासाठी रसिका यांच्यावर दबाव आणला जाऊ लागला.गावपंचानी चारित्र्यावर संशय घेत बैठक घेतली व भर बैठकीत ओढत नेत बेदम मारहाण केली. कुठे बाहेर जाऊ नये म्हणून दोन दिवस कोंडून व उपाशी ठेवले. १० हजारांचा दंड ही जबरदस्तीने वसुल करण्यात आला आणि पुन्हा वाळीत टाकण्यात आले. याशिवाय रात्री अपरात्री होणाऱ्या मुंबईच्या मिंटीगला हजर राहण्याची सक्ती करण्यात आली. रसिका यांनी जिल्हाधिकारी सुमंत भांगे, रायगड जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. शशिकांत महावरकर यांच्याकडे तक्रार अर्ज दिला असून त्याच्या प्रती मुख्यमंत्री, मानवी हक्क आयोग, पालकमंत्री रायगड, महिला व बालविकासमंत्री यांनाही दिल्या आहेत. २६ जानेवारी २०१५ रोजी गावात झालेल्या मिटींगमध्ये नव्याने बांधत असलेल्या घराचा विषय असल्याचे सांगून रसिका यांना हजर राहण्याची सक्ती करण्यात आली. १२ बाय १२ एवढ्याच बांधकामाची परवानगी देतो असे सांगण्यात आले. घर बांधण्यापूर्वी १०० रुपयांच्या बाँडपेपरवर गावकीच्या नावे संमतीपत्र देण्याची गावकीच्या पंचांनी सक्ती केली. मात्र रसिका यांनी हे मान्य न केल्याने गावपंचानी नवीन घर बांधून देणार नाही, अशी धमकी दिली. सरकारच्या तंटामुक्ती योजनेला या गावपंचानी आव्हान दिले आहे. तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षासह १७ जणांकडून प्रत्येकी दोन हजार प्रमाणे दंड वसूल करण्यात आला आहे. या प्रकाराची सखोल चौकशी करण्याची मागणी देखील त्यांनी केली आहे.